Friday, December 4, 2020

भांगेला औषध म्हणून संयुक्त राष्ट्राची मान्यता


हजारो वर्षांपासून भांगेचा वापर हा मादक पदार्थ आणि औषध म्हणून करण्यात येतो. फक्त भारतीय उपखंडच नव्हे तर जगभरात भांगेचा असा वापर करण्यात येतो. आता संयुक्त राष्ट्र संघाने भांगेचा वापर औषध म्हणून करण्यास मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या अंमली पदार्थ आयोगाने भांगेला अंमली पदार्थाच्या यादीतून वगळले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने औषध म्हणून मान्यता दिली असली तरी वैद्यकीय कारण वगळून इतर कारणांसाठी त्याचा वापर करण्यास बंदी आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थाच्या यादीतून भांगेला वगळण्याबाबत मतदान झाले. यावेळी २७ सदस्य देशांनी प्रस्तावाच्या बाजूने आणि २५ सदस्यांनी प्रस्तावाविरोधात मतदान केले. या ऐतिहासिक मतदानात अमेरिका आणि ब्रिटनने यादीतील बदलाच्या बाजूने मतदान केले. तर, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नायजेरिया, रशिया आदी देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. संयुक्त राष्ट्राच्या मान्यतेनंतर भांगेपासून तयार करण्यात आलेल्या औषधांची मागणी असणार्‍या देशांचा फायदा होणार आहे. त्याशिवाय भांगेच्या औषधी गुणधर्माबाबत अधिक संशोधन होण्याची शक्यता आहे.

भारतात हजारो वर्षांपासून भांगेचा वापर करण्यात येतो. धार्मिक कर्मकांडातही त्याचा वापर करण्यात येतो. चीन आणि इजिप्तमध्येही भांगेचा वापर हजारो वर्षांपासून औषध म्हणूनच करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता दिल्यामुळे आता अनेक देशांना भांगेचा वापर औषध म्हणून करता येणार आहे. जगभरातील ५0 हून अधिक देशांमध्ये भांगेचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कॅनडा, उरुग्वे आणि अमेरिकेतील १५ राज्यांमध्ये भांगेचा औषधी वापर करण्यास परवानगी आहे.

संयुक्त राष्ट्र संघाकडून भांगेला मान्यता मिळणे ही मोठी बाब असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. भांगेचा वापर अनेकजण औषध म्हणून करतात. भांगेपासून तयार करण्यात आलेल्या औषधांची विक्रीही वाढली आहे. औषध म्हणून भांगेला मान्यता देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. भांगेवर बंदी घालण्याचा निर्णय हा वसाहतवादी विचारांचा परिणाम असल्याचे एनजीओने म्हटले आहे. भांगेवर बंदी असल्यामुळे जगभरातील अनेकजणांना दोषी असल्याचे समजण्यात येत होते.

Wednesday, December 2, 2020

फ्लॉवरचे औषधी गुणधर्म


आपल्या रोजच्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असतो. शिवाय ऋतूमानानुसार विशिष्ट भाज्या उपलब्ध असतात. मात्र, त्यांचं आरोग्यदृष्ट्या महत्त्व लक्षात घ्यायला हवं. त्यादृष्टीने आज फ्लॉवरचे गुणधर्म जाणून घेऊ. फ्लॉवर चविष्ट आहे शिवाय अनेक उपयुक्त गुणधर्मांनी युक्त आहे. आदिवासी जमातींच्या आहारातही या भाजीला महत्त्व दिलेलं दिसतं. फ्लॉवरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिनं, कबरेदकं, लोह, अ, ब, क ही जीवनसत्त्वं, आयोडिन, पोटॅशियम आणि काही प्रमाणात तांबं असे पोषक घटक असतात. त्याचं सेवन गुणकारी ठरतं. हिरड्यांमधून रक्त येत असेल तर फ्लॉवरच्या पानांचा रस प्रभावी ठरतो. कच्चा फ्लॉवर खाल्ला तर हिरड्यांवरची सूज कमी होते. दररोज रिकाम्या पोटी फ्लॉवरचा रस प्यायला तर कोलायटीस आणि पोटाचे इतर विकार दूर होतात. गळ्याला सूज आली असेल तर फ्लॉवरच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. गळ्याच्या इतर विकारांवरही हा रस प्रभावी आहे. कच्चा फ्लॉवर स्वच्छ धुवून चावून खावा. यामुळे रक्त शुद्ध होतं आणि त्वचाविकार दूर होतात. भरपूर प्रमाणात लोह, प्रथिनं असल्याने शरीराला भरपूर उर्जा मिळते. रात्री झोपण्यापूर्वी फ्लॉवरचा रस प्यायल्यास बद्धकोष्ठतेच्या तक्रारी दूर होतात आणि पोट साफ होऊन जाते.

एड्सला ४0 वर्षे लोटले तरी अद्याप लस नाही


सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

एड्स या रोगाला ४0 वर्षे लोटल्यांतरही अद्याप लस मिळालेली नाही. कोणत्याही महामारीवर रामबाण औषध तयार करणे एवढे सोपे नसते, हा दावा वैज्ञानिकांनी आधीच केला आहे. यासाठी काही वर्षे लागू शकतात किंवा कधीच औषध सापडत नाही. असाच काहीचा प्रकार एड्सबाबत झाला आहे.
एड्सबाबत ३ डिसेंबर १९८0 रोजी वैज्ञानिकांना पहिल्यांदा समजले होते. एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी किंवा हा रोग झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी आजपर्यंत एकही औषध तयार झालेले नाही. हा आजार कोरोनाप्रमाणे एवढा खतरनाक नसला तरी लैंगिक संबंधांमुळे होत असल्याने तेवढाच बदनाम आहे. एड्स झालेल्याची सुई किंवा तत्सम टोचलेली वस्तू जर अन्य कोणाला लागल्यास त्यालाही एड्स होण्यीच शक्यता असते. शिवाय शारीरिक संबंध ठेवल्यावरही एड्स पसरण्याची शक्यता असते. एवढा मोठा रोग असूनही यावर जगभरातील रथी महारथी संशोधकांना यावर लस शोधता आली नाही.
एवढे असले तरीही एड्सबाबत जनजागृती आणि काळजी घेतल्याने हा रोग कमालीचा नियंत्रणात आला आहे.
एड्सबाबत ५ डिसेंबर १९८४ रोजी पहिल्यांदा माहिती मिळाली होती. यावर दोन वर्षांच्या आत एड्सवर औषध बनविण्यात येईल, असा दावा अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाने छातीठोकपणे केला होता. मात्र, जंग जंग पछाडूनही शास्त्रज्ञांना काही औषध सापडले नव्हते. मानवी शरीरात रोगांशी लढणारी प्रतिकारशक्ती एड्स व्हायरसच्या विरोधात कामच करत नाही. हा रोग ज्याला होतो, त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार होते. मात्र ती केवळ या व्हायरसच्या शरीरातील प्रसाराचा वेग कमी करते, रोखत नाही. यामुळे एचआयव्ही झालेल्या रुग्णाला बरे करणे जवळपास अशक्य आहे.
एड्स हा कोरोना एवढा वेगवान रोग नाही. त्याची शरीरामध्ये पसरण्याचा वेग हा काही वर्षांचा असतो. या काळात हा व्हायरस मानसाच्या डीएनएमध्ये लपून राहतो. यामुळे या व्हायरसला शोधून नष्ट करणे खूप कठीण काम आहे.
अधिकाधिक लसी या अशा व्हायरसपासून सुरक्षा करतात जे शरीरामध्ये श्‍वासोच्छवासाद्वारे किंवा गैस्ट्रो-इंटसटाइनल सिस्टमद्वारे दाखल होतात. तर एचआयव्हीचे संक्रमण गुप्तांग किंवा रक्ताद्वारे होते. जनावरांवर व्हायरस आणि लसीची चाचणी केल्यानंतर माणसांसाठी औषध बनविले जाते. मात्र, दुर्भाग्य म्हणजे एचआयव्हीसाठी असे काहीच यश आलेले नाही. फक्त एकच जमेची बाजू म्हणजे कोरोना एड्ससारखा डीएनएमध्ये लपत नाही. यामुळे तो शोधला जाऊ शकतो.

