Sunday, December 23, 2018

शाहरुखला सतावतेय ‘ही’ चिंता


सध्या बॉलिवूडच्या किंग खानला आगामी चित्रपटझीरोविषयी चिंता वाटू लागल्याचे समोर आले आहे. जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला तर पुढील सहा ते दहा महिने मला काम मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया शाहरुखने दिल्याचे समोर आले आहे. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांचे चित्रपट जेव्हा मोठ्या पडद्यावर येतात, तेव्हा उत्सुकतेसोबतच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार याची खात्री त्यांना मनात कुठेतरी असते. पण गेल्या काही महिन्यांत याउलटच चित्र पाहायला मिळालं.

कारण याच दिग्गज अभिनेत्यांचे चांगले चांगले चित्रपट फ्लॉप झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात शाहरुखचाजब हॅरी मेट सेजल’, सलमानचाट्युबलाइट’, आमिरचाठग्स ऑफ हिंदोस्तानयांसारखे चित्रपट आहेत जे दणक्यात आपटताना दिसले. तर दुसरीकडे विकी कौशल, राजकुमार राव, आयुषमान खुराना या नव्या दमाच्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरताना दिसत होते. यामुळेच शाहरुखला आता त्याचा आगामी चित्रपटझीरोविषयी चिंता वाटू लागली आहे. ‘चित्रपटाचं भविष्य मी बदलू शकत नाही, त्यामुळे मी का त्याचा विचार करू? ‘झीरोजर हिट ठरला नाही तर कदाचित मला पुढील सहा ते दहा महिने काम मिळणार नाही. पण जर मला माझ्या अभिनयावर आणि कलेवर विश्वास असेल तर पुढे काम मिळत राहील,’ असं शाहरुख म्हणाला. शाहरुखचाजब हॅरी मेट सेजलया चित्रपटाचं बजेट 90 कोटी रुपये इतकं होतं. पण बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने जेमतेम 64.33 कोटी रुपये कमावले होते. ‘फॅन’, ‘रईसआणिदिलवालेया चित्रपटांनीही अपेक्षेपेक्षा कमीच गल्ला जमवला.

No comments:

Post a Comment