Wednesday, December 29, 2021

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा साळमळगेवाडी येथे सत्कार


जत,(प्रतिनिधी)- सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने नुकत्याच शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा पार पडल्या.यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व गुणवंत शिक्षकांचा मॉडेल स्कूल म्हणून साकारत असलेल्या साळमळगेवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीराम पडोळे होते. 

व्हॉलीबॉलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे जिरग्याळ केंद्राचे केंद्रप्रमुख रतन जगताप, क्रिकेट व खोखोमध्ये उत्तम  कामगिरी करणारे बाळासाहेब जायभाये ,जिल्हा परिषदेचा व शिक्षक नेते कै. शिवाजीराव पाटील जीवन गौरव प्राप्त शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे व रामेश्वर करळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पडोळे यांचाही सत्कार करण्यात आला. 

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विद्याधर गायकवाड यांनी केले. आभार मुख्याध्यापक गुलाबसिंह पावरा यांनी मानले. यावेळी विठ्ठल कोळी, शहाजी वाघमारे, सीताराम यादव, मनोहर जाधव, शुभांगी पाटील, जयश्री देवमाने, दत्ता खांडेकर, शिवाजी सुतार व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, November 16, 2021

प्रदुषणाच्या भस्मासुराने एका वर्षात तीन लाख मृत्यू


भारतासह जगभरातले बरेच देश सध्या प्रदुषणाशी लढताना दिसत आहेत. याच दरम्यान युरोपीय पर्यावरणीय यंत्रणेने हे जाहीर केले आहे की, वायू प्रदुषणामुळे तीन लाख सात हजार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, वायू प्रदुषणामुळे जगात दरवर्षी ७० लाख जणांचा अकाली मृत्यू होतो.

युरोपीय पर्यावरण यंत्रणेच्या एका अहवालानुसार, जर युरोपीय संघातली राष्ट्रे जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या वायू गुणवत्ता निर्देशांचे पालन केले, तर ही संख्या अर्ध्याहूनही कमी होऊ शकते. या अहवालानुसार, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला हवेतल्या सूक्ष्म कणांनी फुफ्फुसात खोलवर प्रवेश केल्याने युरोपीय संघातल्या २७ देशामधल्या एक लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला होता. तर २००५ पर्यंत हा आकडा दुप्पट होऊन ४ लाख ५० हजारांवर पोहोचला.

२०१९ मध्ये हवेत मिसळलेल्या या सूक्ष्म कणांमुळे जर्मनीमध्ये ५३, ८००, इटलीमध्ये ४९,९००, फ्रान्समध्ये २९,८०० तर स्पेनमध्ये २३,३०० जणांचा अकाली मृत्यू झाला. तर पोलंडमध्ये ३९,३०० जणांचा मृत्यू झाला. अहवालानुसार, कार, ट्रक आणि थर्मल पॉवर स्टेशन्समधील नायट्रोजन ऑक्साईडमुळे २०१८ आणि २०१९ मध्ये होणाऱ्या मृत्यूंमध्ये एक चतुर्थांथ प्रमाणात घट झाली, त्यामुळे हा आकडा ४० हजारांवर आला होता.

एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, वायूप्रदुषणामुळे हृदयविकार, कॅन्सर तसेच फुफ्फुसांच्या आजारांच्या प्रमाणात वाढ होते. तर लहान मुलांच्या फुफ्फुसांच्या विकासामध्ये वायू प्रदुषणामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. परिस्थितीमध्ये सुधारणा होत असली तरी अजूनही हे चिंताजनकच आहे. दिल्लीमधल्या वायूप्रदुषणाने अतिगंभीर पातळी गाठली आहे. त्यामुळे आता राजधानी अक्षरशः गॅस चेम्बर होताना दिसत आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोच असून लॉकडाउनसारख्या उपायांवर विचार केला जात आहे.

Friday, October 29, 2021

पुनीत राजकुमार, सिद्धार्थ शुक्ला, राज...या स्टार्सचा 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला


काल शुक्रवारी प्रसिध्द कन्नड अभिनेता पुतीन राजकुमार यांचे हृदयविकाराने निधन झाले. आपल्याला माहीतच आहे की, गेल्या वर्षभरात बॉलिवूड क्षेत्रासह अनेक सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला आहे.  गेल्या वर्षी जिथे कोविडच्या कहरामुळे अनेक स्टार्सचे निधन झाले, तिथे काही सेलिब्रिटींच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका ठरले. या निमित्ताने अशा स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे यावर्षी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जगाला अखेरची सलामी दिली.

 पुनीत राजकुमार : कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार याने शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घेतला.  46 वर्षीय पुनीतच्या निधनाने चाहते आणि स्टार्स हळहळ व्यक्त  करत आहेत. सुप्रसिद्ध कन्नड अभिनेता डॉ.राजकुमार यांचा पुतीन हा चिरंजीव आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटात काम केले असून त्यांचे काही चित्रपट हिंदी सह अनेक भाषेत भाषांतरीत झाले आहे.

 सिद्धार्थ शुक्ला: 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.  ही बातमी अफवा ठरावी, अशी प्रत्येकाची इच्छा होती, पण तसे झाले नाही.  बिग बॉस 13 चा विजेता ठरलेल्या सिद्धार्थने वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

 राज कौशल: दिग्दर्शक, निर्माता आणि स्टंट दिग्दर्शक राज कौशल यांनी 30 जून 2021 रोजी अखेरचा श्वास घेतला.  मंदिरा बेदी यांच्या या 50 वर्षीय पतीच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला.

 अमित मिस्त्री: अमित मिस्त्री यांनी चित्रपटांसोबतच थिएटर आणि टीव्हीमध्येही आपली आवड पसरवली होती.  अमित यांचे 23 एप्रिल 2021 रोजी वयाच्या 47 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

 राजीव कपूर : अभिनेते राजीव कपूर यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.  राजीव यांना ९ फेब्रुवारी 2021 रोजी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 सुरेखा सिक्री: 16 जुलै 2021 रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  सुरेखा यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सरोज खान: स्मरण करून द्या की 2020 च्या सुरुवातीला बॉलीवूडच्या दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  सरोज यांनी 3 जुलै 2020 रोजी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.


Thursday, October 28, 2021

या' मूलांकाचे लोक आहेत मस्तमौला, हे लोक जगतात आपले जीवन मोकळेपणाने

अंकशास्त्राच्या या प्राचीन पद्धतीनुसार, ज्या लोकांचा मूलांक  4 आहे, असे लोक खूप मजेदार असतात आणि नेहमी हसतमुख असतात. 


अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्रासारखेच एक शास्त्र आहे, ज्यामध्ये अंकांच्या मदतीने लोकांच्या भविष्याची माहिती मिळवता येते.  हिंदीत याला अंकशास्त्र आणि इंग्रजीत Numerology असे म्हणतात.  या प्राचीन विज्ञानात, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारीखातून एक मुख्य संख्या तयार होते, ज्याला मूलांक म्हणून ओळखले जाते.  उदाहरणार्थ, महिन्याच्या 4, 13 किंवा 22 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो.  असे म्हटले जाते की प्रत्येकाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व एकमेकांपेक्षा वेगळे असते, हे मूलांकामुळे असू शकते.

जाणून घ्या मूलांक 4 बद्दल: असे म्हणतात की मूलांक नंबर 4 च्या लोकांचा स्वभाव खूप मस्त असतो.  4, 13 किंवा 22 तारखेला जन्मलेल्यांचा असा विश्वास आहे की जीवन मुक्तपणे जगले पाहिजे कारण ते एकदाच मिळते.  त्यांच्या मते, उद्याची आशा नाही, त्यामुळे जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा.

चेष्टा-मस्करी करण्यात ते पुढे आहेत: अंकशास्त्राच्या या प्राचीन पद्धतीनुसार, मूलांक नंबर 4 असलेले लोक खूप मजेदार असतात आणि नेहमी हसत असतात.चेष्टा मस्करी करत असतात.या लोकांना आनंद वाटून घेण्यासाठी ओळखले जातो. दुसऱ्यांना आनंद वाटतात.  असे म्हणतात की हे लोक स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहेत तसेच थंड डोक्याचे आहेत.  तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे लोक त्यांचे निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेतात.

