जत,(प्रतिनिधी)-
शासनाने दुष्काळाच्या सोयी व सवलती जाहीर केल्या आहेत
.परंतु त्याची अमंलबजावणी अद्याप सुरू करण्यात आली नाही .बंद असलेली अंमलबजावणी
त्वरित सुरू करण्यात यावी या मागणीसह इतर विविध मागण्यासाठी जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जत तहसीलदार कार्यालयासमोर
आज ठिय्या आंदोलन करण्यात आले .
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
शासनाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात येत आहे अशी घोषणा केली आहे.
परंतु विद्यार्थ्याकडून शिक्षण संस्थेत सक्तीने फी भरून घेतली जात आहे . भरून
घेतलेली फी विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्वरित परत वर्ग करण्यात यावी. पाणीटंचाई
जाणवत असलेल्या गावातील नागरिकांनी टँकरची मागणी
केल्यानंतर प्रशासनाकडून टँकर मंजूर
करण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र
पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.