Sunday, November 29, 2020

कवठेमहांकाळला महामार्ग पोलीस मदत केंद्र


सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

महामार्गावर अपघात अधिक प्रमाणात होतात. शिवाय अपघातात अडकलेल्या लोकांना किंवा अडचणीत सापडलेल्या वाहन चालकांना वेळेत मदत मिळत नाही. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्राचा उपयोग होऊ शकतो. याठिकाणी सतर्क यंत्रणा आणि पुरेसा कर्मचारी महत्त्वाचा आहे. या महामार्ग पोलीस मदत केंद्रामुळे महामार्गावरील अपघाताची माहिती पोलीस ठाण्याला देता येते आणि अडचणीत सापडलेल्या वाहनचालकांना मदत करता येते. वाहतूक सुरळीत राहील यासाठी दक्षता घेता येते. महामार्गावरील लूटमारी व इतर गुन्ह्यांना प्रतिबंध करता येते. आणि महत्त्वाचं म्हणजे वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी उपाययोजना करता येते. सध्या राज्यात विविध राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्य मार्गावर 63 पोलीस मदत केंद्रे होती. आता त्यात आणखी 13 मदत केंद्रांची भर पडली आहे. यात सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ पोलीस केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर हे दोन राष्ट्रीय म महामार्ग जातात. तसेच मिरज-पंढरपूर या राज्यमार्गही जातो.या महामार्गावर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे.  त्यामुळे घटना घडल्यावर पोलिसांची मोठी धावपळ होते. त्यामुळे या ठिकाणी मदत केंद्राचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी पाठवण्यात आला होता. तो आता मंजूर झाला आहे, मात्र इस्लामपूरजवळील पेठनाका येथील प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे. सांगली जिल्ह्यात कोल्हापूर मार्गावर देखील मदत केंद्राची आवश्यकता आहे. कवठेमहांकाळ महामार्ग पोलीस मदत केंद्रासाठी 34 पदे मंजूर करण्यात आली आहेत. यात पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार 8, पोलीस शिपाई21 आणि चालक 3 यांचा समावेश आहे.

Monday, November 16, 2020

दुःख व्यक्त करायचं की...


खूप खूप वर्षांपूर्वीची खरी घटना आहे. हरी नावाचा प्रसिद्ध आणि यशस्वी गोल्फ प्लेअर होता, त्याने एक चॅम्पिअनशिप जिंकली, त्यात त्याला एक हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले. आज विजेता झाल्यामुळे हॅरी खुशीत होता, गुणगुणत तो स्टेडिअममधुन बाहेर पडला आणि आपल्या कारच्या दिशेने चालत असताना एक महीला आपल्या चिमुकल्या बाळाला कडेवर घेऊन त्याच्या समोर येते. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आगतिकतेचे भाव असतात, ती गरीब दिसणारी स्त्री, दीनवाणे, केविलवाणे भाव आणून त्याला विनवते की ह्या मुलाला एक दुर्धर रोग आहे, आणि जर त्याचे उपचार झाले नाहीत, तर तो जास्त दिवस जगणार नाही, त्या मुलाच्या उपचारासाठी एक हजार डॉलर्सची आवश्यकता आहे. हॅरीला त्या मुलाकडे पाहुन दया येते, आणि कर्तव्यभावनेने तो तिला एक हजार डॉलर्सच्या रकमेचा चेक देतो. बघता बघता ही गोष्ट सगळ्या शहरात पसरते. हॅरीची एक महत्त्वाची मेंच असते आणि त्याच्या ओळखीचे लोक त्याला शुभेच्छा देण्यासाठी येतात. त्यातली त्याची एक ओळखीची व्यक्ती हरीला सांगते. हरी, तुला फसवलं गेलयं, मागच्या आठवड्यात, तू एका महिलेला एक हजार डॉलर्स देऊन फसला आहेस, तुला नाही. माहीतीये, मागच्या आठवड्यात शहरात कोणीही बाळ दगावलं नाही. हॅरीचा हसरा चेहरा अजुनच आनंदी झाला, थैक्स गोंड, मागच्या आठवड्यात शहरात कोणीही बाळ दगावलं नाही. आणि हसत हसत हॅरी त्याच्या पुढच्या गोल्फ मॅचसाठी मैदानाकडे गेला.गोष्ट संपली..

मित्रांनो, तुम्ही आम्ही जर हरीच्या जागेवर असलो असतो तर आम्ही कसा प्रतिसाद दिला असता? मला फसवलं गेलं, ही भावना आपल्याला किती त्रास देऊन गेली असती? मला मूर्ख बनवून. खोटं सांगून. एक हजार डॉलर्स लुबाडले. म्हणुन आपण किती चिडलो असतो? हॅरीने दिलेला प्रतिसाद किती वेगळा होता. धन्यवाद देवा, मागच्या आठवड्यात, शहरात कोणतंही बाळ दगावलं नाही. हॅरीसारखं हसत हसत, पुढची मॅच खेळायला आपल्याला जमलं असतं का? इथे मला असं अजिबात म्हणायचं नाही की आपण आपल्याला फसवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे, पण अचानक उद्भवलेल्या परिस्थीतीला आपण हसत हसत सामोरे जाऊ शकतो. आयुष्यात रोज काहीनाकाही चांगल्या घटना घडत असतात, आणि वाईट ही घटना घडत असतात. आपण फोकस कशावर करतो, त्यावर आपल्या वाट्याला आनंद आणि दुःख येतं. एक हजार डॉलर्सचा फटका बसल्याचं दुःख व्यक्त करायचं की मागच्या आठवड्यात शहरात एकही बाळ दगावलं नाही. म्हणून आनंद व्यक्त करायचा, हे आपणचं ठरवायचं!

●●●●●●

*वाचा विनोद*

वडिल : अरे, एक काळ असा होता की, मी पाच रुपयांत किराणा सामान, दूध, पाव आणि बिस्कीट घेऊन यायचो.

मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा. आता सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत.

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Wednesday, November 11, 2020

आपलं मार्केटिंग


मार्केटींग, सेल्स अवघड नाही... तो आपला जन्मजात गुण आहे स्वतःला ओळखा-१. लहानपणी आई बाबांकडे आग्रह करुन करुन चाॅकलेट, खेळणी मिळवली आहेत ?  २. शाळेत शिक्षकांसमोर नाटक करुन अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळवली आहे ?  ३. काॅलेज मधे मस्तपैकी ड्रेस घालुन, स्टाईल मारुन छाप पाडलेली आहे ? ४. पालकांना कमी मार्क का पडलेत याचं समाधानकारक ऊत्तर दिलंय का कधी ? ५. एस.टी. बस मधून फिरताना अनोळखी लोकांशी कधी गप्पा मारल्यात ? ६. काॅलेज मधे ओरल एक्झाम देताना काहीही येत नसताना १५ मिनीटे एक्टरनल समोर ठामपणे कधी ऊभे राहीलात ?  ७. परिक्षेत काहीही येत नसताना तीन तास पेपर लिहीला आहे ? ८. एखाद्या कार्यक्रमात लोकांशी मोकळेपणाने गप्पा मरु शकताय ?  ९. कार्यक्रमात जाताना टाईट-फीट ड्रेसकोड मधे ऐटीत जाऊन लोकांचे लक्ष वेधुन घेण्याचे स्कील आहे?   १०. नविन काहितरी शिकण्याची वृत्ती आहे?  ११. ट्राय करायला काय जातंय, असा कधी विचार करता ?  १२. सर्वात महत्वाचे समोरच्याला तुमचे मत स्पष्टपणे सांगण्याची डेअरींग आहे ? आता लक्ष देऊन ऐका- यापैकी ३० टक्के प्रश्नांची ऊत्तरे "हो" असतील तर तुम्हाला मार्केटींग सुद्धा अवघड नाहीये... ही सगळी उदाहरणे मार्केटींगचीच आहेत. आणि वरिलपैकी एकही प्रश्नाचे उत्तर हो नसेल तरिही मार्केटींग अवघड नाही, फक्त शिकायला थोडा वेळ लागेल.  मार्केटींग, सेल्स म्हणजे वेगळ काही नसुन समोरच्याला आपलं प्रोडक्ट घेण्यासाठी कन्व्हींस करण्याची प्रोसेस आहे. यात एकदा रुळलं की ती एक‌‌ सवय होऊन जाते. सहज होणारी प्रक्रीया बनते. मार्केटींग, सेल्सचं‌ स्कील प्रत्येकात जन्मजात असतं. काही जणांना ते लवकर‌ गवसतं काहींना त्या फील्ड मधेच नसल्यामुळे गवसायला थोडा वेळ लागतो. पण हे स्कील प्रत्येकात थोडफार असतंच. मार्केटींग स्कील आपल्या रक्तात असतं, फक्त आपण ते ओळखलेलं नसतं. स्वतःलाओळखण्याची गरज आहे.  मार्केटींग अवघड‌ नक्कीच नाही, फक्त थोड्या प्रॅक्टीकल ज्ञानाची गरज आहे... पण त्यासाठी फील्ड वर प्रत्यक्षात उतरावं लागेल. मार्केटींग स्कील अनुभवाने समृद्ध होत असते. पुस्तकी ज्ञानाने किंवा कुणाचे लेक्चर ऐकुन मार्केटींग शिकता येत नाही. तुम्हाला प्रत्यक्ष व्यवसायात उतरावं लागेल, मगंच हे ज्ञान मिळू शकेल.

व्यवसाय अवघड नाही, शिकायला थोडा जड आहे...

त्यामुळे व्यवसाय साक्षर व्हा...  ऊद्योजक व्हा... समृद्ध व्हा...

●●●●●●●

कांहीं लोक इंग्रजीच्या उच्चाराचे 12 वाजवतात. कसे..... वाचा हा जोक.... असेही काहीं विद्यार्थी असतात कॉलेजात!

एक विदयार्थी (इंग्लिश टीचरला) : मॅडम, हे नटूरे म्हणजे काय...??? 

टीचर (प्रचंड टेंशन मध्ये) : नटूरे ....??? टीचर ला कांहीं त्या शब्दाचा अर्थ सांगता येईना.

(वेळ सावरून घेण्यासाठी) मी तुला नंतर सांगते माझ्या  ऑफिस मध्ये ये. हा तिथेही गेलाच. "सांगा ना मॅडम, नटूरे म्हणजे काय ते ......???"

टीचर : (अगदी घामाघुम) आता कायच करावं बुवा याला  "मी तूला उदया सांगु का.... ???"

टीचर रात्रभर परेशान!  डिक्शनरी शोध, इंटरनेट वर शोध, जिकडे तिकडे शोधाशोध ....प्रचंड त्रस्त ! दुसऱ्या दिवसी सुद्धा तेच, "मॅडम, नटूरे म्हणजे काय..... ???"

टीचर त्याला टाळायला लागली, हा दिसला की दुरून- दुरून जायला लागली. पण हा पठ्ठ्या पण काही पिच्छा सोडेना.

एक दिवस टीचर त्याला म्हणाली, " नटूरे हा शब्द तू विचारत आहे हा मराठी आहे का इंग्लिश ???

तो : इंग्लिश 

टीचर : स्पेलिंग सांग ..

तो : N-A-T-U-R-E

टीचरची अशी तळपायाची आग मस्तकाला गेली.

"हरामखोरा, आठवडाभर नुसता जिवाला घोर लावून ठेवला तू माझ्या जिवाला, या टेंशन मुळं उपाशी- तापाशी राहीले, रात्र-रात्र जागले. कुठेच असा शब्द सापडला नाही, आणि तू ...... मूर्ख कुठला...!!! नेचर ला नटूरे-नटूरे म्हणून परेशान करून सोडलं नुसतं, थांब तुला चांगली शिक्षा करते, कॉलेज मधून काढूनच टाकते"

तो : नाही हो मॅडम, तुमच्या पाया पडतो, आता पुन्हा नाही असं काही विचारणार मी.  प्लीज मला कॉलेज मधून काढू नका नाहीतर ... माझं  फुटूरे.....बर्बाद होईल.

फुटूरे....!( F-U-T-U-R-E)...... बर्बाद होईल हो. 

संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday, November 10, 2020

सुंदर विचार


कुणाच्या  सांगण्यावरून  आपल्या मनात  एखाद्या  व्यक्तीबाबत  चांगले  वा वाईट  मत  बनवण्यापेक्षा,  आपण  स्वत: चार  पावले  चालून  समोरासमोर  त्या व्यक्तीशी  संवाद  साधून  मगच  खात्री करा.

�  नाती  जपण्यासाठी  संवाद  आवश्यक आहे.  बोलताना  शब्दांची  उंची  वाढवा आवाजाची उंची नाही. कारण, पडणार्‍या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही.

� वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस! निवड आपली आहे.

� कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

� डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

�  जे  तुम्हाला  मदत  करायला  पुढे  सरसावतात  ते  तुमचे  काही  देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून...!

� मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि... राजहंस मरताना सुद्धा गातो... दु:खाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि.... सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.

� किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे  अस्तित्व  उद्या  नसते,  मग  जगावे  ते  हसून-खेळून  कारण  या

जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही.

� आयुष्यात कितीही चांगली कर्म करा कौतुक हे स्मशानातच होतं.

●●●●●●●

वाढत्या थंडीमुळे गुड मार्निंगचे मेसेज दुपारी 2.00 वाजेपर्यंत स्विकारले जातील.-अखिल   भारतीय   ग्रुप   अ‍ॅडमीनच्या मीटिंगमध्ये ठरलेला निर्णय.

●●●●●●●●

शब्द  मोफत  मिळतात  ‘पण’  त्यांच्या वापरावर  अवलंबून  असतं  की  त्यांची किंमत ‘मिळेल की’ किंमत ‘मोजावी लागेल’.

●●●●●●●●

प्रश्‍न : 1,000 पाने  लिहियला किती दिवस लागतात?

उत्तर - 

वकील : 5 वर्ष.

डॉक्टर : 1 वर्ष.

पायलट : 5 महिने.

लेखक : 3 महिने.

इंजिनीयर : सबमिशन कधी आहे

ते सांगाल एका रात्रीत लिहुन काढतात.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली*

Monday, September 28, 2020

रामपूर किल्ल्याची किल्लाप्रेमींकडून स्वच्छता


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जतपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर पूर्वेला सांगली मार्गावर  शिवकालीन  रामदुर्ग किल्ला आहे. त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. सध्या इथे झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली होती.  रामदुर्गटीम  व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकऱयांच्यावतीने  किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. झाडे-झुडपे हटवण्यात आली आहेत. याला रामपूर ग्रामपंचायतीनेही मोठ्या प्रमाणात साथ दिली.

जतपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर शिवकालीन रामदुर्ग किल्ला आहे. येथे राबवण्यात आलेल्या  स्वछता मोहिमेदरम्यान गडावर वाढलेली अनावश्यक झाडे काढण्यात आली. तसेच गडावरील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.गडावरील महादेवाची पूजा करून व ध्येय मंत्र म्हणून कामाची सुरुवात करण्यात आली. त्याच बरोबर मंदिराच्या मधील दडपल्यागेलेल्या गोमुखास मोकळा श्वास देण्यात आला.यावेळी सांगलीमधून टीम रामदुर्ग चे स्वप्नील भजनाईक,गणेश घम,हेमंत खैरमोडे तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जत शाखेचे धारकरी सिद्धगोंडा पाटील, ग्रामपंचायत रामपूर चे माजी सरपंच.मारुती पवार ,सरपंच रखमाबाई कोळेकर,तानाजी कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते मनोहर शिंदे,प्रमोद शिंदे,प्रशांत शिंदे,टीम किल्ले रामदुर्ग चे मावळे व रामपूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.यआ सगळ्यांनी मिळून गडाची स्वच्छता केली. 


Saturday, September 26, 2020

शेवटी अंतर राहूनच गेलं...

 *शेवटी अंतर राहूनच गेलं...*

लहानपणी प्रवास करताना आई

घरून डबा करून द्यायची; पण

बाकीच्या लोकांना विकत घेऊन

खाताना बघितले की खूप वाटायचं,

आपणही विकत घेऊन खावं. पण

बाबा म्हणायचे, ती श्रीमंत माणसं,

पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाही.

मोठेपणी विकत घेऊन खाताना बघितले, तर आरोग्याची काळजी

म्हणून बाकी लोकं घरून करून आणलेला डबा खाताना दिसू

लागली.

शेवटी अंतर राहूनच गेलं..

लहानपणी जेव्हा मी सुती कपडे घालायचो, तेव्हा बाकी लोक

टेरिकॉट कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे कपडे घालावे.

