Tuesday, December 31, 2019

रांगड्या तमाशाची कसदार भूमी


सांगली संस्थानचे श्रीमंत अप्पासाहेब ऊर्फ चिंतामणराव पटवर्धनांच्या दरबारी अनेकजण आपली कला सादर करीत होते. नायकिणीची गाणी, राधेचा नाच, गोवेकरणीची गाणी आणि विशेष म्हणजे तमाशा लावण्याचे फड त्यामध्ये असत. राधा रणमल्ली, इमाम, आवडी, चिमणी, बक्षीची ,रमा, गुलाबी, वीणा, नायकिणी, फकिरा अशा अनेक हरहुन्नरी नर्तिका दरबारी येऊन आपली अस्सल कला सादर करून जात. सांगली जिल्ह्यातील तमाशा परंपरा 18 व्या शतकापासून ते आजतागायत जिवंत आहे. पूर्वी 1918 मध्ये शेटफळे (ता. आटपाडी0 येथील हौशी तमाशा कलावंत वामन लांडगे यांनी बाबू गहिना लोकनाट्य तमाशा मंडळाची मूहुर्तमेढ रोवली. त्यानंतर तमाशा कलेला नवे बळ मिळत गेले.नंतर 1920 मध्ये बनपुरी (ता. आटपाडी) चा रांगडे तमाशा कलावंत म्हणजे आवजी कृष्ण अहिवळे यांनी तमाशा सुरू केला.
1935 मध्ये गोमेवाडीच्या नाना वामन सोहनी यांनी लोकनाट्य तमाशा मंडळाची हालगी वाजवली. या कालखंडात छेळबराव मैना हा वग खूपच गाजला होता. याच कालखंडात जो तमाशा गाजला तो शाहीर पठ्ठे बापूराव ऊर्फ श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी यांचा.

देशात वृक्ष, वनक्षेत्रात झपाट्याने वाढ

महाराष्ट्रात १८ वर्षांत १८ कोटी वृक्षवाढ
महाराष्ट्रात फळबागांचे क्षेत्र वाढले आहे. महाराष्ट्रात आंबा, बोर आणि डाळिंबाच्या तीन कोटी वृक्षांची लागवड होते आणि सुमारे ९0 ते ९५ टक्के वृक्ष जगतात. गेल्या १८ वर्षांत महाराष्ट्रात १८ कोटी वृक्ष वाढले आहेत.आशेचे किरण दिसते आहे
देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी १६.५१ टक्के पहाडी क्षेत्र आहे. येथील वन क्षेत्रातही ५४४ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. देशातील आदिवासी जिल्ह्यांतील एकूण वन क्षेत्र चार लाख २२ हजार ३५१ चौरस किलोमीटर आहे. ते एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३७.५४ टक्के आहे. सध्याच्या मूल्यांकनानुसार, ७४१ चौरस किलोमीटरने हे क्षेत्र घटले असले तरीही बाहेरच्या क्षेत्रात मात्र एक हजार ९२२ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. देशातील बांबूचे क्षेत्रफळ अंदाजे एक लाख ६0 हजार 0३७ चौरस किलोमीटर आहे. त्यात तीन हजार २२९ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. आगीच्या प्रमाणात २0१८ पेक्षा २0 टक्क्यांनी घट झाली आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे. यामुळे आशेचे किरण दिसत आहे.

