विकी कौशल-कतरिना कैफ आणि राजकुमार राव-पत्रलेखा यांचे शुभवर्तमान कोरोनाच्या काळात पार पडलं आहे आणि ते आता त्यांच्या कामात चांगले व्यस्त आहेत. आता नंबर रणबीर कपूर-आलिया भट्टचा आहे. आपल्या देशात प्रेम लपवून आणि लग्न बँड वाजवत उघडपणे लग्न केलं जातं. जर कलाकार बॉलीवूडमधला अव्वल कलाकार असेल, तर करिअरच्या अनुषंगाने लग्न उघडपणे किंवा छुप्या पद्धतीने होऊ शकतं. रणबीर-आलियाबद्दल असेही बोलले जात आहे की, दोघांचा जानेवारीत साखरपुडा झाला आहे आणि लवकरच बँडबाजा वाजवत लग्नाची तारीख जाहीर करतील. आणि आता असंही बोललं जात आहे की, जर कोरोना महामारी आली नसती तर आतापर्यंत दोघांचे लग्न कधीच झालं असतं. ते काहीही असले तरी ते एक अनोखे नाते असेल. जर हे लग्न झालं तर बॉलिवूडमध्ये वर्षानुवर्षे सक्रिय असलेली दोन कुटुंबे (नानाभाई भट्ट यांचे नऊ मुलांचे कुटुंब आणि पृथ्वीराज कपूर यांचे सहा मुलांचे कुटुंब) एकत्र येतील. कपूर कुटुंबाकडून अधिकृत तारीख कधी जाहीर केली जाते याकडे रणबीर-आलियाच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Friday, February 11, 2022
रणबीरचं 'शुभमंगलम' आणि कंगना, माधुरीचा गेम शो
विकी कौशल-कतरिना कैफ आणि राजकुमार राव-पत्रलेखा यांचे शुभवर्तमान कोरोनाच्या काळात पार पडलं आहे आणि ते आता त्यांच्या कामात चांगले व्यस्त आहेत. आता नंबर रणबीर कपूर-आलिया भट्टचा आहे. आपल्या देशात प्रेम लपवून आणि लग्न बँड वाजवत उघडपणे लग्न केलं जातं. जर कलाकार बॉलीवूडमधला अव्वल कलाकार असेल, तर करिअरच्या अनुषंगाने लग्न उघडपणे किंवा छुप्या पद्धतीने होऊ शकतं. रणबीर-आलियाबद्दल असेही बोलले जात आहे की, दोघांचा जानेवारीत साखरपुडा झाला आहे आणि लवकरच बँडबाजा वाजवत लग्नाची तारीख जाहीर करतील. आणि आता असंही बोललं जात आहे की, जर कोरोना महामारी आली नसती तर आतापर्यंत दोघांचे लग्न कधीच झालं असतं. ते काहीही असले तरी ते एक अनोखे नाते असेल. जर हे लग्न झालं तर बॉलिवूडमध्ये वर्षानुवर्षे सक्रिय असलेली दोन कुटुंबे (नानाभाई भट्ट यांचे नऊ मुलांचे कुटुंब आणि पृथ्वीराज कपूर यांचे सहा मुलांचे कुटुंब) एकत्र येतील. कपूर कुटुंबाकडून अधिकृत तारीख कधी जाहीर केली जाते याकडे रणबीर-आलियाच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Thursday, February 10, 2022
आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण
जत,(प्रतिनिधी)-
आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य रांगोळी स्पर्धेचे वितरण जत येथील रामराव विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये समारंभपूर्वक घेण्यात आले. यावेळी रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार, जत तालुका काँगेस सेवादलचे अध्यक्ष मोहन मानेपाटील, लेखक मच्छिंद्र ऐनापुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जत विधानसभेचे आमदार आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत शहरात भव्य प्रमाणात विविध गटात रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. जत हायस्कूल, बालविद्यामंदिर, आणि रामराव विद्यामंदिरसह अनेक शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण विजेत्या विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये करण्यात आले.
रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील कु. श्रेया रवींद्र साळे (6 वी), कु.राखी गोरखनाथ साळे (7वी), कु.सृष्टी उत्तम बिरुगणे (5वी), कु. अक्षता अशोक दुधाळ (5वी), कु.सोनाली रामलिंग कोटी (6वी), कु.समृद्धी शंकर घोडके (8वी), कु.श्रेया बाळू शिंदे (8वी) या विद्यार्थीनींनी विविध गटात यश मिळवले.त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना मोहन मानेपाटील म्हणाले, विक्रम प्रतिष्ठान आणि काँग्रेसच्यावतीने विविध स्पर्धा, उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कलागुण बहरत न्यावेत. लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी मुलांनी विद्यार्थी दशेतच आपला छंद आणि हिरो निवडावा असे आवाहन केले. यावेळी पर्यवेक्षक संजीव नलावडे, जितेंद्र शिंदे, सुभाष शिंदे, वसंत जाधव, शरद जाधव, सचिन चव्हाण उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक बबन संकपाळ यांनी केले . आभार जितेंद्र शिंदे यांनी मानले.
Wednesday, February 9, 2022
विट्याचे सुपुत्र विसुभाऊ बापटांचा 'कुटुंब रंगलय काव्यात'च्या माध्यमातून चारी दिशा डंका
विसुभाऊ बापटांचं 'कुटुंब रंगलय काव्यात' हा हटके कार्यक्रम. सादरीकरणाच्या वेगळेपणामुळं रसिकांनी डोक्यावर घेतल्याचं त्याच्या तीन हजारांवर पार प्रयोगामुळं दिसून येतं. विसुभाऊ बापट मूळचे सांगली जिल्ह्यातील विट्याचे! इथल्या महात्मा गांधी विद्यामंदिरात शिकले. लहानपणापासून कविता आणि गाण्यांची आवड असलेल्या विसुभाऊ बापटांचा पुढे छंदच झाला. त्यांच्या तोंडातून ओघवत्या शैलीत एक से बढकर एक कविता बाहेर पडू लागल्या आणि जन्माला आला 'कुटुंब रंगलय काव्यात' हा कार्यक्रम.
विसुभाऊ बापटांचं 'कुटुंब रंगलय काव्यात' हा प्रेक्षक रसिकांनी नावाजलेला हटके कार्यक्रम आहे. एकादी साधीशी गोष्टही काव्यात्मक पद्धतीने सांगण्याची हातोटी लाभलेल्या विसुभाऊंनी 'वाक्यं रसात्मक काव्यं' या उक्तीप्रमाणे वाक्यांत रसपूर्ण काव्य करून टाकलं आहे. ओंकारसाधना, मुंबईनिर्मित 'कुटुंब रंगलय काव्यात' या एकपात्री काव्यनाट्यानुभवाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कवितेचं बीज नव्यानं रोवलं आहे. प्रस्थापित तसेच नवोदित कवींच्या कवितांचा संच घेऊन ते गेली चार दशकांहून अधिक काळ रसिकांना आनंद देत आहेत. रसिक त्यांच्या या काव्यात्मक कार्यक्रमात अक्षरशः न्हाऊन निघत आहेत.
दोन -तीन वर्षांपूर्वी 'कुटुंब रंगलय काव्यात' या सलग 15 तास चाललेल्या काव्य सादरीकरणाची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने घेतली. या अगोदर वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्समध्ये या कार्यक्रमाची नोंद झाली आहे. 1981 पासून याचे प्रयोग सादर केले जात आहेत. आता 'कुटुंब रंगलय काव्यात'ला 41 वर्षे पूर्ण झाली आहेत. बापट त्यांच्या शब्द आणि सुरांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना कवितेच्या अद्भुत जगाची सफर घडवून आणत आहेत. 'जे न देखे रवी ते देखे कवी' असे म्हटले जाते, त्यामुळे निरनिराळ्या कवींच्या दृष्टिकोनातून हे जग जाणण्यासाठी तसेच कवितेच्या या जगाची एक झलक 'कुटुंब रंगलय काव्यात' या कार्यक्रमातून अनुभवता येते.
महाराष्ट्रातील असा एकही ख्यातनाम कवी नसेल की ज्याची कविता विसुभाऊंना पाठ नसेल. अफाट पाठांतर आणि हार्मोनियम वाजवत अफलातून सादरीकरण हे वैशिष्ट्य. त्यांच्या भात्यातून एक ना अनेक कविता जेव्हा बाहेर पडतात तेव्हा परिसर मंत्रमुग्ध होतो. बोबड्या बाळाच्या तोंडच्या शब्दापासून म्हाताऱ्या -कोताऱ्याची बोली ,एकादी हळुवार प्रेमकविता असो किंवा शौर्य रसातील ओळी, विसुभाऊ डोळ्यांतून कधी आसू तर चेहऱ्यावर कधी हसू निर्माण करतात, हे कळतच नाही. वऱ्हाडी, कोकणी, आगरी अशा विविध कवितांचा त्यात समावेश असतो. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षक रसिकांनीच फक्त डोक्यावर घेतले नाही तर महाराष्ट्राबाहेर आणि जगभरातही त्यांच्या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.