मोठेपणी आम्ही टेरिकॉट घालायला लागलो आणि ते सुती. सुती कपड़े महाग झाले. परत शेवटी अंतर राहूनच गेलं..

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई

छानपैकी शिवायची, पण शिवलेलं कोणाला दिसू नये ही माझी धडपड आसायची.

मोठेपणी गुडघ्यावर फाटलेले कपड़े

दामदुपटीने घेताना बघितले.

शेवटी अंतर राहूनच गेलं..

आता कळलं,

हे अंतर असंच कायम राहणार,

मनाशी पक्कं केलं.

जसा आहे. तसाच रहा,

मजेत रहा...

●●●●●●

जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा

चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.

●●●●●●

आरशापुढे उभे असलेल्या पत्नीने पतिदेवाला विचारले - मी खूप जाड दिसते का?

पतीने निरुपयोगी भांडणे टाळण्यासाठी सांगितले - मुळीच नाही!

बायको आनंदी झाली आणि म्हणाली- ठीक आहे, मग मला आपल्या दोन्ही हातांनी उचलून घ्या आणि फ्रीजजवळ घेऊन चला. मी आइस्क्रीम खाईन!

परिस्थिती अनियंत्रित होत असल्याचे पाहून नवरा म्हणाला...

"थांब,.... मी फ्रीजच आणतो!"


जावयांचे प्रकार...

 *जावयांचे प्रकार...*

आपल्याकडे जावयाचे चार प्रकार पडतात...

१) साखऱ्या जावई :

साधारणतः २ टक्के जावई या प्रकारात मोडतात. ते १०० किलोमीटरपेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्या मुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जातात. म्हणून या जावांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडेलत्ते देऊन यांचा मानपान होतो. चांगलीच बडदास्त असते याची. म्हणून हा साखऱ्या जावई... जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे...

२) भाकन्या जावई:

या प्रकारात ९५ टक्के जावई मोडतात. हे जावई सासुरवाडीच्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर जात असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई वडिलांची आठवण आली तर तिच्या सोबत जावे

लागते. यांचे जाणे येणे नेहमीचे असते त्यामुळे या जावयाला खाण्यासाठी जे घरात केले तेच वाढले जाते. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते... हा नेहमीचाच म्हणून काही खास मानपान नसतो, म्हणून हा भाकन्या जावई...

३) ढोकऱ्या जावई :

या प्रकारात २ टक्के जावई सापडतात. हे घरजावई असतात. या जावयाला घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दुध असे आणून द्यावे लागते. झाड लोटीची कामे पण करावी लागतात. हा घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस तरी याचा अपमान नक्कीच केला

जातो. म्हणून हा ढोकऱ्या जावई...

४) दयावान जावई:

हा जावई सासरच्या लोकांना कायम मदत करतो. बायकोच ऐकतो. मेहुण्याला उसने पैसे देतो. त्याला सासरची मंडळी त्याला कायम गोड-गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढवून चांगलेच लुटतात. हा १-२ वर्षातून सासरी येतो, त्यावेळी त्याचेकडे आजूबाजूचे लोक दयेने बघतात म्हणून हा दयावान जावई...

आता तुम्हीच ठरवा आपण स्वत: कोणते जावई आहोत ते...?

●●●●●●

जो शर्यतीत धावणाऱ्या चाबकाचे फटके आणि चटके मिळतात म्हणून तो धावत राहतो. त्याला माहित नाही तो का धावतो?

जर आयुष्यामधे तुम्हाला फटके आणि चटके

पडत असतील तर परमेश्वर तुमचा राइडर आहे, तो फटके आणि चटके देतोय कारण तुम्ही जिंकणार

आहात!

●●●●●●

*विनोद*

तो : साहेब, हे बघा, हेल्मेट आहे डोक्यावर, पोल्युशन

सर्टिफिकेट, इन्शुरन्स, आरसी बुक सगळं आहे, अजुन काही राहिलंय?

साहेब : अरे पण गाडी कुठाय?

तो : तुम्ही दिसलात म्हणून मागे पार्क करून आलोय, कागदपत्र चेक करून घेतले, आता आणतो...


एका दारूच्या बाटली मागचे अर्थकारण*

 *एका दारूच्या बाटली मागचे अर्थकारण*

लक्षात ठेवा, एक बाटली मागे,

शासनाला महसूल,

वेटरला टीप,

हॉटेल व्यवसाय,

कर्मचारी रोजगार,

सोडा पाणी बाटली उद्योग,

फूड इंडस्ट्री,

चिकन मटण शॉप,

पोल्ट्री उद्योग,

शेळीपालन,

मसाले व इतर गृह उद्योग,

भंगारवाल्याला बाटली,

चकण्यामुळे बचत गटातील महिलांना पापडाची ऑर्डर,

असे अनेक अर्थचक्र या वर आहे,

परत जास्त झाली की दवाखाने आहेत,

 भानगडी झाल्या वर पोलीस व वकील आहेतच.

 आजपासून दारुडा अजिबात म्हणायचे नाही.

मग म्हणणार ना *अर्थसैनिक*?

●●●●●●

*शब्द*

माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार... कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात. परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करित असतात.

जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात

शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात

शब्द यश देतात, शब्द नातं देतात

शब्द आयुष्यभर आणि आयुष्या नंतरही मनामनात जपणारी भावना देतात.

 शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल

होतं.

●●●●●

*वाचा विनोद*

समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिटं हात हलवत होती..

मग बंड्याने पण हात केला, तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला, व म्हणाली ती खिडकीची काच

पुसतेय...


*कुणावर तरी प्रेम करावे*

 *कुणावर तरी प्रेम करावे*

जमेल तसे प्रत्येकाने, कुणावर तरी प्रेम करावे!

कधी संमतीने, कधी एकतर्फी; पण, दोन्हीकडे सेम करावे!

प्रेम सखीवर करावे,

बहिणीच्या राखीवर करावे!

आईच्या मायेवर करावे,

बापाच्या छायेवर करावे!

प्रेम पुत्रावर करावे,

दिलदार शत्रूवरही करावे!

प्रेम मातीवर करावे,

निधड्या छातीवर करावे!

कोटर अंम कट्टा

शिवबाच्या बाण्यावर,

लतादीदींच्या गाण्यावर

सचिनच्या खेळावर आणि

वारकऱ्यांच्या टाळावरही

करावे!

 प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे,

गणपतीच्या मस्तकावरही करावे!

महाराष्ट्राबरोबरच देशावर आणि न चुकता

स्वतःवर जमेल तसे प्रेम करावे!

●●●●●

*ध्यान का करावे?*

लोक एकत्रितपणे साधना केल्याने त्यांच्या लहरी दूरवर

पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. आइन्स्टाईनने

शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितले आहे की एका अणुचे

विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे

विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनींनी आपल्याला हजारो

वर्षांपूर्वी सांगितली आहे. आपण ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.

आपण आपली भौतिक, तसेच आध्यात्मिक प्रगती

ध्यानामुळे कमी श्रमात साधू शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

●●●●●

*वाचा विनोद*

कोंबडीचे पिल्लू कोंबडीला विचारते,

'आई, माणसाच्या बाळाचे जसे नाव ठेवतात; तसे आपल्यात का नाही.'

 कोंबडी म्हणते, 'आपल्यात मेल्यावर ठेवतात. चिकन चिली, चिकन मसाला, चिकन लॉलीपॉप, चिकन तंदूर, चिकन ६५, चिकन सूप, चिकन मंचूरी.'


Tuesday, September 15, 2020

लवकुमार मुळे यांची आयुष्याला भिडणारी कविता

 'कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे'


कल्पना आणि भावनांची भाषा म्हणजे कविता असे हँझलीट या भाषा विमर्शकाने म्हटले आहे, तर उत्कट भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे काव्य असे वर्डस्वर्थने म्हटले आहे. म्हणजेच कविता ही एकप्रकारे प्रतिमा प्रतिकांची सेंद्रिय रचना असते आणि कवी या रचनेतून आपला भवताल शब्दबद्ध करत असतो. स्वतःला व्यक्त करत असतो. त्याच्या ह्रदयात धगधगणारे रसायन त्याला शब्दांच्या द्वारे तो वाट करून देत असतो.