प्रेमविवाहावर विश्वास ठेवतात : असे म्हटले जाते की या राशीच्या लोकांवर सौंदर्याचा खूप प्रभाव असतो.  असे म्हणतात की, आनंद वाटून घेणारे हे लोक अनेकांना त्यांचे दुःख सांगत नाहीत.  आपल्या गोष्टी एखाद्या खास व्यक्तीसोबत शेअर करणाऱ्या या लोकांचा लव्ह मॅरेजवर खूप विश्वास असतो.  तज्ज्ञांच्या मते, या मूलांकाच्या लोकांचे मित्र खूप सुंदर असतात.

Saturday, October 23, 2021

तुमची सकाळ "आनंदी आनंद गडे" होण्यासाठी...


आपला दिवस छान जावा,कसली कटकट मागे लागू नये, असे प्रत्येकाला वाटत असते. पण यासाठी आपण सकारात्मक राहिले पाहिजे. सकाळी उठल्यापासूनच तसे प्रयत्न राहिले पाहिजे. सकाळी उठल्यावर आपण मनात चांगले विचार आणि चांगल्या गोष्टी पाहिल्या तर तुमची सकाळ हॅपी हॅपी होऊन जाते... सकाळी उठल्या उठल्या डोळ्यांसमोर तुमच्या आवडीच्या व्यक्तीचे चित्र (प्रतिमा) आणा. तुमच्या 'हिरो'ची प्रतिमा पाहा. चांगल्या विचारांच्या ओळी वाचा. रात्री झोपताना तुमच्या शेजारी जवळ प्रेरणादायी पुस्तक ठेवा,सकाळी उठल्यावर त्याची काही पाने वाचा. म्हणजे तुमच्या मनाला उभारी येईल. सकाळी उठताना मोबाईलकडे दुर्लक्ष करा. नाहीतरी दिवसभर मोबाईल तुमची पाठ सोडतच नाही,मग निदान सकाळी तरी त्याला काही काळ बाजूला ठेवा.

आणखी एक गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर अनेकांना आरसा पाहण्याची सवय असते. पण सकाळी झोपेतून उठल्यानंतर आरशात पाहू नये. कारण झोपेतून उठल्यानंतर तुमचा चेहरा, कपडे आणि बॉडी फ्रेश नसते. निस्तेज चेहरा आरशात पाहिल्यावर

तुम्ही आणखी निराश होऊ शकता. त्यामुळे चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन अगोदर फ्रेश व्हा. नंतर आरशात चेहरा पाहा. तुमचा फ्रेश चेहरा आरशात पाहून तुम्हाला आणखी उत्साह येईल आणि तुमचा दिवस छान जाईल.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर न धुतलेली किंवा घाणेरडी कपडे परिधान करू नका. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. रात्री झोपतानाही घाणेरडे कपडे घालून झोपू नका. कारण त्यामुळे तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर मरगळल्या सारखे होईल. रात्री झोपताना घातलेल्या कपड्यांवरच सकाळी

वावरू नका. यामुळे तुमचा आळस आणखी वाढेल. सकाळी उठल्याबरोबर फ्रेश होऊन दुसरे स्वच्छ कपडे परिधान केल्यास तुमच्या अंगात उत्साह निर्माण होईल.

खूप उशिरा उठल्यावरही अंगात आळस असतो. त्यामुळे हॅप्पी गुड मॉर्निंगसाठी सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन बाहेर हवेशीर फिरायला जा. यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल तसेच आयुष्यही सुंदररित्या जगण्याचा मार्ग सापडेल.


Thursday, October 14, 2021

खरसुंडीची सिद्धनाथ योगेश्वरी


खरसुंडी येथे श्रीसिद्धनाथांचे प्राचीन हेमांडपंथी मंदिर आहे. मंदिर परिसरात देखण्या दीपमाळा आहेत. नाथांच्या दर्शनासाठी राज्य-परराज्यातून भक्त येतात. नवरात्रोत्सवात बाळाबाई तथा योगेश्वरीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. श्री सिद्धनाथांचे मूळ ठिकाण म्हसवड, चिंचाळे गावच्या नयाबा गवळी सिद्धनाथाचे भक्त त्यांनी आपल्या भक्तीच्या बळावर गावच्या पूर्वेस असलेल्या डोंगरावर साकडे घातले. तिथे कपिला गायीच्या खरवसातून शिवलिंग साकारले. खरवस पिंडीवरून गावाला खरसुंडी हे नाव प्रचलित झाले. सिद्धनाथांना सात पत्नी होत्या. नाथांच्या मूर्ती सोबत बाळाबाई तथा योगेश्वरी विराजमान आहेत. यांसह विघ्नेश्वरी, मळाबाई, जनाई, जोगेश्वरी, छोटी जकाई व मोठी जकाई अशा देवींची मंदिरे परिसरात आहेत. योगेश्वरी देवीचे आंबेजोगाई येथील मूळ ठिकाण. उत्सवामध्ये पाचवेळा श्री नाथाची उत्सव पालखी सर्व लवाजम्यासह भेटीला येते. चैत्री यात्रेला सासनकाठी सोहळा, पौष पौर्णिमा, पारधी पौर्णिमा, तीन वर्षातून होणारी जकाई भेट यात्रा व नवरात्र उत्सवातील हर जागर सोहळा होत असतो. नवरात्रोत्सवात जोगेश्वरी मंदिरात पालखी मुक्काम असतो. यावेळी रात्री हर जागर व सकाळी साखर वाटप असा सोहळा होतो. श्री नाथांच्या मुख्य उत्सवात जोगेश्वरीच्या मूळ ठिकाणाहून त्यांचे मानकरी खरसुंडीत नैवेद्य व पूजा करून प्रत्येक वर्षी दर्शनासाठी येतात.


कडेगावची डोंगराई देवी


कडेगाव शहराच्या दक्षिणेला कडेपूरच्या डोंगरावर डोंगराईदेवीचे प्राचीन मंदिर आहे. गिरीकंदरातील अतिप्राचीन असे हे शक्तीपीठ आहे. मध्ययुगात इ. स. १२०९ मध्ये राजा भोज यांचा देवगिरीचा सम्राट सिंधण यादव यांनी पराभव करून दक्षिण सातारा (पूर्वी सांगली, सातारा जिल्ह्यांत होती) कोल्हापूर भागावर सत्ता प्रस्थापित केली. त्यांच्या पदरी असलेल्या हेमाद्रिपंताने महाबळेश्वर येथे बरीच हेमाद्रिपंताकडून महाबळेश्वराच्या पूर्वेस १६० कि.मी. कडसूर पर्वत पूर्वीचा लिंगराज पर्वत या डोंगरावर म्हणजेच आताचे श्री क्षेत्र “डोंगराई" या ठिकाणी मंदिर उभारल्याचे मानले जाते. शिर्के व जावळीच्या मोरे घराण्याची सत्ता आल्यावर अनेक सरदार व कडेपूरच्या यादव-देशमुख घराण्यांनी देवीच्या मंदिराची वेळोवेळी डागडुजी केली. त्यांनी कडेपूरचे लढाऊ यादव-देशमुख व परिसरातील शेकडो भक्त हाताशी धरून, तटबंधी गड बांधला. उत्तर दिशेला औंधच्या देवीकडे तोंड करून चिरेबंदी मोठा दरवाजा बांधला. गडावर पायऱ्या केल्या. या डोंगराई गडावरून चारी दिशांची स्पष्ट टेहळणी केंद्र म्हणून निवड करून, तोफखाना व्यवस्था केली. बारा वर्षे तीर्थथान करून इ. स. १६४५ साली, श्री समर्थ रामदास स्वामी चाफळहून उंब्रजमार्गे प्रथम काडासूर तर आताचे नाव कडेपूर या परिसरमध्ये आले. तेव्हा त्यांना या डोंगराईवर काहीतरी, दैविक गोष्टींचा साक्षात्कार झाला. डोंगराई मंदिरावर राजगुरू समर्थ रामदास स्वामी यांनी येथे मारुतीची व अन्य देवतांची स्थापना केल्याचे सांगितले जाते. सध्या आर्य समाजाचे देवीचे परमभक्त “पटवी बंधू भगिनी" व त्यांचे सर्व भागांत विखुरलेले अन्य नातेवाईक हे यासाठी डोंगराई परिसरात मोठी मदत करतात. या पुरातन मंदिरात अनेक देवी देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत. वनराईने नटलेल्या या परिसरातील गगनचुंबी मंदिर एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे.


