भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास भारतीयांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे मत प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले आहे. २0१८ साली रेमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणार्या वांगचुक यांनी युट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामधून त्यांनी भारतीय खूप मोठय़ा प्रमाणात चीनला प्रत्यक्षपणे आर्थिक मदत करत असतात असे म्हटले आहे. एकीकडे भारतीय सैन्य चीनला गोळ्यांनी म्हणजेच बुलेट्सने उत्तर देत असतानाच मुंबई, दिल्ली, बेंगळुरूबरोबरच देशातील सर्व भागांमधील नागरिकांनी चीनला पाकिटातून म्हणजेच वॉलेटच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे असे मत वांगचुक यांनी व्यक्त केले आहे.
Sunday, May 31, 2020
कवी महादेव बुरुटे : उभं आयुष्यच लाॅकडाऊन
ध्यानीमनी नसताना भारतात कोरोना व्हायरस ने छुपा प्रवेश केला आणि त्याच्या विघातकतेमुळे माणसांचं जगणंच सावधगिरीचा उपाय म्हणून लॉकडाऊन झालं. पायाला आधुनिकतेची चक्रं बांधलेल्या सर्वांना घरात कोंडून ठेवल्यासारखे झाले आहे. पण ही वेळच अशी आहे - आपल्यासाठी, घरच्या लोकांसाठी, आपल्या लाडक्या मुलाबाळांसाठी हे आज गरजेचे आहे. चाळीस एक दिवस ही अवस्था अनुभवत असताना लोकांना बांधून घातल्यासारखे झाले आहे. पण उभं आयुष्यच ज्याच्या नशिबी लॉकडाऊन आहे त्यांचं काय? असेच आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती व ध्येयनिष्ठेने वाटचाल करीत आपलं असह्य जीवन विविध लोकोपयोगी, समाजाभिमुख मार्गानी सुसह्य करीत हसतमुखाने परिस्थितीला सामोरे जाणारे शेगांव येथील कवी, साहित्यिक महादेव बुरुटे.
Friday, May 29, 2020
उत्तम प्रशासक :मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे
सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सनमडी संचलित राजर्षी शाहू महाराज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे हे 31 मे रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. संस्थेची मुहूर्तमेढ लावलेल्या श्री . कारंडे सरांनी आपल्या कामांतून संस्थेच्या विस्ताराला मोलाचा हातभार लावलाच शिवाय तालुक्यात संस्थेची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांनी आपल्या तालुक्यातील भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी या शिक्षण संस्थेची निर्मिती केली.
Friday, May 22, 2020
Thursday, May 21, 2020
खरीपपूर्व मशागतींची धांदल सुरू
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या सांगली जिल्ह्यात खरीपसाठी मशागतींची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याच्या वार्तेने मशागती कामांची धांदल उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शेत मशागतींच्या कामांना विलंब झाला होता. दरम्यान यंदा खते शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधवरच उपलब्ध केली जाणार आहेत.
सध्या सांगली जिल्ह्यात खरीपसाठी मशागतींची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याच्या वार्तेने मशागती कामांची धांदल उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शेत मशागतींच्या कामांना विलंब झाला होता. दरम्यान यंदा खते शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधवरच उपलब्ध केली जाणार आहेत.
Wednesday, May 13, 2020
पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्याविषयी जयंत पाटील यांचा निर्णय स्वागतार्ह
प्रकाश जमदाडे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा) -
पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्यविषयी जो निर्णय मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे, तो निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीचे माजी सभापती व रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील साहेब यांनी पूराचे पाणी दुष्काळ तालुक्यास देणेसाठी पाटबंधारे खात्याला प्रस्ताव तयार करणेच्या सुचना दिल्या आहेत. या निर्णयाचा आम्ही स्वागत करीत आहोत. सन २००५ सालापासून आम्ही याची मागणी करीत आहोत कारण, जत तालुक्यात एकही बारमाही नदी नाही पावसाचे प्रमाण आतिश्य कमी आहे.