Sunday, December 29, 2019

सांगलीचा झेंडा देशात लावणारे सोंगी भजन

अनेक खेड्यांतून थोड्याफार फरकाने उत्तररात्रीपर्यंत हा कलाप्रकार रंगलेला असे. लोकरंजनातून नीतीचे व संस्कृतीचे शिक्षण देणारी ही लोककला होती. या कलाकारांनी एकनाथी भारुड, रामायणातील कथाव्यवहारातील व्यक्तिरेखा निवडून कला प्रकार सादर केला. प्रसंगानुरुप गीते व सोंगेही घेतली जायचीसांगली जिल्ह्यात बर्याच ठिकाणी सोंगी भजन किंवा सोंगी रामायण सादर करताना लोककलाकार दिसतात. तुरची ढवळी येथे शामराव पाटील, सुभाष पाटील, बाळासाहेब पाटील यांनी हा कलाप्रकार भक्तिभावाने जोपासला आहे.सोंगी भजनाद्वारे संत वाड्मयाचे सादरीकरण करीत असतात.तासगाव तालुक्यातील खुजगाव येथील जाधव मंडळी सोंगी भजनाचे उत्तम सादरीकरण करतात. चोपडीवाडी व सोनी येथील लाला मास्तर यांनीही हा लोककला प्रकार अतिशय वैशिष्ट्यपूर्णपणे हाताळला. कवलापूर येथील दिलीप झेंडे, उपळावी येथील चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब शिंदे, कुपवाड येथील सुतार हवालदार आदी कित्येक लोककलाकारांची नावे सांगता येतील.मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील सोंगी रामायणाने अनेक राज्याचा दौरा करून ही लोककला देशाच्या नकाशावर नेली.

Saturday, December 28, 2019

मुलींच्या शिक्षणात विवाहाचा अडथळा

देशात बालविवाहाला बंदी आहे. तरीही काही राज्यांमध्ये ही कुप्रथा आजही कायम आहे. त्यामुळेच तब्बल १४ टक्के मुलींना याच कारणामुळे शाळा सोडावी लागत असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय पातळीवरील सर्वशिक्षण अभियान आणि शिक्षण हक्क कायद्याच्या दोन दशकांच्या प्रयत्नांनंतरही देशभरातील व शहरातीलही मुलांच्या शाळागळतीचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू असला तरीही तब्बल १४ टक्के मुलींना उमलत्या वयातच विवाहबंधनात अडकवण्यात येत असल्याने त्यांना शिक्षण सोडावे लागत असल्याचे दाहक वास्तव राष्ट्रीय नमुना चाचणीच्या अहवालातून समोर आले आहे.
शाळागळतीचे हे प्रमाण २३. ८0 टक्के मुले आणि १५.६0 टक्के मुलींना शिक्षणातच रस नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे सामाजिक बंधनांमुळे मुलींना शिक्षण घेता येत नाही, तर शिक्षण घेऊनही काहीच फायदा नाही, अथवा ते बालकांना शिक्षणाप्रती ओढ निर्माण करण्यात अपुरे पडत असल्यानेच शिक्षण सोडून देण्याचे प्रमाण वाढत असल्याचे या पाहणीच्या निष्कर्षातून समोर आले आहे.

Friday, December 27, 2019

सलमानची चौथीत असताना शाळेतून हकालपट्टी

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सलमान खान याची चौथीत असताना शाळेतून हकालपट्टी करण्यात आली होती. खुद्द सलमाननेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला. 'द तारा शर्मा शो' या कार्यक्रमात त्याने हजेरी लावली होती. आपल्या बालपणीच्या बर्‍याच गोष्टी सलमानने या मुलाखतीत सांगितल्या.

Thursday, December 26, 2019

शालेय पोषण आहारात शिवशाही थाळीचा समावेश करा

जत,(प्रतिनिधी)-
शासनाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या आहारातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारास आळा घालण्यासाठी या विद्यार्थ्यांना शिवशाही थाळीचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक समितीचे शिक्षक  नेते मच्छिंद्र ऐनापुरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Tuesday, December 24, 2019

कर्मचार्‍यांचे अप-डाऊन थांबणार तरी कधी?

जत,(प्रतिनिधी)-
शासनाने शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहून कर्तव्य बजवावे, असा आदेश काढला आहे. या आदेशाची जत तालुक्यात सर्रास पायमल्ली होताना दिसून येत आहे. यामध्ये शिक्षक, शिक्षिका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आदींचा समावेश आहे. कर्मचारी मुख्यलयी राहत नसल्याने जनतेची अनेक कामे खोळंबली जात आहे.

'मर्दाणी'ने गर्लफ्रेंडसोबत नवऱ्याला चोपले

जत,(प्रतिनिधी)-
अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या 'र्मदानी २' चित्रपटातील हाणामारीचे दृश्य प्रेक्षकांना थिएटरमध्ये लाईव्ह पाहायला मिळाले. पडद्यावर चित्रपट सुरु असताना एक महिला दबंग बनून तिथे पोहोचली. तिने थेट कॉर्नर सीटवर बसलेल्या नवर्‍याला आणि त्याच्या प्रेयसीला खेचून बाहेर काढले व चोप दिला. अहमदाबादच्या आर्शम रोडवरील मल्टीप्लेक्समध्ये ही घटना घडली.