Thursday, September 16, 2021

रक्षा समर्पण


स्वामी विवेकानंद भारत परिक्रमा करत असत. परिक्रमा करत असताना एका छोट्या खेड्यात आले. एका छोट्या झोपडीसमोर येऊन त्यांनी पाणी मागितले. घरातून एक म्हातारी बाहेर आली. तिने आधी त्यांची चौकशी केली, मग त्यांना घरात बोलावले. एक ग्लासभर दुधात चिमूटभर पूड मिसळून त्यांना दिले. नंतर पाणीही दिले. विवेकानंदांनी ते दूध, पाणी प्यायले. तेव्हा ती म्हातारी एकाएकी भावनातिरेकाने रडू लागली.

स्वामीजींनी तिला रडण्याचे कारण विचारले. ती म्हणाली, माझा मुलगा दोन वर्षांपूर्वी वारला, त्याची रक्षा गंगेत समर्पण करण्याची माझी फार इच्छा होती. पण मला ते शक्य झाले नाही. तू गंगा परिक्रमा करून आला आहेस, तुझ्या शरीरात गंगेच्या पाण्याचा थोडा तरी अंश असेल. मी मुलाची चिमूटभर रक्षा दुधात मिसळून तुला दिली. निदान तिथे तरी ती रक्षा गंगेला मिळाली. मी तुला आधी सांगितले नाही, ही फसवणूक झाली. मी त्याबद्दल तुझी क्षमा मागते. पण आज माझ्या

मुलाला मुक्ती मिळाली या आनंदामुळे हे अश्रू आले आहेत. यावर स्वामी विवेकानंदानी आजीला सांगितले की तुमचे योग्य आहे. तुमच्या पुत्राची रक्षा गंगेला मिळाली आहे असेच समजावे. कारण तुम्ही या वयात वाराणशीला जाऊ शकत नाही. हे त्यांचे बोल ऐकून आजींचे डोळे अजूनच पाणवले. स्वामी विवेकानंदांची

पाठ थोपटत त्यांनी त्यास आशीर्वाद दिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी आज्जीच्या निरोप घेऊन पुढील तिर्थटनास निघाले.

*******

स्थळ पसंत पडून मुलाकडची मंडळी होकार देणारच होती...

तेवढ्यात किचनमधून आवाज आला, आई चहासाठी किती शिट्ट्या...?

मुलाकडचे आम्ही येतो...सांगायला पण थांबले नाहीत...!


Monday, September 13, 2021

आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की ....


आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्यांना कवडीची किंमत राहात नाही. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका,विश्वास मात्र जरुर ठेवा. कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जातं... "!!

●●●●●●●●●●●●●●●●●●

काल हॉटेल मध्ये एका विचित्र माणसाला बघितलं... ना लॅपटॉप वर काम करत होता, ना व्हॉट्सअॅप बघत होता, ना मेसेज. फोनवर पण बोलत नव्हता आणि सेल्फी पण घेत नव्हता... ....नुसता कुटुंबाबरोबर गप्पा मारत होता... गावंढळ कुठचा !!!

●●●●●●●●●●●●●●●●●●●

घरी खोकल्याचं औषध पिताना मुद्दाम तोंड वेडंवाकडं करावं लागतं म्हणजे घरच्यांना खात्री पटते की पोरगा अजून बिघडलेला नाही...

●●●●●●●●●●●●●●●●●●●

एका बोबड्या मुलीचं लग्न जमत नसतं. शेवटी मोठ्या मुश्किलीने तिला बघायच्या वेळी गप्प बसायला लावून तिचं लग्न ठरवतात.

लग्नात हार घालण्याच्या वेळी तिला नवऱ्या मुलाच्या

टोपीवर किडा बसलेला दिसतो. तो पाहून ती ओरडते, 'तिडा तिडा' त्या आवाजाला घाबरुन नवरा मुलगा अजून जोरात ओरडतो.. 'तुताय तुताय?'

●●●●●●●●●●●●●●●●●●●

बायकांची प्रार्थना....

हे देवा माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे

माझ्यासाठी काही नको त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी

बघते...

●●●●●●●●●●●●●●●●●●●

लहानपणी आई म्हणते तुला काही कळत नाही

तरुणपणी म्हणते तुम्हाला काही कळत नाही

म्हातारपणी मुले म्हणतात तुम्हाला काही कळत नाही

पुरुषांना कळण्याचे वय केव्हा येते हेच काही कळत नाही...


Sunday, September 12, 2021

आपण आपले गुण ओळखावे...,

आपण आपले गुण ओळखावे...,

दोष सांगण्यासाठी लोक आहेतच.....

पाऊल टाकायचे असेल तर पुढे टाकावे..,

मागे ओढायला लोक आहेतच.....

स्वप्न पाहायचे असतील तर मोठेपणाचे पहावे..,

कमीपणा दाखवायला लोक आहेतच...!

*****

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे ? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय.

*****

दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर,

घड्याळ म्हणते काळाची पाऊले ओळख......

खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव....

देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्य जप......

छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव.पण

जमीन....म्हणते पावले मात्र माझ्यावरच राहू देत....

*****

नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.

●●●●●●●●●●●●●●●


एका महिलेच्या व्रताने प्रसन्न होऊन देव बाप्पा प्रकट झाले आणि त्या महिलेला म्हणाले...'मुली, काय हवा तो वर माग!!'

ती महिला म्हणाली,'माझा नवरा माझ्याशिवाय कुठेही जायला नको..."

"अजून काही ?"

माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात माझ्यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण काहीही नसावं...."

"अजून काही ?"

"मला बघितल्याशिवाय त्याला झोप येऊ नये ..."

"अजून काही?"

"जेव्हा तो सकाळी झोपेतून उठेल व डोळे उघडेल त्यावेळी सगळ्यात पहिले त्यानं मला बघावं..."

"अजून काही ?"

"आणि मला जरा देखील खरचटलं तरी वेदना माझ्या नवऱ्याला व्हाव्यात..."

"अजून काही?"

"बस... एवढं पुरेसं आहे देवा!"

"तथास्तु!"

आणि तात्काळ त्या महिलेचं रुपांतर स्मार्ट फोनमध्ये झालं...!!!


Saturday, September 11, 2021

धन म्हणजे काय?


वडिलांनी घरी आल्यावर आपल्याला पूर्ण वेळ द्यावा असे जेव्हा मुलांना वाटते तेव्हा वडिलांनी टीव्ही बंद करून आणि स्मार्टफोन बाजूला ठेवून मुलांना दिलेला १०० टक्के वेळ हे. मुलांचे ... 'धन'...

 वैवाहिक आयुष्यातील २० वर्षे पूर्ण झाल्यावरसुद्धा जो आपल्या पत्नीला तिच्या गुण-दोषासकट स्वीकारून सांगतो 'माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे'' तो क्षण म्हणजे पत्नीचे... 'धन'

आपल्या मुलाने आपली देखभाल करावी असे वार्धक्यामुळे थकलेल्या आई-वडिलांना जेव्हा वाटते आणि तेव्हा मुलगा ती इच्छा पूर्ण करतो, तो क्षण म्हणजे आई-वडिलांचे 'धन'

ह्या तीनही क्षणांचा त्रिवेणी संगम ज्याच्या आयुष्यात होतो ते खरे "धनवान"

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

भारताचे लोक हेल्मेट घालणार नाहीत पण मोबाईलला स्किनगार्ड नक्की लावणार....| डोकं फुटुन रक्त वाहत गेलं तरी चालेल पण मोबाईलला स्कॅच येता कामा नये!

*****

"गेले तीन दिवस कसंतरीच होतंय डॉक्टर."

"वेगळं काय केलंत या तीन दिवसात?"

"अं सगळं नेहमीचंच..... फक्त नेट बंद होतं चार दिवस."

"...मग विशेष काही नाही. माझं वायफाय वापरा आणि एखादं पोस्ट टाका."

"का हो डॉक्टर ?"

"...तुम्हाला बद्धपोस्ट झालंय !"


Friday, September 10, 2021

लग्न? लग्न म्हणजे काय असतं...


लग्न... ते सुंदर जंगल आहे. जिथे बहादुर वाघांची शिकार हरणी करतात! लग्न म्हणजे... अहो ऐकलंत का? पासुन ते बहिरे झालात की काय? पर्यंतचा प्रवास!

 लग्न म्हणजेच... तुझ्या सारखे या जगात कुणीच नाही... पासून... तुझ्या सारखे छप्पन बघीतलेत!

लग्न म्हणजे... तुम्ही राहुद्या... पासून ते... मेहरबानी करून, तुम्ही तर राहुच द्या... पर्यंतचा प्रवास...

कुठे होती माझी राणी... पासून तर... कुठे मेली होतीस... पर्यंतचा प्रवास...

लग्न म्हणजेच... तुमचे नशीब मी भेटले तुम्हाला... पासून ते... मेलं माझंच नशीब फुटकं, तुम्ही मला

भेटलात... पर्यंतचा प्रवास...

वैवाहिक जीवन हे कश्मीरसारखे आहे. सुंदर तर आहे

परंतु दहशत पण आहे!

******

अंमली पदार्थ विरोधी पथकाचा ऑफिसर पाटलाच्या शेतात आला. "तू ड्रगची अवैध शेती करतोय म्हणे.

मला तपासणी करायचीय.." त्याने गुर्मीत विचारलं..

पाटील म्हणला.." तसं काय नाय ओ साहेब... तुमी पायजे तर तपासून बघा.. पण एक करा शेताच्या त्या

कोपऱ्यात जाऊ नका."

ऑफिसर भडकून म्हणाला,"... तू कोण मला सांगणार रे दिडशाण्या... माझ्या कडे ॲथोरिटी लेटर आहे."

त्याने खिशातनं आयडी काढलं... बघितलं? या आयडीचा अर्थ असा की, मी पाहिजे तिथे जाऊ शकतो.. कुणाच्याही जमिनीत घुसू शकतो. कोणाची हिम्मत नाय मला अडवायची.. कळलं?

पाटलानी निमुट मान हलवली.

साहेब शेतात गेला. थोड्याच वेळात एक मोठी किंकाळी शेतात घुमली. पाठोपाठ जीव खाऊन धावणारा साहेब ओरडताना दिसला.

शेतातला वळू नाक फुरफुरवत सायबामागे धावत होता.

साहेबाचे तीन तेरा वाजले होते. कोणत्याही क्षणी वळू गाठणार आणि शिंगावर घेणार अशी लक्षणं होती.

पाटील हातातलं काम टाकून कुंपणाकडे धावला व जीव खाऊन ओरडला".... साहेब आयडी... आयडी दाखवा त्याला..."


Wednesday, September 8, 2021

श्रेष्ठ कोण?


एक दिवस देव आणि राक्षस मिळून प्रजापतीकडे गेले आणि त्यांना विचारले, आमच्यात मोठे कोण? प्रजापतीने सांगितले की तुम्ही सारे आज माझ्याकडे जेवायला थांबा, जेवण झाले की तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो.

देव ३३ कोटी, राक्षसही कितीतरी कोटी! त्यामुळे प्रजापतीने सुचवले की आपण दोन पंगती करू. राक्षसांना प्रत्येक गोष्टीची घाई. ते म्हणाले, पहिल्या पंगतीला आम्ही येणार. प्रजापतीने सगळी तयारी केली. पाने मांडली, वाढून तयार झाली. राक्षस घाईघाईने आले. प्रजापती दुरून पहात होता. राक्षसांनी जेवायला येण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुतले नाहीत. सगळे राक्षस पंगतीत बसेपर्यंतही आधी आले त्यांना दम नव्हता. त्यांनी लगेच जेवायला सुरवातही केली. तेव्हा प्रजापतीने एक मंत्र म्हटला त्याबरोबर राक्षसांचे हात कोपरात ताठ होऊन गेले. पानातला घास तर उचलला. पण कोपरात हात वाकेना, त्यामुळे घास तोंडात जाईना. तासभर प्रयत्न केला तरी राक्षस उपाशीच राहिले. संपली, प्रजापतीने लगोलग दुसऱ्या पंगतीची तयारी केली . देव स्वच्छ हातपाय धुवून आले. गोंधळ न करता शिस्तीत पानांवर बसले. त्यांनी सामूहिक भोजनमंत्र म्हटला. जेवायला सुरवात करणार तेवढ्यात प्रजापतीने पुन्हा त्याच मंत्राचा प्रयोग केला, देवांचेही हात कोपरात ताठ झाले. घास तोंडात घालताच येईना. देवांनी इकडे तिकडे पाहिले. सर्वांचीच तशी अडचण होती. तेव्हा देवांनी एक युक्ती केली . प्रत्येकाने आपल्या शेजारच्या देवाला भरवले. स्वतःच्या तोंडात हात पोचत नव्हता तरी तो शेजारच्याच्या तोंडापर्यंत जात होता. काहीच सांडलवंड झाली नाही. सर्वांचे जेवण अगदी व्यवस्थित झाले. सगळे जण नंतर प्रजापतीकडे आले, आमच्यात मोठे कोण?

प्रजापतीने सांगितले की मोठेपण हे दिसण्यावरून ठरत नाही कृतीरून ठरते. जेवताना जे काही घडले त्यावरून आपले आपणच सिध्द झाले आहे की श्रेष्ठ कोण ?

तात्पर्य : जो फक्त स्वतःचे पोट भरण्याचा विचार करतो, तो स्वतःही उपाशीच राहतो व दुसऱ्याच्याही कामी येत नाही. हेच राक्षसांच्या बाबतीत घडले. देवांनी एकमेकांची काळजी घेतली. त्यामुळे सगळेच संतुष्ट झाले. फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करणाऱ्यांपेक्षा संपूर्ण समाजाच्या हिताचा जे विचार करतात तेच श्रेष्ठ!

******

शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात. पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो आकर्षक साडी सेल. तिसरा दुकानदार पाटी लावतो - जबरदस्त साडी सेल. मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो . मुख्य प्रवेशद्वार..


Sunday, September 5, 2021

स्वर्गाचा दरवाजा


एकदा आभाळात दोन ढगांची भेट झाली. काळा ढग पाण्याने जड झाला होता. तो जमिनीकडे उतरत येत होता. गोरा ढग अगदी हलका होता. तो उंच आभाळात चढत होता. भेट झाल्यावर गोऱ्या ढगाने काळ्याला विचारले, कुठे चाललास? काळा ढग म्हणाला, जमिनीकडे. मी तिथे जाऊन पाऊस पाडणार आहे. माझ्याजवळ जेवढे पाणी आहे ते सगळे धरणी मातेला देऊन टाकणार आहे.

जमीन उन्हाने तापली आहे. नद्या, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. झाडेपण सुकून गेली आहेत. शेतकरी आतुरतेने माझी वाट पहात आहेत. मला जरा घाईने गेले पाहिजे. गोरा ढग त्याला हसला. त्याला म्हणाला, वेडाच आहेस. आपली संपत्ती कधी अशी कोणी जगावर उधळून देतो का? तुझ्यातले पाणी

संपले कि तुझे आयुष्यच संपले की! मी चाललोय स्वर्गात. देव बाप्पाच्या घरी एक जागा रिकामी झालीय. ती मला मिळेल. गोऱ्या ढगाला खूप घाई होती. तो धावतच पुढे निघाला, काळा ढग हळूहळू जमिनीपर्यंत आला. मुसळधार पाऊस झाला. काळा ढग अदृष्यच झाला. नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले. तलाव विहिरी काठोकाठ भरले. सारे रान हिरवेगार झाले. शेतकरी सुखावले.

गोरा ढग वर जाताना ते पहात होता. काळ्या ढगाच्या

वेडेपणाला तो हसला. पाहता पाहता स्वर्गाचा दरवाजा आला. गोऱ्या ढगाने दार ठोठावले. एका देवदूताने ते उघडले. त्याने गोऱ्या ढगाला विचारले, तुझे देवबाप्पाकडे काय काम आहे?

गोरा ढग आपल्याच तोऱ्यात होता. तो म्हणाला, मी इथे

रहायलाच आलोय, स्वर्गात एक जागा रिकामी झालीय. ती मलाच मिळणार! उघड दरवाजा. दार उघडायच्या ऐवजी देवदूताने ते लावूनच घेतले. लावता लावता तो म्हणाला, ती रिकामी जागा आता भरलीय. देवबाप्पा स्वतः विमान घेऊन गेले होते व त्या काळ्या ढगाला स्वर्गात घेऊन आले. ज्याने आपले सर्वस्व देऊन

पृथ्वीवर आनंदी आनंद निर्माण केला, त्याच्यापेक्षा आणखी चांगली व्यक्ती कोण असणार?

तात्पर्य : समाजासाठी सर्वस्व समर्पण करणे हाच मोक्ष आहे. आपल्या आजूबाजूच्या सर्वांना सुखी करणे, त्यांना काही न काही मदत करणे यातूनच माणूस सुखी समाधानी होऊ शकतो.

*******

शाळा : शाळेत उशिरा आले की शेवटच्या बाकावर बसावे लागते.

कॉलेज : कॉलेजमध्ये उशिरा आले की पहिल्या बाकावर बसावे लागते.


