Wednesday, December 26, 2018

जतची यात्रा पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज


तहसीलदार सचिन पाटील यांची माहिती
जत,(प्रतिनिधी)-
 31 डिसेंबर 2018 पासून सुरू होणार्या महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी प्रशासन व श्री यल्लामादेवी देवस्थान ट्रस्ट सज्ज असून यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी चोख नियोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी यात्रेच्या नियोजन बैठकीत सांगितले.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष शार्दुलराजे डफळे यांनी या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांतून लाखो भाविक येतात. भाविकांसाठी प्रशासनाने पाण्याची सोय करण्याची मागणी केली. तहसीलदार पाटील यांनी संपूर्ण यात्रेच्या कामाचा आढावा घेऊन यात्रास्थळाची पहाणी केली. यानंतर विविध शासकीय अधिकार्यांकडून आढावा घेतला. यामध्ये वाहतुकीची समस्या, ‘महावितरण’, बांधकाम विभाग, जत नगरपालिका आदी विभागांनी केलेल्या कामाची चर्चा करण्यात आली. यात्रेसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून यामध्ये गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, एसटी आगार व्यवस्थापक, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक आदींची कमिटी करण्यात येणार असल्याचे सांगून जत पोलिसांनी यात्राकाळात प्रत्येक चौकात चोख बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था निरखावी, असे आवाहन यावेळी केले. यात्रेतील मेवामिठाई व खाद्यपदार्थ विक्रेर्त्यांनी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्याकडून नोंदणी करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी श्री यल्लामादेवी ट्रस्टचे अध्यक्ष शार्दुलराजे डफळे, तुकाराम महाराज, मुख्याधिकारी अभिजित हराळे, गणपतराव कोडग, प्रा. कुमार इंगळे, मोहनराव पाटील, बारीष शिंदे, मंडलाधिकारी संदीप मोरे, तलाठी घाडगे, पापा सनदी, नितीन शिंगाडे, जी. एल. शेट्यापघोळ, श्री काळबांदे, विक्रम ङफळे, संग्राम शिर्के, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment