Monday, September 28, 2020

रामपूर किल्ल्याची किल्लाप्रेमींकडून स्वच्छता


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जतपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर पूर्वेला सांगली मार्गावर  शिवकालीन  रामदुर्ग किल्ला आहे. त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. सध्या इथे झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली होती.  रामदुर्गटीम  व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकऱयांच्यावतीने  किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. झाडे-झुडपे हटवण्यात आली आहेत. याला रामपूर ग्रामपंचायतीनेही मोठ्या प्रमाणात साथ दिली.

जतपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर शिवकालीन रामदुर्ग किल्ला आहे. येथे राबवण्यात आलेल्या  स्वछता मोहिमेदरम्यान गडावर वाढलेली अनावश्यक झाडे काढण्यात आली. तसेच गडावरील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.गडावरील महादेवाची पूजा करून व ध्येय मंत्र म्हणून कामाची सुरुवात करण्यात आली. त्याच बरोबर मंदिराच्या मधील दडपल्यागेलेल्या गोमुखास मोकळा श्वास देण्यात आला.यावेळी सांगलीमधून टीम रामदुर्ग चे स्वप्नील भजनाईक,गणेश घम,हेमंत खैरमोडे तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जत शाखेचे धारकरी सिद्धगोंडा पाटील, ग्रामपंचायत रामपूर चे माजी सरपंच.मारुती पवार ,सरपंच रखमाबाई कोळेकर,तानाजी कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते मनोहर शिंदे,प्रमोद शिंदे,प्रशांत शिंदे,टीम किल्ले रामदुर्ग चे मावळे व रामपूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.यआ सगळ्यांनी मिळून गडाची स्वच्छता केली. 


Saturday, September 26, 2020

शेवटी अंतर राहूनच गेलं...

 *शेवटी अंतर राहूनच गेलं...*

लहानपणी प्रवास करताना आई

घरून डबा करून द्यायची; पण

बाकीच्या लोकांना विकत घेऊन

खाताना बघितले की खूप वाटायचं,

आपणही विकत घेऊन खावं. पण

बाबा म्हणायचे, ती श्रीमंत माणसं,

पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाही.

मोठेपणी विकत घेऊन खाताना बघितले, तर आरोग्याची काळजी

म्हणून बाकी लोकं घरून करून आणलेला डबा खाताना दिसू

लागली.

शेवटी अंतर राहूनच गेलं..

लहानपणी जेव्हा मी सुती कपडे घालायचो, तेव्हा बाकी लोक

टेरिकॉट कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे कपडे घालावे.

मोठेपणी आम्ही टेरिकॉट घालायला लागलो आणि ते सुती. सुती कपड़े महाग झाले. परत शेवटी अंतर राहूनच गेलं..

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई

छानपैकी शिवायची, पण शिवलेलं कोणाला दिसू नये ही माझी धडपड आसायची.

मोठेपणी गुडघ्यावर फाटलेले कपड़े

दामदुपटीने घेताना बघितले.

शेवटी अंतर राहूनच गेलं..

आता कळलं,

हे अंतर असंच कायम राहणार,

मनाशी पक्कं केलं.

जसा आहे. तसाच रहा,

मजेत रहा...

●●●●●●

जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा

चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.

●●●●●●

आरशापुढे उभे असलेल्या पत्नीने पतिदेवाला विचारले - मी खूप जाड दिसते का?

पतीने निरुपयोगी भांडणे टाळण्यासाठी सांगितले - मुळीच नाही!

बायको आनंदी झाली आणि म्हणाली- ठीक आहे, मग मला आपल्या दोन्ही हातांनी उचलून घ्या आणि फ्रीजजवळ घेऊन चला. मी आइस्क्रीम खाईन!

परिस्थिती अनियंत्रित होत असल्याचे पाहून नवरा म्हणाला...

"थांब,.... मी फ्रीजच आणतो!"


जावयांचे प्रकार...

 *जावयांचे प्रकार...*

आपल्याकडे जावयाचे चार प्रकार पडतात...

१) साखऱ्या जावई :

साधारणतः २ टक्के जावई या प्रकारात मोडतात. ते १०० किलोमीटरपेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्या मुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जातात. म्हणून या जावांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडेलत्ते देऊन यांचा मानपान होतो. चांगलीच बडदास्त असते याची. म्हणून हा साखऱ्या जावई... जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे...

२) भाकन्या जावई:

या प्रकारात ९५ टक्के जावई मोडतात. हे जावई सासुरवाडीच्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर जात असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई वडिलांची आठवण आली तर तिच्या सोबत जावे

लागते. यांचे जाणे येणे नेहमीचे असते त्यामुळे या जावयाला खाण्यासाठी जे घरात केले तेच वाढले जाते. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते... हा नेहमीचाच म्हणून काही खास मानपान नसतो, म्हणून हा भाकन्या जावई...

३) ढोकऱ्या जावई :

या प्रकारात २ टक्के जावई सापडतात. हे घरजावई असतात. या जावयाला घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दुध असे आणून द्यावे लागते. झाड लोटीची कामे पण करावी लागतात. हा घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस तरी याचा अपमान नक्कीच केला

जातो. म्हणून हा ढोकऱ्या जावई...

४) दयावान जावई:

हा जावई सासरच्या लोकांना कायम मदत करतो. बायकोच ऐकतो. मेहुण्याला उसने पैसे देतो. त्याला सासरची मंडळी त्याला कायम गोड-गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढवून चांगलेच लुटतात. हा १-२ वर्षातून सासरी येतो, त्यावेळी त्याचेकडे आजूबाजूचे लोक दयेने बघतात म्हणून हा दयावान जावई...

आता तुम्हीच ठरवा आपण स्वत: कोणते जावई आहोत ते...?

●●●●●●

जो शर्यतीत धावणाऱ्या चाबकाचे फटके आणि चटके मिळतात म्हणून तो धावत राहतो. त्याला माहित नाही तो का धावतो?

जर आयुष्यामधे तुम्हाला फटके आणि चटके

पडत असतील तर परमेश्वर तुमचा राइडर आहे, तो फटके आणि चटके देतोय कारण तुम्ही जिंकणार

आहात!

●●●●●●

*विनोद*

तो : साहेब, हे बघा, हेल्मेट आहे डोक्यावर, पोल्युशन

सर्टिफिकेट, इन्शुरन्स, आरसी बुक सगळं आहे, अजुन काही राहिलंय?

साहेब : अरे पण गाडी कुठाय?

तो : तुम्ही दिसलात म्हणून मागे पार्क करून आलोय, कागदपत्र चेक करून घेतले, आता आणतो...


एका दारूच्या बाटली मागचे अर्थकारण*

 *एका दारूच्या बाटली मागचे अर्थकारण*

लक्षात ठेवा, एक बाटली मागे,

शासनाला महसूल,

वेटरला टीप,

हॉटेल व्यवसाय,

कर्मचारी रोजगार,

सोडा पाणी बाटली उद्योग,

फूड इंडस्ट्री,

चिकन मटण शॉप,

पोल्ट्री उद्योग,

शेळीपालन,

मसाले व इतर गृह उद्योग,

भंगारवाल्याला बाटली,

चकण्यामुळे बचत गटातील महिलांना पापडाची ऑर्डर,

असे अनेक अर्थचक्र या वर आहे,

परत जास्त झाली की दवाखाने आहेत,

 भानगडी झाल्या वर पोलीस व वकील आहेतच.

 आजपासून दारुडा अजिबात म्हणायचे नाही.

मग म्हणणार ना *अर्थसैनिक*?

●●●●●●

*शब्द*

माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार... कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात. परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करित असतात.

जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात

शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात

शब्द यश देतात, शब्द नातं देतात

शब्द आयुष्यभर आणि आयुष्या नंतरही मनामनात जपणारी भावना देतात.

 शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल

होतं.

●●●●●

*वाचा विनोद*

समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिटं हात हलवत होती..

मग बंड्याने पण हात केला, तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला, व म्हणाली ती खिडकीची काच

पुसतेय...


*कुणावर तरी प्रेम करावे*

 *कुणावर तरी प्रेम करावे*

जमेल तसे प्रत्येकाने, कुणावर तरी प्रेम करावे!

कधी संमतीने, कधी एकतर्फी; पण, दोन्हीकडे सेम करावे!

प्रेम सखीवर करावे,

बहिणीच्या राखीवर करावे!

आईच्या मायेवर करावे,

बापाच्या छायेवर करावे!

प्रेम पुत्रावर करावे,

दिलदार शत्रूवरही करावे!

प्रेम मातीवर करावे,

निधड्या छातीवर करावे!

कोटर अंम कट्टा

शिवबाच्या बाण्यावर,

लतादीदींच्या गाण्यावर

सचिनच्या खेळावर आणि

वारकऱ्यांच्या टाळावरही

करावे!