Saturday, September 4, 2021

मालक स्टीव्ह जॉब्जचे शेवटचे शब्द


ऍपल (आय-फ़ोन ) चा मालक स्टीव्ह जॉब्ज स्वादुपिंडाच्या कॅन्सर ने २०११ साली मृत्यू पावला.त्याचे हे शेवटचे शब्द ...

व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली... इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले... तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय. आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्यु जवळ श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं: त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा समाजसेवा करणे. सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो...अगदी माझ्यासारखा... आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरातब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही... जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" … आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात...पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपलं आयुष्य" " काळ " " समय ".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक". सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो. स्वत:कडे दुर्लक्ष  करू नका...स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा.

लोक माणसं वापरायला शिकतात, आणि पैसे जपायला शिकतात वास्तविक पैसा वापरायला हवा,आणि माणसं जपायला हवीत.आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते,आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो,मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा,आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...!!!*

जीवनाचा खरा अर्थ


समर्थ रामदास नेहमी या गावातून त्या गावात भ्रमण करत असत. असेच ते एकदा मावळ प्रांतात भ्रमण करत होते. त्यांनी काही दिवस एका गावात राहण्याचे ठरवले. त्या गावात समर्थ रामदास स्वामी एकेका आळीमध्ये जाऊन पाच घरांत भिक्षा मागत असत. एका गावात कोणीतरी सांगितले की एक म्हातारी एकटी रहाते. ती कधीच कोणाला काही देत नाही. घरी गडगंज धन आहे. पण कुणाला कधी काही मदतही करत नाही. समर्थ त्या घरासमोर गेले व भिक्षा मागितली. ती म्हातारी घरातूनच ओरडली, की मी काही देणार नाही. माझ्याकडे देण्याजोगे काही नाही. तरी समर्थांनी प्रयत्न सोडला नाही. ते म्हणाले, तुझ्याकडे जे काही आहे ते तू दे. मला त्याचे वाईट वाटणार नाही. आता त्या म्हातारीला खूप राग आला. ती पुढे आली व अंगणातली मूठभर माती तिने समर्थांच्या झोळीत टाकली. समर्थांनी आशीर्वाद दिला व ते पुढे गेले.

असे ३-४ दिवस झाले. तेव्हा त्या म्हातारीने त्यांना विचारले, मी झोळीत माती टाकली तरी तुम्हाला राग येत नाही? काय करता तुम्ही या मातीचे ? तेव्हा समर्थ तिला म्हणाले, तुझ्याकडे देण्याजोगे खूप आहे; पण तुझ्याजवळ दानत नाही. कमीत कमी माती तरी देण्याची सवय तुझ्या हाताला लागू दे. ती लागली तर अजूनही बरेच काही तू देऊ शकशील.

तात्पर्य : सत्कार्यासाठी दान देणे हा एक संस्कार आहे. तो संस्कार रुजला तर आपल्या जवळची प्रत्येक चांगली गोष्ट समाजाला द्यायची इच्छा होते. पण समाजकार्यासाठी वेळ द्यायची एकदा सवय लागली की त्यातून समाजकार्यासाठी आपले सगळे जीवन समर्पित करणारे कार्यकर्ते तयार होतात.

@@@@@@@@@@@@@@@@

काल नेट बंद होते म्हणून रात्री ८ वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली, घरच्यांनी उचलून दवाखान्यात नेले म्हणे आमचा पोरगा रात्री २-२ वाजेपर्यंत जागतो आज बेशुद्ध का झाला?


Friday, August 27, 2021

कप-बशी


बशी म्हणाली कपाला," श्रेय नाही नशिबाला पिताना पितात बशीभर अन् म्हणताना म्हणतात कपभर!"

कप म्हणाला बशीला,"तुझा मोठा वशिला धरतात मला कानाला अन् लावतात तुला ओठाला!"

स्त्री आणि पुरुष यांचे प्रतीक असलेली कप बशी. स्त्री आणि पुरुष कप-बशीप्रमाणे एकरूप, परस्पर पूरक आहेत. त्यांना एकटे अस्तित्व नाही. दोघे जोडीनेच वावरतात. बशी ही स्त्रीचे तर कप हे पुरुषाचे प्रतीक आहे. कपभर चहाने घटकाभर उत्साह वाटला तरी बशीभर चहाने अंतरात्मा शांत राहतो. कपाप्रमाणे पुरूष कणखर, तर स्त्री बशीप्रमाणे विनम्र असते. कप पोरकट असतो, म्हणून त्याचा कान धरावा लागतो. पण, कपातून सांडले तर बशी सांभाळून घेते. एकमेकांना सांभाळण्यास पूरक जन्मभर टिकणारी अन्यथा फुटण्याला निमित्त शोधणारी अशी ही जोडी कप-बशी!

*******************************

आजींनी हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि म्हणाल्या:

मला रूम नंबर ३०२ मधल्या निर्मला यांची तब्येत कशी आहे ते कळू शकेल का जरा. काळजी वाटतीये म्हणून फोन केला..

जरा दोन मिनिटं होल्ड करा हं' असं म्हणत तिथल्या

ऑपरेटरनी तिसऱ्या मजल्यावरच्या नर्सशी फोन जोडून दिला. नर्स म्हणाली - बऱ्या आहेत त्या आता. बीपी पण नॉर्मल झालंय आणि सगळ्या टेस्ट्स पण नॉर्मल आल्यात. डॉक्टर म्हणतायत उद्या सोडतील घरी त्यांना.

वा... वा! खूप बरं वाटलं ऐकून! धन्यवाद! - आजी म्हणाल्या.

नर्स : तुम्ही त्यांची बहीण बोलताय का?

नाही, मी स्वतः निर्मला बोलतीये ३०२ मधून ! मला कोणीच काही धड सांगेना, म्हणून म्हंटलं स्वतःच चौकशी करावी!


Wednesday, August 25, 2021

व्याख्या ज्या हसवतील

 


पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.

बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.

चौकशीची खिडकी : इथला माणूस कुठे भेटेल हो ?अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.

ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक बाहेर गेले आहे असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.

विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित राहणारा एक जीव,

कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा.

जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.

कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.

कॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.

चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी ग्रह

अनुभव : सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह : जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी : तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची

खडानखडा माहिती असते तो.

सुखवस्तू : वस्तुस्थितीत सुख मानणारा.

वक्तृत्व : मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे.

लेखक : चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा.

फॅशन : शिंप्याच्या हातून झालेल्या चुका.

पासबुक : जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव.

गॅलरी : मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा.

लेखणी : एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन.

छत्री : एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ.

परीक्षा : ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'.

परीक्षा : पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ.

विश्वशांती : दोन महायुद्धांच्या मधला काळ,

दाढी : आळशीपणा व 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन.

थाप : आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात.

काटकसर : कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव.

नृत्य : पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला.

घोरणे : नवऱ्याने-बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी.

मन : नेहमी चोरीस जाणारी वस्तू,

ब्रह्मचर्य : कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग.

विवाहित माणूस : जन्मठेपेचा कैदी.

विधुर : जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी.

श्रीमंत नवरा : चालतं बोलतं एटीएम कार्ड,

श्रीमंत बायको : अचानक लागलेली लॉटरी.

*******


Tuesday, August 24, 2021

शेगाव येथे रविवारी 29 रोजी ग्रामीण साहित्य संमेलन

 जत,(जत न्यूज नेटवर्क)-

मराठी साहित्य सेवा मंच,डॉ. बलभीम मुळे स्मृती फाउंडेशन व ओम साई प्रतिष्ठान, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथील चिंच विसावा येथे 24 वे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती साहित्य सेवा मंचचे अध्यक्ष किरण जाधव, मच्छिंद्र ऐनापुरे व लवकुमार मुळे यांनी दिली.

या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संपतराव जाधव असणार आहेत. यावेळी पहिल्या सत्रात  दुपारी2 ते 3 या वेळेत कवी लवकुमार मुळे यांच्या 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' व कवी महादेव बुरुटे यांच्या 'पिंपळवन डॉट कॉम' या पुस्तकांचे प्रकाशन व अध्यक्षीय भाषण  होणार आहे.

नंतर  'नव्या पिढीला वाचनसंस्कृतीकडे कसे आणता येईल?' या विषयावर परिसंवाद होणार आहे.  यात पत्रकार शिवराज काटकर , दिगंबर शिंदे, नामदेव भोसले सहभागी असणार आहेत.