         लवकुमार मुळे असाच एक भावनाशील व्यक्तित्व लाभलेला कवी. गुलमोहर, भावमुद्रा, काळीजवेणा,अर्धवेलांटी आणि आता कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे असा कवीचा काव्यप्रवास चालू आहे. गुलमोहर मधल्या काही कविता रोमँटिक वातावरणातल्या होत्या पण आताचा कवितासंग्रह मात्र कवीला वास्तवाचे असणारे भान दर्शवणारा आहे.

       जागृती प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहात एकूण छप्पन कविता असून त्यासाठी कवीने मुक्तछंद, ओवी, अभंग ,द्विपदी इ.रचना प्रकार उपयोगात आणले आहेत. कवीची शब्दांवरची हुकूमत आपणाला प्रत्येक कवितेतून जाणवत राहते.लयबद्धता ,अल्पाक्षरत्व, व्यापक जीवनाशय क्षमता ,संवेद्यता, आशय व अभिव्यक्तीतील एकात्मता ही महत्वाची काव्यलक्षणे या कवितांमधून ठळकपणे दिसून येतात.

    "जिंदगानी खपली सारी आयुष्याची पखाली वाहताना"या एकाच ओळीतून आबाचे कष्टमय जीवन कवी शब्दबद्ध करतो. तर अवतीभवती या कवितेतून"ऐसपैस बसून बघ सारी नावे गोंदू

अवतीभवती जमलेले सगळे श्वास बांधू"असा समन्वयवाद मांडतो.

        काही कवितांसाठी कवीने अभंग हा रचना प्रकार निवडला आहे. प्राचीन संत मंडळींनी हा रचना प्रकार अध्यात्म, देव,पारलौकिक जीवन यांच्या प्रकटनासाठी स्विकारला होता. पण कवीने आपल्या परिसरातील कायमच्या दुष्काळाची दाहकता सांगण्यासाठी अचूकपणे वापरला आहे."जगण्याचा गुंता,आटलेले पाणी

झर्यालाच वाणी मुकलेली"अशी साडेतीन चरणी रचना कवी या ठिकाणी करतो व दुष्काळी भागातील पाणीटंचाई झर्याच्या प्रतिकातून मांडतो.

      "कविता"या कवितेत कवीला एक सनातन असा प्रश्न पडला आहे. तो कवितेच्या निर्मितीसंदर्भातला "परिस्थितीच्या बंधातून की खोल वेदनेच्या वावरातून

नक्की कुठून येते कविता...?"

       शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा. बहुसंख्य लोकसंख्या या व्यवसायात आहे पण शेती हा बेभरवशाचा धंदा झाला आहे. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हतबल झाला आहे."आयुष्यभर ऐकत आलो सुर-असुरांच्या युद्धकथा

कुणीच ऐकून घेत नाही माझ्या कुणब्यांची व्यथा"ही शेतकरी जीवनाची परवड कवी शब्दबद्ध करतो.

     ..कवी निराशावादी नाही. अंधारबनीस्थितीतही त्याने आशा सोडलेली नाही."गवसेल कधीतरी उजेडाची लख्ख दिशा

बेभान वादळाचे चक्रावर्त भेदतो मी"असा आशावाद कवीच्या मनात टिकून आहे.

      "चिमणीत तेल नाही शोध चालू आहे

अंधारात चोरट्यांचा बोध सुरु आहे"या द्विपदीतून कवी सामाजिक वास्तव उलगडत जातो. कवीचा जीवनप्रवास"चक्रीवादळ कधी त्सुनामी लाट

स्वत्वात हरवलेली प्रत्येक पाऊलवाट..."असा खडतर होत असताना"आयुष्याच्या वळचणीचा सारा पसारा इस्कटलेला

भुईभेगा लिंपताना जीव नुसता मेटाकुटीला..."अशा तर्हेने त्रासलेल्या वेदनेने ग्रासलेल्या जीवनाचा लेखाजोखा कवी आपणासमोर ठेवतो.

         माणूस हा समाजशील व भोवतीच्या परिस्थिती शी समायोजन साधणारा प्राणी आहे. वाळवंट, जंगल, हिमाच्छादित प्रदेश, कुठेही तो वास्तव्य करून राहतो. निसर्गाशी तडजोड करून राहतो. तशाच प्रकारे तो सामाजिक घटकांशीही समरस होतो."कुठे चाललेत हे दिशाहीन पाय

रस्ता संपत नाही अजूनही

व्यवस्थेच्या तिरडीसोबत चालताना"

        काही कवितांतून कवीच्या व्यक्तिगत जीवनाचे चित्रणही आले आहे. प्रेमळ पित्याचे मन "शब्दफुल"या कवितेतून मांडताना कवी लिहून जातो"लहान थोर झाली पोर

आली गौर हळदीला"

     " पिंपळपार व पिंपळछाया "या कवितांमधून निसर्गातल्या अबोल घटकांना ही मुखर केले आहे. गावोगावी असणारी ही झाड -पेडं ,गावगाड्यातील अनेक घटनांची मूक साक्षिदार असतात. श्रांत क्लांत मनाला विसावा देण्याचे काम करत असतात.

       सामान्य माणसाचा संसार हा एकप्रकारचा जीवनसंघर्षच असतो हे कवीने"तुझ्या माझ्या जगण्याचे कसे झाले रणांगण"अशा शब्दांतून सांगितले आहे."जन्म कशासाठी हा विचार हाय बाकी

आयुष्य पेलून सारं आलं आहे नाकी"कविचा परिसर कायमदुष्काळीभाग रानबाभळीचीच झाडं जीथं रूजतात,तग धरून राहतात पण तेथील माणसं मात्र आतून उन्मळून पडलेली असतात. त्या झाडांच्या सावलीतही मनातली तगमग कमी होत नसते तर वाढतच जाते."अशांत सावली, भग्न वाळवंटी

भूत मानगुटी,बसलेले..."

     धर्म, अर्थ, काम, व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले गेले आहेत. यातील दोन गोष्टी सामान्यांसाठी आहेत. त्या म्हणजे अर्थार्जन व प्रजोत्पादन. धर्म व मोक्ष या गोष्टी प्रामुख्याने अलौकीकांसाठी आहेत. पण या पूर्ण करताना होणारी स्थिती कवी मांडतो."घर,लग्न, विहीर कसोशीनं केली पार

अजून आली ना आयुष्याला नवी धार"अशी कबुलीच जणू कवी देतो. लौकिक, प्रापंचिक जीवनात जरी कवी उदासीनता दर्शवत असला तरी कवीच्या काव्य लेखनाला मात्र एक वेगळीच धार,एक वेगळीच उंची प्राप्त झाल्याचे चित्र या संग्रहातून दिसून येते. कवीच्या पुढच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा!

-एकनाथ गायकवाड

जनता विद्यामंदिर, त्रिंबक ता.मालवण जि.सिंधुदुर्ग पीन .416614 मो.नं.9421182337

Sunday, June 28, 2020

मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे यांचा त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल  विविध संघटनांच्यावतीने सहकुटुंब सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने चालवण्यात आलेल्या आश्रमाशाळांच्या उभारणीपासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत राहिलेले आणि शिक्षण संस्था नावारूपाला आणतानाच संस्थेचा विस्तार करण्यात मोलाचा हातभार लावलेले श्री. कारंडे या महिन्यात आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.

Sunday, May 31, 2020

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करा आणि देश आत्मनिर्भर बनवा -सोनम वांगचुक

भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास भारतीयांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे मत प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले आहे. २0१८ साली रेमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणार्‍या वांगचुक यांनी युट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामधून त्यांनी भारतीय खूप मोठय़ा प्रमाणात चीनला प्रत्यक्षपणे आर्थिक मदत करत असतात असे म्हटले आहे. एकीकडे भारतीय सैन्य चीनला गोळ्यांनी म्हणजेच बुलेट्सने उत्तर देत असतानाच मुंबई, दिल्ली, बेंगळुरूबरोबरच देशातील सर्व भागांमधील नागरिकांनी चीनला पाकिटातून म्हणजेच वॉलेटच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे असे मत वांगचुक यांनी व्यक्त केले आहे.