 प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे,

गणपतीच्या मस्तकावरही करावे!

महाराष्ट्राबरोबरच देशावर आणि न चुकता

स्वतःवर जमेल तसे प्रेम करावे!

●●●●●

*ध्यान का करावे?*

लोक एकत्रितपणे साधना केल्याने त्यांच्या लहरी दूरवर

पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. आइन्स्टाईनने

शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितले आहे की एका अणुचे

विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे

विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनींनी आपल्याला हजारो

वर्षांपूर्वी सांगितली आहे. आपण ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.

आपण आपली भौतिक, तसेच आध्यात्मिक प्रगती

ध्यानामुळे कमी श्रमात साधू शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

●●●●●

*वाचा विनोद*

कोंबडीचे पिल्लू कोंबडीला विचारते,

'आई, माणसाच्या बाळाचे जसे नाव ठेवतात; तसे आपल्यात का नाही.'

 कोंबडी म्हणते, 'आपल्यात मेल्यावर ठेवतात. चिकन चिली, चिकन मसाला, चिकन लॉलीपॉप, चिकन तंदूर, चिकन ६५, चिकन सूप, चिकन मंचूरी.'


Tuesday, September 15, 2020

लवकुमार मुळे यांची आयुष्याला भिडणारी कविता

 'कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे'


कल्पना आणि भावनांची भाषा म्हणजे कविता असे हँझलीट या भाषा विमर्शकाने म्हटले आहे, तर उत्कट भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे काव्य असे वर्डस्वर्थने म्हटले आहे. म्हणजेच कविता ही एकप्रकारे प्रतिमा प्रतिकांची सेंद्रिय रचना असते आणि कवी या रचनेतून आपला भवताल शब्दबद्ध करत असतो. स्वतःला व्यक्त करत असतो. त्याच्या ह्रदयात धगधगणारे रसायन त्याला शब्दांच्या द्वारे तो वाट करून देत असतो.

         लवकुमार मुळे असाच एक भावनाशील व्यक्तित्व लाभलेला कवी. गुलमोहर, भावमुद्रा, काळीजवेणा,अर्धवेलांटी आणि आता कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे असा कवीचा काव्यप्रवास चालू आहे. गुलमोहर मधल्या काही कविता रोमँटिक वातावरणातल्या होत्या पण आताचा कवितासंग्रह मात्र कवीला वास्तवाचे असणारे भान दर्शवणारा आहे.

       जागृती प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहात एकूण छप्पन कविता असून त्यासाठी कवीने मुक्तछंद, ओवी, अभंग ,द्विपदी इ.रचना प्रकार उपयोगात आणले आहेत. कवीची शब्दांवरची हुकूमत आपणाला प्रत्येक कवितेतून जाणवत राहते.लयबद्धता ,अल्पाक्षरत्व, व्यापक जीवनाशय क्षमता ,संवेद्यता, आशय व अभिव्यक्तीतील एकात्मता ही महत्वाची काव्यलक्षणे या कवितांमधून ठळकपणे दिसून येतात.

    "जिंदगानी खपली सारी आयुष्याची पखाली वाहताना"या एकाच ओळीतून आबाचे कष्टमय जीवन कवी शब्दबद्ध करतो. तर अवतीभवती या कवितेतून"ऐसपैस बसून बघ सारी नावे गोंदू

अवतीभवती जमलेले सगळे श्वास बांधू"असा समन्वयवाद मांडतो.

        काही कवितांसाठी कवीने अभंग हा रचना प्रकार निवडला आहे. प्राचीन संत मंडळींनी हा रचना प्रकार अध्यात्म, देव,पारलौकिक जीवन यांच्या प्रकटनासाठी स्विकारला होता. पण कवीने आपल्या परिसरातील कायमच्या दुष्काळाची दाहकता सांगण्यासाठी अचूकपणे वापरला आहे."जगण्याचा गुंता,आटलेले पाणी

झर्यालाच वाणी मुकलेली"अशी साडेतीन चरणी रचना कवी या ठिकाणी करतो व दुष्काळी भागातील पाणीटंचाई झर्याच्या प्रतिकातून मांडतो.

      "कविता"या कवितेत कवीला एक सनातन असा प्रश्न पडला आहे. तो कवितेच्या निर्मितीसंदर्भातला "परिस्थितीच्या बंधातून की खोल वेदनेच्या वावरातून

नक्की कुठून येते कविता...?"

       शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा. बहुसंख्य लोकसंख्या या व्यवसायात आहे पण शेती हा बेभरवशाचा धंदा झाला आहे. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हतबल झाला आहे."आयुष्यभर ऐकत आलो सुर-असुरांच्या युद्धकथा

कुणीच ऐकून घेत नाही माझ्या कुणब्यांची व्यथा"ही शेतकरी जीवनाची परवड कवी शब्दबद्ध करतो.

     ..कवी निराशावादी नाही. अंधारबनीस्थितीतही त्याने आशा सोडलेली नाही."गवसेल कधीतरी उजेडाची लख्ख दिशा

बेभान वादळाचे चक्रावर्त भेदतो मी"असा आशावाद कवीच्या मनात टिकून आहे.

      "चिमणीत तेल नाही शोध चालू आहे

अंधारात चोरट्यांचा बोध सुरु आहे"या द्विपदीतून कवी सामाजिक वास्तव उलगडत जातो. कवीचा जीवनप्रवास"चक्रीवादळ कधी त्सुनामी लाट

स्वत्वात हरवलेली प्रत्येक पाऊलवाट..."असा खडतर होत असताना"आयुष्याच्या वळचणीचा सारा पसारा इस्कटलेला

भुईभेगा लिंपताना जीव नुसता मेटाकुटीला..."अशा तर्हेने त्रासलेल्या वेदनेने ग्रासलेल्या जीवनाचा लेखाजोखा कवी आपणासमोर ठेवतो.

         माणूस हा समाजशील व भोवतीच्या परिस्थिती शी समायोजन साधणारा प्राणी आहे. वाळवंट, जंगल, हिमाच्छादित प्रदेश, कुठेही तो वास्तव्य करून राहतो. निसर्गाशी तडजोड करून राहतो. तशाच प्रकारे तो सामाजिक घटकांशीही समरस होतो."कुठे चाललेत हे दिशाहीन पाय

रस्ता संपत नाही अजूनही

व्यवस्थेच्या तिरडीसोबत चालताना"

        काही कवितांतून कवीच्या व्यक्तिगत जीवनाचे चित्रणही आले आहे. प्रेमळ पित्याचे मन "शब्दफुल"या कवितेतून मांडताना कवी लिहून जातो"लहान थोर झाली पोर

आली गौर हळदीला"

     " पिंपळपार व पिंपळछाया "या कवितांमधून निसर्गातल्या अबोल घटकांना ही मुखर केले आहे. गावोगावी असणारी ही झाड -पेडं ,गावगाड्यातील अनेक घटनांची मूक साक्षिदार असतात. श्रांत क्लांत मनाला विसावा देण्याचे काम करत असतात.

       सामान्य माणसाचा संसार हा एकप्रकारचा जीवनसंघर्षच असतो हे कवीने"तुझ्या माझ्या जगण्याचे कसे झाले रणांगण"अशा शब्दांतून सांगितले आहे."जन्म कशासाठी हा विचार हाय बाकी

आयुष्य पेलून सारं आलं आहे नाकी"कविचा परिसर कायमदुष्काळीभाग रानबाभळीचीच झाडं जीथं रूजतात,तग धरून राहतात पण तेथील माणसं मात्र आतून उन्मळून पडलेली असतात. त्या झाडांच्या सावलीतही मनातली तगमग कमी होत नसते तर वाढतच जाते."अशांत सावली, भग्न वाळवंटी

भूत मानगुटी,बसलेले..."

     धर्म, अर्थ, काम, व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले गेले आहेत. यातील दोन गोष्टी सामान्यांसाठी आहेत. त्या म्हणजे अर्थार्जन व प्रजोत्पादन. धर्म व मोक्ष या गोष्टी प्रामुख्याने अलौकीकांसाठी आहेत. पण या पूर्ण करताना होणारी स्थिती कवी मांडतो."घर,लग्न, विहीर कसोशीनं केली पार

अजून आली ना आयुष्याला नवी धार"अशी कबुलीच जणू कवी देतो. लौकिक, प्रापंचिक जीवनात जरी कवी उदासीनता दर्शवत असला तरी कवीच्या काव्य लेखनाला मात्र एक वेगळीच धार,एक वेगळीच उंची प्राप्त झाल्याचे चित्र या संग्रहातून दिसून येते. कवीच्या पुढच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा!

-एकनाथ गायकवाड

जनता विद्यामंदिर, त्रिंबक ता.मालवण जि.सिंधुदुर्ग पीन .416614 मो.नं.9421182337