तिसऱ्या सत्रात श्रावणसर कविसंमेलन होणार आहे. इंद्रजीत घुले (मंगळवेढा) हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. संतोष जगताप,  (लोणविरे),ज्योतिराम फडतरे, (वाटंबरे),रवी सांगोलकर,रशीद मुलाणी, रावसाहेब यादव,दिनराज वाघमारे,केशव सुर्वे,माणिक कोडग आदी कवींचा सहभाग होणार आहे. संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी विजय नाईक, मोहन मानेपाटील, कुमार इंगळे,समाधान माने,प्रल्हाद बोराडे उपस्थित होते.

Monday, August 23, 2021

खळखळत जगा.. नितळ झऱ्यासारखं शुद्ध..!!


शांत डोहावर कधी विश्वास ठेवू नये.. खोल बरंच काही कुजलेलं मिळतं. उथळ वाहणारं नितळ पाणीच उत्तम, पिण्यायोग्य असतं. माणूसही तसाच असावा! त्याच्या स्वभावात खळखळाटच असावा असं नाही, पण कमालीचा शांतपणा मात्र मुळीच नसावा, कधी कधी या सायलेंटखाली  त्याचं दबलेलं पूर्वआयुष्य मिळेल. उलट कधी पूर्णत: घमेंड, कुजकेपण याचा दर्प खोल आत दिसेल. सतत वाहत रहावं नितळ झऱ्यासारखं, लोकं म्हणू देत उथळ पाण्याला खळखळाट फार... तो खळखळाटच पाणी शुद्ध ठेवतो. डोह कधी कधी तळाशी घमेंड, कुजकेपणा या असल्या पदार्थांनी कुजका निघू शकतो. बेफिकीरपणे मांडावं, आपण आहोत तसे. लोकं मग ठरवतील तुमचा बरे वाईटपणा... स्वच्छंदीपणा हवा जगण्यात वागण्यात फक्त नैतिकतेचा लगाम हवा त्याला.. बाकी उधळा जगणं मुक्त हस्ताने... आयुष्य फार सुंदर आहे, ते असं कुजकेपणाणे कुणी वाया घालू नये बिनधास्त तारीफ करा, एखाद्या सुंदरतेची एखाद्या फुलाची, वेलाची, निसर्गाची आणि सुंदर एखाद्या मुलीचीही बरं का.. तिला तिची सुंदरता कळू द्या.. आवडली तर आवडली म्हणा, बिनधास्त... सगळे विकार अपेक्षा बाजूला ठेवुन मात्र..!

कुद्न मुळीच जगू नका, आयुष्य विश्वाचा वेळ पाहता फक्त तसूभर आहे... दिलखुलास जगा. सगळं उपभोगलं पाहीजे. थरार, आनंद, सुंदरता, आव्हानांना सामोरं जाण्यात आणि त्यानंतरच्या जिंकलेपणात जो आनंद असतो तोसुद्धा वेचता आला पाहीजे. डब्यासारखं एकाच ठिकाणी बसून जमत नाही. चारीआर मनाला घुमवलं पाहीजे. वैराग्याची भगवी वस्त्रे कधीच परिधान करु नका. कारण ती घातल्याने आतल्या चेतना मरत नाहित. सर्व आसक्ती जीवंत असू द्या, त्या जिवंत असणं हे आपण जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यांना फक्त सुंदरतेची झालर असू द्या, मग त्यांचं उपभोगणंही सुंदर होऊन जाईल. जगणही सुंदर होवून जाईल! खळखळत जगा.. नितळ झऱ्यासारखं शुद्ध..!!

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

'स्त्री'

एका संध्याकाळी सूर्य बुडत असतांना तिला तिच्या नातीने विचारले,"आज्जी, स्त्री म्हणजे काय असते गं ?"

सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने, मोतीबिंदू झालेल्या डोळ्याने ती झट्कन बोलली, 

"स्री सुद्धा मनुष्य असते. तिला तिचे आयुष्य असते

तुडवली तर नागीण असते.

डिवचली तर वाघीण असते.

कडाडली तर वीज असते.

तान्ह्या बाळाची नीज असते.

आणि बरं का पोरी, तिच्याच गर्भात भविष्याचे बीज असते!"

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

पेशंट : डॉक्टर, मला नवीन त्रास सुरू झालाय.

मी दुसरं वाक्य बोललो की, पहिलं वाक्य विसरुन जातो.

डॉक्टर : हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे ?

पेशंट : कसला त्रास ?


Monday, August 16, 2021

कवी लवकुमार मुळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सेवा मंचच्यावतीने सत्कार


जत,(जत न्यूज)-

जत तालुक्यातील शेगाव येथील कवी लवकुमार मुळे यांच्या कवितासंग्रहांना पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सेवा मंच,जतच्यावतीने चिंच विसावा येथे सत्कार करण्यात आला. मुळे यांच्या 'कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे' व 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' या कवितासंग्रहांना शब्दांगन संस्था, चंद्रपूरचे यांचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार  मिळाला आहे. साहित्य सेवा मंचचे अध्यक्ष व पत्रकार किरण जाधव, साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, प्रा, कुमार इंगळे, 'चिंच विसावा'चे व्यवस्थापक  प्रल्हाद बोराडे, सौ,बोराडे. अनिकेत ऐनापुरे आदी उपस्थित होते.

लवकुमार मुळे शेगाव यांचे आतापर्यंत 'गुलमोहर' , 'भावमुद्रा', 'काळीजवेणा', 'अर्ध वेलांटी', 'कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे', 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' आदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत. 'कोलाहल' व 'आत्म संवादाचे पांढर पक्षी' हे संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या कवितासंग्रहांना शब्दांगण पुरस्कार( मिरज), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा विशेष पुरस्कार ,कै सुरेश कुलकर्णी पुरस्कार, औदुंबर सहित्याज्योती पुरस्कार (बीड), श्रीमती शहाबाई यादव साहित्य पुरस्कार (रेनावी), बेळगावचा वाङ्मय चर्चा मंडळाचा कृ. ब. निकुंभ साहित्य पुरस्कार मिळाले आहेत तर साहित्य प्रतिष्ठान, पुणेचा प्रतिभा गौरव पुरस्कार नुकताच घोषित झाला आहे.

प्रा.निर्मला मोरे यांना पी.एचडी. मिळाल्याबद्दल सत्कार


(प्रा.निर्मला मोरे यांचा सत्कार करताना मच्छिंद्र ऐनापुरे, अरुण शिंदे आणि प्रा.कुमार इंगळे.)

जत,(जत न्यूज)-

जत येथील राजे रामराव महाविद्यालयातील प्रा.निर्मला वसंत मोरे यांना पी. एचडी. मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, मराठा सेवा संघाचे अरुण शिंदे व प्रा.कुमार इंगळे उपस्थित होते.

प्रा.निर्मला मोरे यांना शिवाजी विद्यापीठाची 'समकालीन मराठी ग्रामीण कथेतील स्त्री जीवन' या विषयावर पी. एचडी. मिळाली आहे. याबद्दल साहित्य सेवा मंचच्यावतीने साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.निर्मला मोरे या नववी पास होत्या. लग्नानंतर शिक्षण घेऊन त्या प्राध्यापक झाल्या.त्यांनी ग्रामीण स्त्री जीवन जवळून पाहिले असून साहित्यातील स्त्री जीवनाचा अभ्यास केला आहे.

Friday, June 4, 2021

सहवासाचा परिणाम

 


*सहवासाचा परिणाम*

सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याच सुरेख उदाहरण आचार्य विनोबांनी दिले होते.

ते म्हणतात, की आकाशातून पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही… तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांचं अस्तित्वच संपून जाते, तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर पडला, तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला, तर प्रत्यक्ष मोतीच बनतो…

थेंब तोच, परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्यांचं अस्तित्व त्याची पत प्रतिष्ठा अवलंबून असते…!

¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿

कुणीतरी फुलाला विचारले,

झाडावरून तोडले तेव्हा

तुला वेदना झाल्या नाहीत का रे?

फुलाने उत्तर दिले,

तोडणारा इतका आनंदात होता की,

मी माझ्या वेदनाच विसरून गेलो.

¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿

मानवी जीवन यशस्वी व्हायचा

तडजोड हाही एक मार्ग आहे……

माणसाने ती करायला शिकलं पाहिजे;

जिथं जिथं तडा जाईल,

तिथं तिथं जोड देता आला की,

कुठलंच नुकसान होत नाही..!!

तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,

तर ती परिस्थितीवर केलेली

मात असते..!!

¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿

*वाचा विनोद*

संताला आपला कुत्रा विकायचा होता. आणि बंता त्याला विकत घेणार होता.

बंता : हा कुत्रा विश्वासू तर आहे ना?

संता : हो आहेना, मी याला आतापर्यंत तीनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की

प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो.

Thursday, June 3, 2021

काही आधुनिक म्हणी


1) आपला तो खोकला, दुसर्‍याचा तो कोरोना.

2) थांब लक्ष्मी, हातावर सॅनिटायजर देते.

3) कोरोनाचं पोर, अख्ख्या गावाला घोर.

4) गर्वाचे घर लॉकडाउन.

5) माणसाची धाव किराणा दुकानापर्यंत.

6) नवरा वैतागला लॉकडाउनने, बायको वैतागली स्वयपाकाने

7) आधी पोटोबा आणि नंतर पण पोटोबा

8) इकडे बायको तिकडे पोलिस

हसा, टेन्शन कमी होईल….प्रतिकारशक्ती वाढेल…

♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀

प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही… काही दुखणी कुटुंब आणि मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात…

♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂

माणसे घर बदलतात, कपडे, राहणीमान बदलतात, नाते बदलतात, मित्र बदलतात, तरी देखील अस्वस्थ का राहतात? कारण ते स्वता: बदलत नाही!

πππππππππππππππππππππ

मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं, म्हणजे मोठं होत कि नाही ते माहित नाही. पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येतं!

♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀

विनोद ऐका

एक वृद्ध एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले. कितीही मोठा केला तरी ते अजून मोठा करायला सांगायचे. वृद्ध व्यक्ती म्हणाली.

"तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल आधी काढा!"

Monday, May 31, 2021

गोष्ट खूप छोटी असते हो….


तुम्ही गाडीतून जातांना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बर्‍याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, दादा पत्ता सांगता का? असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्हज द्यायचे. कधी स्कीनचं मलम देऊन टाकायचं…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

कमी जागेत बाईक पार्क करतांना तिरक्या स्टँडवर न लावता, सरळ स्टँडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं थँक यू ऐकायला मस्त वाटतं…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणार्‍याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली, तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.

माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

®®®®®®®®®®®®®®®®®®

योगायोग आणि मनाला पडलेला प्रश्न

या वर्षी एकही पाणी टंचाईची बातमी नाही…..

मे महिना संपत आला तरीपण कुठल्या धरणात किती टक्के पाणी आहे याची साधी माहीती चौकशीपण नाही….

ना टँकर, ना पाण्यासाठी

वणवण ….

उलट घरी असल्याने,स्वच्छतेमुळे पाण्याचा वापर जास्त….

मग दरवर्षी खरंच पाणी टंचाई असते का?

ती निर्माण केली जाते?

एक विचार करण्यासारखी गोष्ट…

®®®®®®®®®®®®®®®®®®®

खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती तिष्ठेपेक्षा पण खूप मोठी असते.

&&&&&&&&&&&&&&&&&&&&

शिक्षक : बंड्या, ‘मुलगी खाली उभी आहे’ हे वाक्य इंग्रजीत बोलून दाखव.

बंड्या : सोप्पं आहे सर…

“Mis-Under-standing….

Friday, May 28, 2021

कोरोनाकाळात सायकल उद्योग तेजीत


गेल्या वर्षभरात देशात कोरोनाचे संकट थैमान घालत असल्याचे सगळ्यांना माहिती आहे. या काळामध्ये नागरिकांच्या सार्वजनिक आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर निबर्ंध लादण्यात आले. लॉकडाउनमुळे कोट्यवधी लोकांना घरातच बसावे लागले. अजूनही अनेक राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात लॉकडाउनचेच निबर्ंध लागू आहेत. या पार्श्‍वभूमीवर इतर असंख्य उद्योगांचे आलेख खालच्या दिशेने येत असताना भारतातील सायकल उत्पादन उद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच ऐन कोरोना लॉकडाउन काळात देशात सायकलींची मागणी तब्बल २0 टक्क्यांनी वाढली आहे. क्रिसिल या उद्योगांना मानांकन देणार्‍या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दशकभरात सायकल उद्योगात नोंद करण्यात आलेली ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे.

क्रिसिलने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात सायकलींची मागणी १ कोटी २0 लाखांच्या आसपास होती. मात्र, चालू आर्थिक वर्षांत त्यामध्ये १ कोटी ४५ लाखांपर्यंत वाढ होईल. लोकांमध्ये फिटनेसविषयी आलेली जागृकता आणि कोरोना काळात घरीच बसल्यामुळे असलेला बराचसा मोकळा वेळ यासाठी कारणीभूत ठरल्याचे देखील निरीक्षण क्रिसिलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

उत्पादित केल्या जाणार्‍या सायकलींचे साधारणपणे ४ प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. यामध्ये स्टँडर्ड, प्रिमियम, किड्स आणि एक्स्पोर्ट अशा चार प्रकारांचा समावेश आहे. यापैकी स्टँडर्ड प्रकारच्या सायकलींची मागणी एकूण मागणीच्या साधारण ५0 टक्के असते. या प्रकारच्या सायकली थेट सरकारकडून खरेदी करून विविध प्रकारच्या योजनांमध्ये त्यांचे वाटप केले जाते. त्यानंतर प्रिमियम आणि किड्स या दोन प्रकारच्या सायकलींच्या मागणीचे प्रमाण ४0 टक्क्यांच्या घरात आहे. फिटनेस आणि मोकळा वेळ या कारणांमुळे या प्रकारच्या सायकलींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यानंतर एक्स्पोर्ट आणि इतर प्रकारच्या सायकलींसाठीच्या मागणीचे प्रमाण १0 टक्के आहे.

क्रिसिलने म्हटल्याप्रमाणे, सायकल उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या. एक म्हणजे प्रिमियम आणि किड्स प्रकारच्या सायकलींसाठीची मागणी तब्बल ५0 टक्क्यांपर्यंत वाढली. दुसरे म्हणजे प्रिमियम आणि किड्स या प्रकारच्या सायकलींची मागणी त्यांच्या किंमतीनुसार फारशी कमी-जास्त होत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये जवळपास ६0 ते ६५ टक्के हिस्सा असलेल्या स्टीलसारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत बदल झाला, तरी देखील तो खर्च किंमतीमध्ये वाढवण्यात उत्पादकांना कोणतीही अडचण येत नाही. यामुळे एकूणच सायकल उत्पादकांचा व्यवसाय वाढण्यास मदत झाली आहे.

Wednesday, May 26, 2021

हेही जरा ऐका...!


दीडशे कि.मी. वरून हिमालयाची शिखरे स्पष्ट दिसू लागली .. गंगा नदीचा तळ स्पष्ट दिसू लागला…

दहा पंधरा दिवस घरी शांत बसा, नाहीतर आकाशातून येताना यम सुद्धा स्पष्ट दिसायला लागेल…

@@@@@@@@@@@@@

जातं ओढायला सुध्दा ताकद लागते, पण जातं जास्त ताकद लावून ओढलं ना तर त्याचा खुंटा बाजूला निघून पडतो.

याचा अर्थ असा आहे की,आयुष्याचे दळण जर व्यवस्थित दळायचे असेल तर…

अंगातला अहंकार दूर करून नम्र व्हावं लागतं,तेव्हा आयुष्याचा खुंटा व्यवस्थित चालतो…!!

आज घरी राहिलात तर, उद्याचा दिवस तुमचाच असेल…

@@@@@@@@@@@@@@

एका बाईने डॉक्टरला विचारलं,

जेव्हा माझा नवरा बँकेमधुन घरी येतो तेव्हा मी त्यांना बुट आणि कपडे बाहेर काढायला सांगते, मग डेटॉलने पूर्ण शरीर स्वच्छ करते. मग त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालते मग गुळण्या करायला गरम पाणी आणि लिंबू देते. मग सॅनिटाईझरने हाथ पाय स्वच्छ करते… एवढं पुरेसे आहे का..?

डॉक्टर : जमले तर तुम्ही त्यांना कुकर मध्ये घालून तीन शिट्या घेऊ शकता.

Tuesday, May 25, 2021

व्हॉट्स अप


विनाकारण आपण व्हॉट्सअ‍ॅपला नावे ठेवतो. आपल्याला काय फायदे झालेत ते वाचा.