कवी महादेव बुरुटे : उभं आयुष्यच लाॅकडाऊन

ध्यानीमनी नसताना भारतात कोरोना व्हायरस ने छुपा प्रवेश केला आणि त्याच्या विघातकतेमुळे माणसांचं जगणंच सावधगिरीचा उपाय म्हणून लॉकडाऊन झालं. पायाला आधुनिकतेची चक्रं बांधलेल्या सर्वांना घरात कोंडून ठेवल्यासारखे झाले आहे. पण ही वेळच अशी आहे - आपल्यासाठी, घरच्या लोकांसाठी, आपल्या लाडक्या मुलाबाळांसाठी हे आज गरजेचे आहे. चाळीस एक दिवस ही अवस्था अनुभवत असताना लोकांना बांधून घातल्यासारखे झाले आहे. पण उभं आयुष्यच ज्याच्या नशिबी लॉकडाऊन आहे त्यांचं काय? असेच आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती व  ध्येयनिष्ठेने वाटचाल करीत आपलं असह्य जीवन विविध लोकोपयोगी, समाजाभिमुख मार्गानी सुसह्य करीत हसतमुखाने परिस्थितीला सामोरे जाणारे  शेगांव येथील कवी, साहित्यिक महादेव बुरुटे.

Friday, May 29, 2020

उत्तम प्रशासक :मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे

सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सनमडी संचलित राजर्षी शाहू महाराज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे हे 31 मे रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. संस्थेची मुहूर्तमेढ लावलेल्या श्री . कारंडे सरांनी  आपल्या कामांतून संस्थेच्या विस्ताराला मोलाचा हातभार लावलाच शिवाय तालुक्यात संस्थेची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांनी आपल्या तालुक्यातील भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी या शिक्षण संस्थेची निर्मिती केली.

Friday, May 22, 2020

जत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरीत पुर्ण करा

डॉ. मनोहर मोदी
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत शहरातून जाणा-या विजापूर -गुहागर या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी जत साखर कारखान्याचे माजी संचालक, जत अर्बन बँकेचे सर्वेसर्वा व जत शहरातील ज्येष्ठ जनरल सर्जन डॉ. मनोहर मोदी यांनी केली आहे.

Thursday, May 21, 2020

खरीपपूर्व मशागतींची धांदल सुरू

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या सांगली जिल्ह्यात खरीपसाठी मशागतींची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याच्या वार्तेने मशागती कामांची धांदल उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शेत मशागतींच्या कामांना विलंब झाला होता. दरम्यान यंदा खते शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधवरच उपलब्ध केली जाणार आहेत.

Wednesday, May 13, 2020

पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्याविषयी जयंत पाटील यांचा निर्णय स्वागतार्ह

प्रकाश जमदाडे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा) -
पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्यविषयी जो निर्णय मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे, तो निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीचे माजी सभापती व रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली आहे.
 महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील साहेब यांनी पूराचे पाणी दुष्काळ तालुक्यास देणेसाठी पाटबंधारे खात्याला प्रस्ताव तयार करणेच्या सुचना दिल्या आहेत. या निर्णयाचा आम्ही स्वागत करीत आहोत. सन २००५ सालापासून आम्ही याची मागणी करीत आहोत कारण, जत तालुक्यात एकही बारमाही नदी नाही पावसाचे प्रमाण आतिश्य कमी आहे.

Thursday, May 7, 2020

सांगली जिल्ह्यात वाहन अपघातात घट

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
गेल्या चाळीस दिवसांपासून लॉक डाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहने जाग्यावर थांबून आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात या चाळीस दिवसांत वाहन अपघातांमध्ये घट आली आहे.  एप्रिल महिन्यात फक्त 19 अपघातांची नोंद झाली आहे. 2019 हीच संख्या 62 इतकी होती.

दहा पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद होणार?

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या शाळांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी ऑनलाईन'वेबिनार' मध्ये दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांच्या आसपासच्या शाळा आयडेंटिफाय करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे. सांगली जिल्ह्यात कमी पटाच्या 121 शाळा आहेत.

Wednesday, May 6, 2020

पालक व मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग सुरु


एस.सी.ई.आर.टी.पुणेचा उपक्रम- प्राचार्य डॉ.होसकोटी
सोन्याळ,(लखन होनमोरे यांजकडून)-
सांगली जिल्ह्यामध्ये पालक व मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग एस.सी.ई.आर.टी.पुणे यांच्यामार्फत मोफत तज्ञांचे समुपदेशन , मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन  सांगली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य डाॅ. रमेश होसकोटी  यांनी केले आहे.

Monday, May 4, 2020

मुलांना ऑनलाईन शिक्षणाची गरज आहे का?

माफ करा पण शिक्षक आहे म्हणून बोलावेसे वाटते.....
खरेच ऑनलाईन अभ्यासाची लहान मुलांना गरज आहे का...? मला असे वाटत नाही.. बऱ्याच शाळा ऑनलाईन सुरू झाल्या. ऑनलाईन लेक्चर, ऑनलाईन छंदवर्ग, ऑनलाईन स्पेशल ट्युशन वगैरे वगैरे..... पण यात तुमच्या लक्षात येते आहे का की मुले बरेच तास । स्क्रीनसमोर आहेत... आणि याच स्क्रीनसाठी ते पॅनिक होत आहेत... तुमचे खरेच आहे की लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे... पण काही पालकांना ही याचे अप्रूप आहे. आमची मुले ऑनलाईन अभ्यास करतात, याचे समाजमाध्यमावर फोटोही टाकले... छान.... पण यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांचे काय? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहे...

स्वच्छता व सोशल डिस्टन्समुळे आजाराच्या प्रमाणात घट

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या 'कोरोना' मुळे सरकारी हॉस्पिटल्स सोडले तर इतर सर्व हॉस्पिटल काही ठराविक वेळेसाठी सुरू राहतात. खासगी हॉस्पिटलमध्ये नेहमी दिसणाच्या रुग्णाच्या झुंडी, औसंडून वाहणारे वॉरई, ओ.पी.डी.च्या रांगा, मेडिकल दुकनांमधील गर्दी... सारे बही थांबले आहे.

वृत्तपत्र उद्योगाचे दोन महिन्यात 4 हजार कोटींचे नुकसान

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील वृत्तपत्र व्यवसाय पूर्ण डबघाईला आला आहे. त्याचबरोबर पेपर वाटणाऱ्या पोरांचाही रोजगार बुडाला आहे. गावात आणि खेड्यात राबत असलेल्या बातमीदारांच्याही पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जाहिराती बंद झाल्याने कमिशनवर जगणारे पत्रकार आणि जाहिरातीवर आपला चौथा स्तंभ अबाधित ठेवणारे वृत्तपत्र उद्योग यांची अर्थव्यवस्था बिघडली आहे. आता यांच्या मदतीसाठी शासनाकडेच आर्थिक सहाय्याची मागणी केली जात आहे.

गड्या, आपला गावच बरा!

लॉकडाऊनमुळे गावांतील लोकसंख्येत सात टक्क्यांनी वाढ

भारत देश खर्‍या अर्थाने ४0 हजार खेड्यांमध्येच वसला आहे, त्यामुळे गावाकडेच चला, असे महात्मा गांधी म्हणायचे. अर्थात महात्मा गांधींच्या त्यामागचा उद्देश हा गाव-खेड्यांच्या विकासाच्या दृष्टीचा होता. पण सध्या देशातील कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे आणि शहरांमध्ये कोरोनाचे भय जास्त असल्याने याकाळात गावातील लोकसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही वाढ सात टक्के इतकी नोंदवली गेली आहे.

Sunday, May 3, 2020

सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्याने काही प्रमाणात सुट

तरी सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्यच
सांगली, (जत न्यूज वृत्तसेवा) -
लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या झोनमध्ये सांगली जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आल्याने काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंग पाळणे, आनावश्यक गर्दी न करणे, मास्क वापरणे या अटी शर्तीना अधिन राहून देण्यात शिथिलता आले आहे.

Thursday, April 30, 2020

लॉकडाऊन’ कालावधीत ७० टक्के नागरीक चिंताग्रस्त

कोरोनाबाबत डीवायपाटील फार्मसी महाविद्यालयाने केले सर्वेक्षण
पिंपरी : आरोग्य सेवांमध्ये दर्जात्मक सुधारणा गरजेची, २० टक्के जनता कोरोना बाबतीत अनभिज्ञ, ७० टक्के नागरीक चिंताग्रस्त असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयाने ’लॉकडाऊन’मध्ये केलेल्या राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन सर्वेक्षणातून निदर्शनास आले.

