सांगली संस्थानचे श्रीमंत अप्पासाहेब
ऊर्फ चिंतामणराव पटवर्धनांच्या दरबारी अनेकजण आपली कला सादर करीत होते. नायकिणीची गाणी, राधेचा नाच,
गोवेकरणीची गाणी आणि विशेष म्हणजे तमाशा लावण्याचे फड त्यामध्ये असत.
राधा रणमल्ली, इमाम, आवडी,
चिमणी, बक्षीची ,रमा,
गुलाबी, वीणा, नायकिणी,
फकिरा अशा अनेक हरहुन्नरी नर्तिका दरबारी येऊन आपली अस्सल कला सादर करून
जात. सांगली जिल्ह्यातील तमाशा परंपरा 18 व्या शतकापासून ते आजतागायत जिवंत आहे. पूर्वी
1918 मध्ये शेटफळे (ता. आटपाडी0
येथील हौशी तमाशा कलावंत वामन लांडगे यांनी बाबू गहिना लोकनाट्य तमाशा
मंडळाची मूहुर्तमेढ रोवली. त्यानंतर तमाशा कलेला नवे बळ मिळत
गेले.नंतर 1920 मध्ये बनपुरी (ता. आटपाडी) चा रांगडे तमाशा कलावंत
म्हणजे आवजी कृष्ण अहिवळे यांनी तमाशा सुरू केला.
1935 मध्ये गोमेवाडीच्या नाना वामन
सोहनी यांनी लोकनाट्य तमाशा मंडळाची हालगी वाजवली. या कालखंडात
छेळबराव मैना हा वग खूपच गाजला होता. याच कालखंडात जो तमाशा गाजला
तो शाहीर पठ्ठे बापूराव ऊर्फ श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी यांचा.