जत,(जत न्यूज वृत्तसेवा) -
पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्यविषयी जो निर्णय मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे, तो निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीचे माजी सभापती व रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील साहेब यांनी पूराचे पाणी दुष्काळ तालुक्यास देणेसाठी पाटबंधारे खात्याला प्रस्ताव तयार करणेच्या सुचना दिल्या आहेत. या निर्णयाचा आम्ही स्वागत करीत आहोत. सन २००५ सालापासून आम्ही याची मागणी करीत आहोत कारण, जत तालुक्यात एकही बारमाही नदी नाही पावसाचे प्रमाण आतिश्य कमी आहे.
Thursday, May 7, 2020
सांगली जिल्ह्यात वाहन अपघातात घट
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
गेल्या चाळीस दिवसांपासून लॉक डाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहने जाग्यावर थांबून आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात या चाळीस दिवसांत वाहन अपघातांमध्ये घट आली आहे. एप्रिल महिन्यात फक्त 19 अपघातांची नोंद झाली आहे. 2019 हीच संख्या 62 इतकी होती.
गेल्या चाळीस दिवसांपासून लॉक डाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहने जाग्यावर थांबून आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात या चाळीस दिवसांत वाहन अपघातांमध्ये घट आली आहे. एप्रिल महिन्यात फक्त 19 अपघातांची नोंद झाली आहे. 2019 हीच संख्या 62 इतकी होती.
दहा पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद होणार?
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या शाळांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी ऑनलाईन'वेबिनार' मध्ये दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांच्या आसपासच्या शाळा आयडेंटिफाय करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे. सांगली जिल्ह्यात कमी पटाच्या 121 शाळा आहेत.
दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या शाळांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी ऑनलाईन'वेबिनार' मध्ये दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांच्या आसपासच्या शाळा आयडेंटिफाय करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे. सांगली जिल्ह्यात कमी पटाच्या 121 शाळा आहेत.
Wednesday, May 6, 2020
पालक व मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग सुरु
एस.सी.ई.आर.टी.पुणेचा उपक्रम- प्राचार्य डॉ.होसकोटी
सोन्याळ,(लखन होनमोरे यांजकडून)-
सांगली जिल्ह्यामध्ये पालक व मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग एस.सी.ई.आर.टी.पुणे यांच्यामार्फत मोफत तज्ञांचे समुपदेशन , मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य डाॅ. रमेश होसकोटी यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये पालक व मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग एस.सी.ई.आर.टी.पुणे यांच्यामार्फत मोफत तज्ञांचे समुपदेशन , मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य डाॅ. रमेश होसकोटी यांनी केले आहे.
Monday, May 4, 2020
मुलांना ऑनलाईन शिक्षणाची गरज आहे का?
माफ करा पण शिक्षक आहे म्हणून बोलावेसे वाटते.....
खरेच ऑनलाईन अभ्यासाची लहान मुलांना गरज आहे का...? मला असे वाटत नाही.. बऱ्याच शाळा ऑनलाईन सुरू झाल्या. ऑनलाईन लेक्चर, ऑनलाईन छंदवर्ग, ऑनलाईन स्पेशल ट्युशन वगैरे वगैरे..... पण यात तुमच्या लक्षात येते आहे का की मुले बरेच तास । स्क्रीनसमोर आहेत... आणि याच स्क्रीनसाठी ते पॅनिक होत आहेत... तुमचे खरेच आहे की लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे... पण काही पालकांना ही याचे अप्रूप आहे. आमची मुले ऑनलाईन अभ्यास करतात, याचे समाजमाध्यमावर फोटोही टाकले... छान.... पण यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांचे काय? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहे...
खरेच ऑनलाईन अभ्यासाची लहान मुलांना गरज आहे का...? मला असे वाटत नाही.. बऱ्याच शाळा ऑनलाईन सुरू झाल्या. ऑनलाईन लेक्चर, ऑनलाईन छंदवर्ग, ऑनलाईन स्पेशल ट्युशन वगैरे वगैरे..... पण यात तुमच्या लक्षात येते आहे का की मुले बरेच तास । स्क्रीनसमोर आहेत... आणि याच स्क्रीनसाठी ते पॅनिक होत आहेत... तुमचे खरेच आहे की लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे... पण काही पालकांना ही याचे अप्रूप आहे. आमची मुले ऑनलाईन अभ्यास करतात, याचे समाजमाध्यमावर फोटोही टाकले... छान.... पण यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांचे काय? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहे...