उमदीत गूळ खरेदी-विक्रीवर बंदी: उमदी पोलीस

किराणा दुकानातून विक्री होत राहिल्यास  कारवाई 
माडग्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 उमदीत हातभट्टी दारू बनविण्यासाठी गुळाचा वापर केला जात असल्याने उमदी पोलिसांनी गूळ खरेदी-विक्री वर बंदी घालण्यात आली आहे.  उमदी येथील किराणा दुकानदार केवळ   नफा  न  पाहता कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर आपल्या व  ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. असे असताना कांहीं दुकानदारांनी    गुळ  स्टॉक करून  हातभट्टी दारू तयार करण्याऱ्या कांही जमातींना देत आहेत. सध्या सरकारी दारू दुकाने बंद असल्याने गावातील कांही लोक हातभट्टीकडे वळले आहेत  त्यातच  कर्नाटक राज्यातील चडचण, देवरनिंबर्गी, हिंचगिरी, निवर्गी आदी भागातील लोक दारू पिण्यास उमदीत येत आहेत.

Thursday, April 23, 2020

शासकीय कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यात होणाऱ्या बदल्या रद्द करा

शिक्षक नेते मच्छिंद्र ऐनापुरे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दरवर्षी राज्यातील जिल्हा परिषदेसह इतर राज्य शासनाच्या अखत्यारित येणार्‍या विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या माहे मे महिन्यात करण्यात येतात. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण शासन व यंत्रणा अत्यंत व्यस्त असल्यामुळे यावर्षी मे महिन्यात होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करून प्रशासकीय बदल्यांवर होणारा ५00 कोटींचा खर्च कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर वळता करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक नेते मच्छिंद्र ऐनापुरे यांनी ग्राम विकास व पंचायत राज विभागाकडे करण्यात आली आहे.

Wednesday, April 22, 2020

चर्मकार समाजाला आर्थिक मदत देण्याची मागणी

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
तयार कंपन्यांच्या चप्पल बाजार मोठ्या प्रमाणात फोफावला असताना  चर्मकार समाज आपला पारंपारिक व्यवसाय कसा बसा टिकवून ठेवत व्यवसाय करीत आहेत. मात्र आता लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे चर्मकार समाजाला आर्थिक मदत देण्याची मागणी हराळे समाजाचे माजी अध्यक्ष किरण शिंदे यांनी केली आहे.

Monday, April 20, 2020

पहिली ते आठवीच्या मूल्यमापनाबाबत शिक्षक,पालकांमध्ये संभ्रम

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत . मात्र , या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे आहे की नाही किंवा निकाल  तयार न करताच या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यायचा आहे  का, याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे . हा संभ्रम मिटवून मूल्यमापन , निकाल की थेट प्रवेश याबाबत मार्गदर्शन करण्याचा  योग्य आदेश मिळावा , अशी मागणी विविध शिक्षकांच्या संघटनांनी  शिक्षण संचालक व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे .

Tuesday, April 14, 2020

उमदी पोलीस ठाण्याकडे 26 पदे रिक्त


32 पोलिसांची 48 गावांवर नजर
उमदी,(प्रतिनिधी)-
सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरचा ताण वाढला असून त्यांना 24 तास ड्युटी सांभाळावी लागत आहे. संचार बंदी लागू करण्यात आल्याने पोलिसांना जमाव होऊ नये, म्हणून सतर्क राहावे लागत आहे. जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याकडे असलेल्या पोलिसांच्या कमतरतेमुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण आला आहे. याठिकाणी तब्बल 26 जागा रिक्त आहेत.

Monday, April 13, 2020

(क्राइम स्टोरी) ऐश्वर्याने तिच्या नवऱ्याला का मारले?

नरेशचा मृतदेह 2 दिवसानंतर एका विहिरीत सापडला.  दुर्गंधी पसरला होता, त्यानंतरच लोकांना कळले की विहिरीत एक मृत शरीर आहे.  त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.  नरेशची पत्नी ऐश्वर्या हिने आपला नवरा बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत केली केली होती.  नरेश हा शहरातील एक प्रसिद्ध उद्योजक होता.  वडिलांच्या मृत्यूनंतर तो संपूर्ण व्यवसाय हाताळत होता, त्या मुळे तो खूप व्यस्त होता.  सकाळीदहा वाजता  घराबाहेर पडला की, रात्री दहा नंतरच घरी  परतायचा.

Saturday, April 11, 2020

(क्राईम स्टोरी) मेहंदीचा रंग

आम्ही चार मैत्रिणी बरीच चेष्टा-मस्करी करत असू.  इंजिनिअरिंग कॉलेजचे  हे शेवटचे वर्ष होते.  आमची एकमेकांपासून दूर होण्याची वेळ हळूहळू जवळ येत होती.  त्यामुळे आम्ही सर्वजणी या वेळी एकच प्रयत्न करत होतो की, मस्तीचा कोणताही क्षण दवडू द्यायचा नाही.
 "ऐक संगीता, मी आज तुझ्याबरोबर येऊ शकणार नाही. माझी समीरबरोबर आईस्क्रीम पार्टी आहे," जुही हसत हसत म्हणाली.

Friday, April 10, 2020

मृत्यूंपैकी ८0 टक्के मधुमेह व उच्च रक्तदाबाचे पेशंट

सांगली,(प्रतिनिधी)-
आपल्यासाठी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी बनली असून कोरोनाच्या महामारीचा मोठा फटका मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना बसलेला दिसतो. प्रामुख्याने मुंबई-पुण्यात कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये जवळपास ८0 मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Thursday, April 9, 2020

भारतातील ४0 कोटी लोक दारिद्रय़ात जाणार

पॅरिसमधून एक बातमी आली आहे. जगातील कोरोना संसर्ग झालेल्या अनेक देशांमधील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. भारतालाही याचा मोठा फटका बसणार आहे. 'कोविड-१९'च्या प्रादुभार्वामुळे भारतावर गंभीर परिणाम होणार आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनाययझेशनने (आयएलओ)दिला आहे. कोव्हिड-१९ मुळे जगभरात या वर्षी दुसर्‍या तिमाहीत १९ कोटी लोकांच्या नोकर्‍या कमी होण्याची भीती असून, भारतात ४0 कोटी लोक दारिद्य्रात ढकलले जातील, असा इशारा आयएलओने दिला आहे.

मन करारे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण

सध्याच्या तणावाच्या काळात मनोधैर्य टिकविण्याची गरज आहे . त्यासाठी पुन्हा संतांकडेच जावे लागते . संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे ' मन करा रे प्रसन्न , सर्वसिद्धीचे कारण हे लक्षात ठेवले पाहिजे . आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे . समाजाचे आपण जबाबदार घटक आहोत , हे लक्षात घेऊन प्रत्येकाने सध्याच्या काळात मन प्रसन्न ठेवावे . आपल्या प्रत्येक कृतीमागे अर्थ आहे . ' मस्तकस्य हस्तदय स्पर्शनम् म्हणजे दोन्ही हात जोडून छातीजवळ घ्यायचे व त्यावर मस्तक ठेवून समोरच्याला नमस्कार करायचा , असे सांगितले आहे .