सव्वा वर्षात सात राज्यांतून भाजप हद्दपार

झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल बघता हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी ४१ चा जादुई बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. अंतिम निकाल जर असाच राहिला, तर महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही भाजप सत्तेबाहेर फेकला जाईल. मार्च २0१८ मध्ये, भाजप किंवा त्यांचे सहयोगी पक्षांचे २१ राज्यांत सरकार होते. परंतु डिसेंबर २0१९ पयर्ंत ही आकडेवारी १५ राज्यांपयर्ंत घसरली आहे. गेल्या एका वर्षात चार राज्यात भाजपचा पराभव झाला असून झारखंड पाचवे राज्य बनण्याच्या दिशेने जात आहे.

Sunday, December 22, 2019

भारताला प्रत्येक चौथा दारुडा करतो मारामारी

जत,(प्रतिनिधी)-
देशातील प्रत्येक चौथा तळीराम दारू प्यायल्यानंतर मारामारी करतो ही धक्कादायक बाब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल १५ टक्के नागरिक टल्ली होत असून ते सर्वाधिक देशी दारूला पसंती देतात.

Saturday, December 21, 2019

टपाल खात्यावर खासगी कुरिअरवाल्यांनी मारली बाजी

जत(मच्छिंद्र ऐनापुरे):
सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात टपाल विभाग आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहे. मोबाइल, इंटरनेट, सोशल साइट यामुळे पत्र लिहिण्याचे प्रमाण हल्ली खूप कमी झाले आहे. यामुळे इंग्रजांच्या काळापासून अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या टपाल पेट्यांचे अस्तित्व राहणार की नाही याबाबत साशंकता आहे.

दगडी पाटा, वरवंट्याने घेतली अडगळीची जागा

जत,(प्रतिनिधी)-
 स्वयंपाक म्हटला की वाटप आलेच आणि हे वाटप दगडी पाटा, वरवंट्यांवरील असेल, तर जेवणाचा स्वादच वेगळा असतो. मात्र, आधुनिक राहणीमान उंचावल्याने पूर्वी वापरात असणारे चूल, दगडी जाते, पाटे-बरवंटे या वस्तूंची जागा आता अनुक्रमे गॅस, पीठ गिरणी व मिक्सरने घेतली आहे. त्यामुळे या वस्तू अडगळीत पडल्या आहेत.

आयझॅक न्यूटन

डिसेंबर २५, इ.स. १६४२ रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात जन्मले. आयझ्ॉक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझ्ॉक त्याच्या आजीजवळ राहिले.
वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझ्ॉक जेमतेम दोन वर्षे शाळेत होते. त्यांना गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढय़ात त्यांचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नव्या बाळाला घेऊन आयझ्ॉकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझ्ॉकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझ्ॉक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसले होते. मंद वारा वाहत होता.

निसर्गाचा गणिती चमत्कार रामानुजन

जगातील महानतम गणितज्ज्ञांमध्ये गणले जाणारे, महान भौतिकी अल्बर्ट आइन्सटाईन यांच्या तोडीचे गणिताचे जादुगार श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर हा जन्मदिन आहे. शून्या च्या शोधाकडे भारतीयांचा सर्वात महत्त्वाचा शोध म्हणून पाहिले जाते. शून्याच्या शोधामुळे केवळ गणितक्षेत्रालाच नव्हे तर इतर सर्व क्षेत्रांना एक नवा आयाम मिळाला. एके काळी गणितात अग्रस्थानी असणार्‍या भारतात आज गणित एक कठीण आणि गंभीर विषय समजला जातो. महान भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख. तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम या छोट्याशा गावी काम करून जीवनचरितार्थ चालविणार्‍या सामान्य दाम्पत्याला ईश्‍वराने एक अलौकिक अपत्य दिले आणि २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणमजवळील इरोड या गावी श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला.