स्वच्छता व सोशल डिस्टन्समुळे आजाराच्या प्रमाणात घट
जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या 'कोरोना' मुळे सरकारी हॉस्पिटल्स सोडले तर इतर सर्व हॉस्पिटल काही ठराविक वेळेसाठी सुरू राहतात. खासगी हॉस्पिटलमध्ये नेहमी दिसणाच्या रुग्णाच्या झुंडी, औसंडून वाहणारे वॉरई, ओ.पी.डी.च्या रांगा, मेडिकल दुकनांमधील गर्दी... सारे बही थांबले आहे.
सध्या 'कोरोना' मुळे सरकारी हॉस्पिटल्स सोडले तर इतर सर्व हॉस्पिटल काही ठराविक वेळेसाठी सुरू राहतात. खासगी हॉस्पिटलमध्ये नेहमी दिसणाच्या रुग्णाच्या झुंडी, औसंडून वाहणारे वॉरई, ओ.पी.डी.च्या रांगा, मेडिकल दुकनांमधील गर्दी... सारे बही थांबले आहे.
वृत्तपत्र उद्योगाचे दोन महिन्यात 4 हजार कोटींचे नुकसान
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील वृत्तपत्र व्यवसाय पूर्ण डबघाईला आला आहे. त्याचबरोबर पेपर वाटणाऱ्या पोरांचाही रोजगार बुडाला आहे. गावात आणि खेड्यात राबत असलेल्या बातमीदारांच्याही पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जाहिराती बंद झाल्याने कमिशनवर जगणारे पत्रकार आणि जाहिरातीवर आपला चौथा स्तंभ अबाधित ठेवणारे वृत्तपत्र उद्योग यांची अर्थव्यवस्था बिघडली आहे. आता यांच्या मदतीसाठी शासनाकडेच आर्थिक सहाय्याची मागणी केली जात आहे.
गड्या, आपला गावच बरा!
लॉकडाऊनमुळे गावांतील लोकसंख्येत सात टक्क्यांनी वाढ
भारत देश खर्या अर्थाने ४0 हजार खेड्यांमध्येच वसला आहे, त्यामुळे गावाकडेच चला, असे महात्मा गांधी म्हणायचे. अर्थात महात्मा गांधींच्या त्यामागचा उद्देश हा गाव-खेड्यांच्या विकासाच्या दृष्टीचा होता. पण सध्या देशातील कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे आणि शहरांमध्ये कोरोनाचे भय जास्त असल्याने याकाळात गावातील लोकसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही वाढ सात टक्के इतकी नोंदवली गेली आहे.
भारत देश खर्या अर्थाने ४0 हजार खेड्यांमध्येच वसला आहे, त्यामुळे गावाकडेच चला, असे महात्मा गांधी म्हणायचे. अर्थात महात्मा गांधींच्या त्यामागचा उद्देश हा गाव-खेड्यांच्या विकासाच्या दृष्टीचा होता. पण सध्या देशातील कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे आणि शहरांमध्ये कोरोनाचे भय जास्त असल्याने याकाळात गावातील लोकसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही वाढ सात टक्के इतकी नोंदवली गेली आहे.
Sunday, May 3, 2020
सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्याने काही प्रमाणात सुट
तरी सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्यच
सांगली, (जत न्यूज वृत्तसेवा) -
लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या झोनमध्ये सांगली जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आल्याने काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंग पाळणे, आनावश्यक गर्दी न करणे, मास्क वापरणे या अटी शर्तीना अधिन राहून देण्यात शिथिलता आले आहे.
सांगली, (जत न्यूज वृत्तसेवा) -
लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या झोनमध्ये सांगली जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आल्याने काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंग पाळणे, आनावश्यक गर्दी न करणे, मास्क वापरणे या अटी शर्तीना अधिन राहून देण्यात शिथिलता आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)