Thursday, April 2, 2020

जत तालुक्यातील आरोग्य विभागाची 103 पदे रिक्त

पदे भरण्यासाठी आमदार सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे 
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात ग्रामीण रुग्णालय व आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात 103 पदे रिक्त आहेत.तातडीने वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी या रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी जतचे आमदार विक्रम सावंत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Sunday, March 29, 2020

आमदार सांवत यांच्याकडून आरोग्य यंत्रणेसाठी 10 लाखाचा निधी

जत तालुक्यात सर्व यंत्रणा दक्ष
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात कोरोना विषाणु प्रभाव रोकण्यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी आमदार निधीतून 10 लाख रूपयाचा निधी दिला आहे.तसे पत्र प्रशासनाला आ.सांवत यांनी आज रविवारी दिले.  या विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी सर्वोच्च खबदारी घ्या,कसल्याही परिस्थिती निधी कमी पडू देणार नाही,असे आश्वासन ही आ.सांवत यांनी प्रशासनाला दिले. देशामध्ये कोरोना या रोगाने थैमान घातले आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तातडीने उपाय योजना करता याव्यात  यासाठी विशेष बाब म्हणून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय यंत्र सामुग्री व साहित्य तात्काळ उपलब्ध करून देता यावी, म्हणून राज्य सरकारने आमदारांना त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अतर्गंत 50 लाख रूपये पर्यंत खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कामगार सेना व जत लायन्स क्लबच्यावतीने पोलिसांना रुमाल वाटप

जत,(प्रतिनिधी)-
संपूर्ण जगभरात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान माजवल्याने मानवजातीवर मोठे संकट ओढवले आहे. भारतात सध्या 900 चा आकडा पार केला असून सर्वाधिक महाराष्ट्र राज्यात आहेत. याचीच खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. यासाठी 24 तास आपले पोलिस प्रशासन व डाॅक्टर आपल्या साठी झटत आहेत.आपणही यांना सहकार्य करत घरी राहून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

Saturday, March 7, 2020

जतच्या भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ

पाणी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
उमदी,(प्रतिनिधी)- 
   जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात  मनमानी  व  बेपर्वा  कारभारामुळे नागरिक हैराण झाले असून कर्मचाऱ्याचा  आढमुठी धोरणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. दिवसा-ढवळ्या आर्थिक लुबाडणूक होत असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन कारभारात सुधारणा करावी अन्यथा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा तालुका पाणी संघर्ष समितीने केली आहे.

Friday, February 28, 2020

दुर्मिळ औषधी वनसंपदा जपा: डाॅ. विनोद शिंपले

जत,(प्रतिनिधी)-
भारत हा जैवविविधतेने समृद्ध देश असून अनेक दुर्मिळ वनौषधींचा खजाना आहे. या दुर्मिळ औषधी वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने प्रामाणिक प्रयत्न करावा असे प्रतिपादन डाॅ. विनोद शिंपले यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे  राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वनस्पतीशास्त्र विभाग, सायन्स असोसिएशन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत "औषधी वनस्पती: ओळख व संवर्धन" या एक दिवसीय कार्यशाळेत 'पश्चिम घाटातील औषधी वनसंपदा' या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते.

वाचण्यातून, बोलण्यातून भाषा समृद्ध होते : लवकुमार मुळे

जत,(प्रतिनिधी)-
आपल्या सभोवताली जे घडते, आपण जे पहातो, अनुभवतो आणि आपण जे वाचन करतो त्यातून आपले व्यक्तीमत्व तर घडतेच, पण त्यातून आपली भाषा समृद्ध होण्यासाठीही मदत होते. त्यासाठी सर्वांनी वाचन, मनन, निरीक्षण आणि जाणीवपूर्वक मराठीचा वापर केला पाहिजे, असे मत कवी लवकुमार मुळे यांनी मराठी साहित्य सेवा मंच, शेगांव व कविवर्य नारायण सुर्वे कवी मंच, रड्डे यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

Wednesday, February 26, 2020

शाळेत मराठीची सक्ती योग्य, भाषा विकासासाठी हवे प्राधिकरण

मराठीच्या संवर्धनासाठी व्यापक उपाययोजनांची गरज : मराठीतील विविध बोलीभाषांचेही व्हावे जतन
जत,(प्रतिनिधी)-
मराठी ही आपली मातृभाषा. अमृतातेही पैजा जिंके, असे मराठीचे वर्णन संत ज्ञानेश्‍वरांनी केले आहे. मात्र, आज मराठीची अवस्था काय आहे? मराठीला वैभवाचे दिवस आणण्यात आपण सर्व तिची लेकरे कमी पडत आहोत. शासकीय कामकाजात मराठी भाषा असली तरी ती घरातून मात्र हद्दपार होत आहे. आता शासनाने अभ्यासक्रमात मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे मराठीच्या संवर्धनाला हातभार लागेल. पण केवळ एवढय़ावर भागणार नाही तर मराठीसाठी स्वतंत्र प्राधिकारणही हवे, अशी मागणी केली जात आहे.

Tuesday, February 25, 2020

भोंदू बाबाने केले पाच बहिणींवर अत्याचार

पुत्रप्राप्ती आणि घरात असलेले गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीमध्ये २२ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. पिंपरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' पुस्तकाचे प्रकाशन

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' बालकथा संग्रहाचे प्रकाशन कुपवाड (सांगली) येथे पार पडलेल्या सहाव्या जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात 'किशोर' मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्याहस्ते पार पडले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सांगली), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे विद्यार्थी साहित्य संमेलन कुपवाड (सांगली) नवकृष्णा व्हॅली  येथे पार पडले. यावेळी लेखक,शिक्षक आणि पत्रकार असलेल्या मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' या बालकथा संग्रहाचे प्रकाशन झाले.

Monday, February 24, 2020

वर्षात 42 हजार लोकांना सर्पदंश


 महाराष्ट्रात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. २0१८-२0१९मध्ये महाराष्ट्रात ४२ हजार २६ जणांना सर्पदंश झाला असून त्याखालोखाल पश्‍चिम बंगालमध्ये ३६ हजार ८५८ घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात नाशिकमध्ये सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडल्या असल्याचेही एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

Sunday, February 23, 2020

संत निरंकारीमार्फत ग्रामीण रुग्णालयांची साफसफाई


जत,(प्रतिनिधी)-
स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँम्बेसेडर असलेल्या संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशनच्यावतीने संत निरंकारी मंडळाचे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन (दिल्ली) शाखा जत  सेवादल युनिट क्रमांक ११६१  यांनी ग्रामीण रुग्णालय जत येथे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविले. देशभरामध्ये एकुण १३२० हाँस्पिटलची स्वच्छता करण्यात आली. जत रुग्णालयाच्या आतील भागाची व बाहेरील संपुर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर जत येथील एस. आर. व्ही. एम. हायस्कुल येथेही स्वच्छता करण्यात आली. यामध्ये सुमारे २०० निरंकारी भाविक भक्त सेवादल महापुरुषांनी सहभाग घेतला.

भूमिहीन व बेघरांना शेतजमीन,घरकुल द्या- संजय कांबळे

जत,(प्रतिनिधी)-
जिल्हयातील भूमिहीन व बेघरांना शेतजमीन व घरकुल देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे.
 राज्यातील भूमीहीनाना पाच एकर जमीन द्यावी याप्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत खालील मागण्या करण्यात येत आहेत.गायरान जमिनीवरील १४ एप्रिल १९९० पर्यंत चे अतिक्रमण नियमित करण्याचा शासन आदेश आहे.

एस.के.कॉम्प्युटर्सचे आमदार सावंत यांच्याहस्ते उदघाटन

जत,(प्रतिनिधी)-
मुस्लिम समाजातील मुलांना धर्माच्या शिक्षणाबरोबर सार्वजनिक शिक्षण देऊन चांगल्या नोकऱ्या मिळवून देण्याची जबाबदारी समाजाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन जतचे आमदार विक्रम सावंत यांनी जत येथे केले.
जत येथे एस. के.कॉम्प्युटर्स सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस या दुकानाच्या उदघाटन सोहळयानिमित्त बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती प्रभाकर कोळी, भुपेंद्र कांबळे, रज्जाकभाई नगारजी, सलीम गंवडी, सलीम पाच्छापूरे, सुनिल गणेश कुलकर्णी यांची होती.

बोर्गी सरपंचांसह सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

जत,(प्रतिनिधी)-
जत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मुलभूत विकासाची कामे मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच वाड्यावस्त्यांसह जत नगर पालिका क्षेत्रातील दहा गावांच्या विविध विकास  कामाचे प्रस्ताव मी महाविकास आघाडी सरकारकडे सादर केलेअसून ती कामे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून घेऊ अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी बोर्गी (ता.जत) येथे बोलताना केले.बोर्गी (ता.जत)  येथील सत्ताधारी संरपचासह अनेक सदस्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

Saturday, February 22, 2020

करजगीत घरास आग ; सव्वा लाखाचे नुकसान

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील करजगी येथील मरमसाब मस्तान जतकर यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले. त्यात संसारउपयोगी साहित्यासह रोख रक्कम ,अर्धा तोळे सोन्याचे दागिने असे सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले.करजगी -मोरबगी रोडला जतकर यांचे घर वजा छप्पर आहे.शनिवारी सकाळी अचानक घरास आग लागली. बघता बघता आगीने उग्ररूप धारण केल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.