जतची यल्लमा यात्रा मोठ्या उत्साहात सुरू

हजारो भाविकांनी फेडला नवस;लाखभर भाविकांनी घेतले दर्शन
 जत,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला काल शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यात्रेच्या मुख्य दिवसातील आजचा हा पहिला प्रमुख दिवस गंधोटगीचा होता. हजारोंच्या संख्येने भाविकांनी गंध लेवून देवीची ओटी भरली व आपला नवस फेडला. आज दिवसभरात हजारो भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले.
नवसाला पावणारी देवी म्हणून जतची श्री यल्लमा देवी सर्वदूर प्रसिद्ध आहे. आपले कार्य विनासायास सफल व्हावे म्हणून भाविक देवीला नवस बोलतात. आपली कार्यसिद्धी झाल्यास या दिवशी भाविक देवीच्या दारात येऊन नवस फेडतात. येथील कुंडात स्नान करून भक्तीभावाने देवीची ओटी भरली जाते. यात्रा स्थळावर भाविकांसाठी पिण्यासाठी व स्नानासाठी कुंडात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.

जतच्या विज्ञान प्रदर्शनात किरण नाईक प्रथम

जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने 45व्या तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूलचा आठवीत शिकणारा विद्यार्थी किरण विजय नाईक याने प्रथम क्रमांक मिळविला.
किरण नाईक याने ह्युमन रोबोट (मानवी यंत्र) असे साहित्य बनविले. हे विज्ञान प्रदर्शन बिळूरच्या श्री मुरघाराजेंद्र कन्नड माध्यमिक विद्यालयात भरविण्यात आले. बक्षीस वितरण सभारंभ प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर.डी. शिंदे यांच्याहस्ते किरण नाईक यास देण्यात आले. यावेळी अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव, बिळूर मठाचे मठाधिपती मुरगेंद्र स्वामीजी, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र माने, टी.एल. गवारी, सौ. सुजाता माळी, उमदी शाळेच्या सौ. शिंदे आदी उपस्थित होते. किरण नाईक यास शाळेचे शिक्षक कु. प्रियांका पवार, शाळेचे मुख्याध्यापक काटकर, भीमराव राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले. किरण हा जत येथील गंगा चेरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व व्रुत्तपत्र विजयवाणीचे कार्यकारी संपादक विजय नाईक यांचा चिरंजीव आहे.

Thursday, December 19, 2019

शाळेतील छडी झाली गूल.!

जत,(प्रतिनिधी)-
शिक्षणाप्रमाणे शिक्षकांच्या संकल्पनेतही बदलत होऊन शाळेतील छडी हद्दपार झाल्याचे चित्र असून, हातावर छड्या मारणे, डस्टर फेकून मारणे, पायाचे अंगठे धरून तर बेंचवर हात वर करून उभे करणे, शाळेच्या मैदानाला धावत फेर्‍या मारायला लावणे, अशा विविध शिक्षा जवळजवळ संपल्या आहेत. या शिक्षेमुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना शारीरिक इजा होण्याचे प्रकार घडत असतात. त्यातून मोठे वादही झाले आहेत. मात्र, आता अशा शारीरिक शिक्षेचे स्वरूप शाळांनी बदलले आहे.

भक्तांना आईची माया देणारी 'श्री यल्लमा देवी'


रेणुका अर्थातच यल्लमा देवीचे प्रस्थ महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या तीन राज्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणात आहे. या भागात गावोगावी यल्लमा देवीची मंदिरे आहेत आणि साधारण मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभापासून या देवीच्या यात्रांना प्रारंभ होतो. सर्वात मोठी यात्रा जत (महाराष्ट्र) आणि कोकटणूर ( कर्नाटक) आणि सौंदत्ती (कर्नाटक) याठिकाणी भरते. इथे लाखो भाविक देवीच्या दर्शनाला आणि नवस फेडायला येत असतात.  या देवीला  मुली सोडण्याचा प्रघात होता. मात्र शासन आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून ही कुप्रथा बंद झाली आहे. मात्र चोरीच्या मार्गाने मुलींची देवीशी लग्न लावून दिले जात असल्याचे म्हटले जात असले तरी याबाबत ठोस काही सांगता येत नाही. ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. भक्त तिला 'यल्लमा', "संपूर्ण जगाची आई" किंवा "जगदंबा" मानतात.
या देवीची आख्यायिका सांगितली जाते. यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते.