रोजचं चॅटिंग करता-करता छान टायपिंग करायला शिकलो. रोजचे सॉरी / थँक्सपासून, सर्व व्यवहार पाळायला शिकलो. आपलेच सेल्फी काढता-काढता चांगली छायाचित्रे काढायला पाहायला शिकलो.

नवनवीन मेसेज पाठवताना आपण थोडे वाचायलाही शिकलो. वेगवेगळ्या स्टीकरचा वापर करून…शब्दाविना भाव दाखवायला शिकलो. रोजचे सुविचार वाचून थोडं अध्यात्माकडेही नकळत झुकलो.

कधीकधी कॉमेंट करुन ‘मनमोकळे विचार‘ मांडायला शिकलो. कायम नेट पॅक मारत असताना अनावश्यक खर्चही करायला शिकलो. सुसंवाद वाढवत जाऊन नाती अधिकाधिक जपायलाही शिकलो. छान सुंदर विनोदी प्रसंग वाचून.. इमोजींसह हसायला व हसवायलाही शिकलो. चांगले सकारात्मक विचार दृष्टीत आले की, इतरांशी अशा विचारांची, देवाण घेवाण करणे शिकलो. घर बसल्या मनोरंजन होते आहे, विकासही होतो आहे..!!!

&&&&&&&&&&&&&&&&&&&

सांग सांग भोलानाथ

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? खूप वर्षांपासून चाललेल्या या कवितेला शेवटी यश आलं! आमचं बालपणापासूनच स्वप्न पूर्ण झालं!

&&&&&&&&&&&&&&&&&&&&

सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले यावरून काय बोध घ्यायचा ? यम आणि मृत्यूदेखील तुम्हाला तुमच्या बायकोपासून वाचवू शकत नाही. तेव्हा शांत रहा, बायकोवर प्रेम करा. कारण दुसरा उपाय नाही!


Monday, May 24, 2021

नव्या म्हणी… तेवढ्याच उद्बोधक

 


हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात,

कोरोनाला हरवायला, बसा आपापल्या घरात

मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर,

सगळ्यानी मास्क घालूनच पडा घराबाहेर,

शंकराच्या पिंडीवर बेलाच पान ठेवते वाकून,

रोजचे व्यवहार करा सोशलडिस्टंसिंग राखून

शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा,

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा

ताजमहाल, कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,

लक्षण दिसली कोरोनाची तर डॉक्टरना भेटा थेट

काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,

कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले

चिमणीला म्हणतात चिऊ, कावळ्याला म्हणतात काऊ,

आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ,

चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,

डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप, 

काळजी घ्या, सुरक्षित राहा…

*************************************

वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो… गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो… तसेच चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही… म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणार्‍या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणार्‍या लोकांच्या सानिध्यात राहावे

**************************************

स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो. कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते, म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे…

****************************************

जेव्हा नखं वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो. नखं वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही… त्याचप्रमाणे, जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा, तुमच्यातल्या नात्याला कापू नका… ‘विश्वास’ एखाद्यावर इतका करा की, तुम्हाला ‘फसवताना’ तो स्वत:ला ‘दोषी’ समजेल…

सांगलीचा एव्हरेस्ट वीर संभाजी गुरव


मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक पडवळवाडी (ता. वाळवा) येथील संभाजी गुरव  यांनी जगातील सर्वांत उंच असलेले एव्हरेस्ट शिखर सर करून महाराष्ट्र पोलिस दलाचा झेंडा फडकावला. त्यांच्या या कामगिरीने वाळवा तालुक्‍याचे नाव गिर्यारोहकांच्या यादीत नोंदवले गेले आहे. गुरव यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याची घोषणा संबंधित कंपनीने आपल्या वेबसाईटवर केली आहे.

गुरव मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलाचे ते तिसरे कर्मचारी ठरलेत. गुरव यांना पोलिस दलात भरती होण्यापूर्वी गिर्यारोहणाची आवड होती. ती त्यांनी पोलिस दलात भरती झाल्यानंतरही जोपासली. त्यांनी यापूर्वी आपली शारीरिक क्षमता तपासणीसाठी एव्हरेस्ट बेसकॅम्प प्रशिक्षण  पूर्ण केले होते. त्यानंतर एव्हरेस्ट सर करणारच, असे ध्येय उराशी बाळगून त्यांनी गेली दोन वर्षे अथक परिश्रम केले. एव्हरेस्ट शिखर सर केल्याने त्यांच्या परिश्रमाचे चीज झाले आहे. उणे १९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या एव्हरेस्ट शिखरावर त्यांनी काठमांडू  येथून चढाई करण्यास सुरुवात केली. एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ६५ किलोमीटरचा टप्पा त्यांनी पूर्ण करत १७ मे रोजी बेस कॅम्प २ पर्यंत, १८ मे रोजी बेसकॅम्प ३, १९ मे रोजी बेस कॅम्प ४ आणि २० मे रोजी तेथून एव्हरेस्ट शिखराची चढाई सुरू केली. २१ मेपर्यंत निसर्गाची साथ राहिली, तर एव्हरेस्ट सर करता येईल, अशी आशा होती. वातावरण आणि निसर्गाने साथ दिल्याने शनिवारी (ता. २२) रोजी त्यांनी एव्हरेस्ट शिखरावर आपले पाय रोवले. त्यांच्या या कामगिरीने वाळवा तालुक्‍यासह सांगली जिल्ह्याचे नाव गिर्यारोहकांच्या यादीत सुवर्ण अक्षरांनी नोंदवले गेले आहेच. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

स्वप्न पूर्ण झाले संभाजी गुरव हे वाळवा गावाशेजारील पडवळवाडीचे रहिवासी आहेत. ते सामान्य कुटुंबात जन्मले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षकपदी भरती झाले. त्यांनी यापूर्वी गडचिरोली येथे पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. व्यायाम आणि शारीरिक क्षमता राखण्यावर त्यांचा कायम भर असे. एक दिवस जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करायचे हे त्यांचे स्वप्न होते. ते अनेक वेळा बोलूनही दाखवत. ते कायम व्यायाम व त्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता निर्माण करण्यासाठी धडपडत होते. ८८४८ मीटर उंच एव्हरेस्टवर चढाई करताना त्यांना अनंत अडचणी व बर्फवृष्टीचा सामना करावा लागला; पण त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून एव्हरेस्टवीर हा मानाचा किताब पटकावला.

तिसरे पोलिस कर्मचारीयापूर्वी महाराष्ट्र पोलिस दलातील आयपीएस सुहेल शर्मा, औरंगाबाद येथील पोलिस कर्मचारी रफीक शेख यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यांच्यानंतर संभाजी गुरव हे शिखर सर करणारे तिसरे कर्मचारी ठरले आहेत. दरम्यान सांगली शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील कस्तुरी याही आता एव्हरेस्ट शिखराजवळ पोहोचल्याची बातमी आली आहे. कॅम्पच्या तीनच्या दिशेने चढाई करत आहेत. करवीरकन्या कस्तुरी सावेकरची एव्हरेस्टची अंतिम चढाई सुरू झाली असून बुधवारी (२६) पहाटे ती एव्हरेस्टवर तिरंगा फडकवण्याची शक्यता आहे. एकूणच कोल्हापूरसाठी ही अभिमानाची गोष्ट असून, आज ती कॅम्प दोनवर होती. उद्या (सोमवारी) पहाटे ती कॅम्प तीनच्या दिशेने चढाईला प्रारंभ करणार आहे.

कस्तुरीच्या टीममध्ये एकूण बारा गिर्यारोहकांचा समावेश आहे. ही सर्व टीम सुखरूप असून मंगळवारी (२५) पहाटे कॅम्प चारच्या दिशेने त्यांची चढाई सुरू होईल आणि बुधवारी पहाटे एव्हरेस्टचा शिखर माथा ती गाठेल आणि एव्हरेस्टवर कोल्हापूरचा झेंडा रोवेल, असे आज तिचे वडील दीपक सावेकर यांनी सांगितले. दरम्यान, कस्तुरी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून इतक्या मोठ्या मोहिमेसाठी गेली असून, तिला अनेक सेवाभावी व्यक्ती, संस्था, संघटनांनी आर्थिक बळ दिले आहे. मात्र, तरीही निधी कमी पडला असल्याने मालोजीराजे छत्रपती यांनी तत्काळ पन्नास हजारांची आर्थिक मदत कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे दिली. यावेळी मधुरिमाराजे छत्रपती, उद्योजक तेज घाटगे, जय कामत, यशराजराजे छत्रपती आदी उपस्थित होते.