जतची यल्लमा यात्रा 21 पासून सुरु

जत,(प्रतिनिधी)-
  महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा 21 डिसेंबरपासून सुरू होत असून  यात्रेसाठी प्रशासन व श्री यल्लामादेवी देवस्थान ट्रस्ट आणि जत नगरपरिषद सज्ज असून यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी चोख नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
रविवारी 21 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून यादिवशी भाविक नवस फेडण्यासाठी येतात. देवीला गंध ओटी भरतात. 22 रोजी भाविक देवीला नैवेद्य वाहतात. तर तिसरा दिवस हा कीचाचा दिवस असतो. या दिवशी (दि.23) विविध देवांच्या पालक्या मंदिराभोवती फेऱ्या मारतात.भाविक यावेळी पालक्यांवर खारीक खोबऱ्याची उधळण करतात.  देवीचा पुजारी कीचातून प्रवेश करतो. यानंतर यात्रेची सांगता होते .देवीचा दरवाजा बंद होतो. हा दरवाजा अमावसया दिवशी उघडतो. या दिवशी पुन्हा यात्रा मोठ्या उत्साहात भरते. तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक यादिवशी मोठ्या प्रमाणात यात्रेला हजेरी लावतात.

Tuesday, December 17, 2019

फेसबुकवरील मित्रांना भेटायला गेली अन घरदार विसरली

सोशल मीडियाचा महत्त्वाचा हिस्सा म्हणून फेसबुककडे पाहिले जाते. ज्याद्वारे जुन्या मित्रांना शोधले जाते आणि नवीन मित्रही बनविले जातात. लहानापासून ते अगदी मोठय़ांची फेसबुक ही दिवसाची आवश्यकता झाली आहे. अशाच फेसबुकवर बनविलेल्या मित्रांना भेटण्याकरिता नवरा आणि चार वर्षाच्या मुलाला सोडून गेलेल्या बायकोला शोधून काढण्यात पोलिसांना चांगलाच कस लागला खरा, पण त्यामागील सत्य शोधले. तर, सोशल मीडियाचा वापर किती नुकसानकारक ठरू शकते, याचा विचार न केलेलाच बरा. घटना आहे वर्धा शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या बोरगाव (मेघे) येथील. तब्बल २४ दिवस मित्रांची भेट घेतलेल्या बायकोला नवर्‍याच्या स्वाधीन करण्यात वर्धा पोलिसांना यश आले.

Monday, December 16, 2019

जेलमधून फरार आरोपीस जत येथे पोलिसांनी पकडले

जत,(प्रतिनिधी)-
जेलमध्ये घेऊन जाताना 30 नोव्हेंबर रोजी फरार झालेल्या गणेश ऊर्फ पप्पू दत्तात्रय गस्ते (रा. वाढेगाव, ता. सांगोला) या आरोपीस गोपनीय खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास वाळेखिंडी (ता. जत, जि. सांगली) येथे सांगोला पोलिसांनी शिताफीने पकडले, अशी माहिती पो.नि. राजेश गवळी यांनी दिली. गेले 15 दिवस सदर आरोपी सतत जागा बदलत होता.सांगोला तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरून आरोपी गस्ते याने पोलिसाच्या हातास हिसका मारून अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले होते.

बोरे काढायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत पडून मृत्यू


जत ,(प्रतिनिधी)-
शाळेला न जाता बोरे काढून पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जत तालुक्यातील सिंगनहळळी येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. श्याम शिवाजी हिप्परकर (वय 10) व अतुल पोपट हिप्परकर (वय 9) अशी मयत मुलांची नावे आहेत.

Sunday, December 15, 2019

विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे कायमच!

जत,(प्रतिनिधी)
दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या आणि दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास सुरू झाला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिकत असलेल्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढत असल्याचे दिसून येत आहे. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात मणक्याच्या आजाराला बळी तर पडावे लागणार नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे. पाठय़ पुस्तका व्यतिरिक्त अन्य शैक्षणिक साहित्यांच्या भारामुळे दप्तराचे ओझे वाढत असल्याचे दिसत आहे.

Friday, December 13, 2019

बॉलीवूड आणि 2019

बॉलिवूडसाठी २0१९ हे वर्ष फार विशेष होतं. या वर्षी अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. काही सिनेमांनी चांगली कमाई केली तर ज्या सिनेमांकडून अपेक्षा होत्या त्यातील काही बॉक्स ऑफिसवर दणदणीत आपटले. दरम्यान, गूगल इंडियाने १0 सिनेमांची यादी शेअर केली आहे. यात सर्वाधिक सर्च केले गेलेले सिनेमे कोणते ते सांगितले आहेत. कबीर सिंग- या यादीत पहिलं नाव आहे ते शाहिद कपूरच्या कबीर सिंग सिनेमाचं. तेलुगू सिनेमा अर्जुन रेड्डीचा हा अधिकृत रिमेक होता. सिनेमाचं संगीत, संवाद याने तरुणाईला अक्षरश: वेड लावलं. असं असलं तरी अनेकांनी या सिनेमाचा विरोधही केला. कबीर सिंग शाहिदच्या करिअरमधला सर्वात हिट सिनेमा ठरला.

Thursday, December 12, 2019

ऐतिहासिक मिरज आणि कराड प्रांत

इतिहास इ. स. १००० ते इ. स. १८००
सांगलीचा इतिहास इ. स. १००० ते इ. स. १८००
१०२४ गोंक या शिलाहार राजाच्या ताब्यात ' मिरिच' (मिरज) व ' करहाटक'  (कराड) व दक्षिण कोंकण हा प्रांत होता. यातच सांगलीचा भूभाग समाविष्ट होता.
१२०५ शिलाहार राजा गंगादित्य याने मिरज भागांत इसकुडी येथे तलाव बांधला.  कोल्हापूर, मिरज, शेडबाळ व तेरदाळ येथे याबाबतचे शिलालेख आहेत.
१२५० - १३१८
देवगिरीच्या यादव राजानी या भागावर राज्य केले त्यावेळी ' मिरिच' प्रांतात तीन हजार गांवे होती.
१३१९ - १३४७
दिल्लीच्या खिलजी व तुघलकानी या भागावर राज्य केले.
१३४८ - १४८९
बहामनी सुलतानानी या भागावर राज्य केले.
१४९० - १६५९

जत जवळील किल्ला:रामदुर्ग

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेक गड , किल्ले, गढ्या बांधलेल्या आहेत. त्यातील काही छोटे किल्ले आणि गढ्या स्थानिक मातब्बर सरदारानी बांधलेल्या आहेत. स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी छोटे किल्ले बांधले जात. अशाच प्रकारचा एक छोटेखानी गढी वजा किल्ला "रामदुर्ग" विजापूरचे सरदार डफळे यानी सतराव्या शतकात सांगली जिल्ह्यातील रामपुर या गावातील छोट्याश्या टेकडीवर बांधला. किल्ल्याचा आकार, संरक्षणाच्या सोई आणि पाण्याची व्यवस्था पाहाता हा किल्ला प्रशासकीय व्यवस्थेसाठी बांधला असावा असे म्हणता येइल.

चाळीस लाख मुले नशेच्या विळख्यात

देशभरातील दहा ते १७ वयोगटातील सुमारे ४0 लाख मुले अंमली पदार्थांचे सेवन करतात, तर ३0 लाख मुलांना दारूचे व्यसन जडले आहे, अशी माहिती सरकारतर्फे लोकसभेत देण्यात आली.सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रतनलाल कटारिया यांनी प्रश्नाचे लेखी उत्तर देताना वरील माहिती दिली. २0१८ च्या राष्ट्रीय सर्वेक्षणातील माहितीनुसार, या वयोगटातील सुमारे ३0 लाख मुले व्यसनासाठी 'इनहेलर'चा वापर करतात. २0 लाख मुले भांग आणि वेदनाशामक औषधांचे व्यसन करतात, तर चार लाख मुले अँम्फेटामाइन-टाइप स्टिम्युलन्ट (एटीएस) म्हणजेच विशिष्ट प्रकारची उत्तेजके वापरतात आणि दोन लाख मुले कोकेन आणि ग्लानी आणणारी औषधे घेतात, अशी माहिती त्यांनी दिली.

राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेस पुरस्कार


जत,(प्रतिनिधी)-
 राजे रामराव महाविद्यालय, जत ला शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शै. वर्ष २०१८-१९ साठी उत्कृष्ठ महाविद्यालय व डाॅ. राजेंद्र लवटे यांना उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी म्हणून सांगली जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती प्र. प्राचार्य डॉ. विठ्ठल ढेकळे यांनी दिली.

Tuesday, December 10, 2019

महाराष्ट्रात बलात्काराचे २२ हजार खटले प्रलंबित

हैदराबाद एन्काऊंटरचे देशभरात स्वागत होत आहे. याचे कारण म्हणजे न्याय मिळण्यात होणारा विलंब. निर्भया प्रकरणालाही ६ वर्षे लोटले तरी अजूनही न्याय झाला नाही. गुन्हा केल्यावर तातडीने आरोपीला अटक व्हायला पाहिजे. तेवढय़ाच तातडीने त्यानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षाही मिळाली पाहिजे. महाराष्ट्रात जवळपास २२ हजार बलात्काराचे खटले प्रलंबित आहेत. पीडितांना न्याय मिळणे सोपे राहिले नाही, हे सांगण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे.

सांगली जिल्ह्याची साहित्य संमेलन परंपरा

सांगली,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्याला साहित्य आणि साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. प्रसिध्द लेखक,कवी आणि 'गीत रामायण' चे रचनाकार गदिमा यांची ही जन्मभूमी आहे. त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हटले जाते. बाबाखान दरवेशी, डॉ. सरोजिनी बाबर असे मोठे लेखक,लेखकांचा गोतावळा इथे आहे. आज शेकडो साहित्यिक शारदेची उपासना करताना दिसत आहेत. याशिवाय सांगली जिल्ह्यातील ग्रामीण आजही मोठ्या प्रमाणात छोटी मोठी साहित्य संमेलने भरवली जातात. यातून नवोदितांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे आज शेकडो लेखक लिहिते झाले आहेत. मोठ्या सांगली जिल्ह्याची साहित्य संमेलन परंपरा आहे.

Monday, December 9, 2019

एकुंडी यल्लम्मा यात्रा उत्साहात

जत,(प्रतिनिधी)-
 एकुंडी येथील रेणुका देवीची यात्रा आज उदं ग आई उदंऽऽ...च्या जयघोषात पारंपरिक उत्साहात झाली.
सकाळी सहा पासून सुरू असलेली रांग रात्री दहापर्यंत कायम होती. सरपंच बसवराज पाटील यांच्यासह स्वयंसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडली. हजारो भाविकांनी श्रद्धेने देवीला आंबील आणि कांदाभाकरीचा नैवेद्य अर्पण केला. अनेक भाविकांनी रानमाळावर बसून नैवेद्याचा आस्वाद घेतला. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मानाचे जग पाटील वाड्यातून बाहेर पडल्यानंतर पुजारी यांनी किचाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर यात्रेची सांगता झाली.

Sunday, December 8, 2019

थोर व्यक्तींच्या चरित्रांची युवा पिढीने पारायणे करावीत

प्राचार्य डॉ. विठ्ठल ढेकळे
जत,(प्रतिनिधी)-
आजच्या युवापिढीचे वाचन कमी असून त्यांनी आपल्या आयुष्याची जडणघडण करण्यासाठी थोरामोठ्यांच्या चरित्रांची पारायणे करावीत असे मनोगत राजे रामराव महाविद्यालय, जतचे  प्राचार्य डॉ. विठ्ठल ढेकळे यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयातील महाराष्ट्र विवेक वाहिनी विभाग व श्रीमंत विजयसिंहराजे डफळे ज्ञानस्त्रोत केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

जत पूर्व भागात उमदी येथे मिनी एमआयडीसीची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
    जत तालुका विस्ताराने मोठा असल्यामुळे संख आणि उमदी येथे स्वतंत्र तहसिल कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच जतचा हा पूर्व भाग हा स्वतंत्र तालुका होण्याचा मार्गावर आहे .सध्य स्थितीत प्रत्येक तालुक्याची ठिकाणी लघु आणि मध्यम औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यात आली आहे. त्याच्या अनुषंगाने उमदी येथे सुद्धा एमआयडीसी स्थापना करणे आवश्यक आहे.  जत पूर्व भागातील लोकांची मागणी आहे.