आयुष्य
बिनधास्त जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही. कुणाचे वाईट चिंतायचे नाही. कुणाच्या मागे वाईट बोलायचे
नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी
वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात
किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात. ज्याच्याशी
तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर
तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न
करो. आपण त्याच्या विषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि
चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही.
फक्त स्वतः बरोबर दुसर्याचे हीत चिंतायचे.
कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही. ‘जिंदगी मस्तीत
पण शिस्तीत जगायची.‘ थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या
सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता
घालवतात.
*****
कासवाच्या गतीने का होईना; पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे आडवे येतील.
बास ! त्यांना हरवायची हिंमत ठेवा. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका ! कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले, तर ते पुसायला किती
जण येतात, ते मोजा ! आयुष्यात प्रत्येक
व्यक्तीला किंमत द्या. ‘कारण’ जे चांगले
आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील !
*****
एकदा तुरुंगातला एक कैदी दहा वर्षांनंतर तरुंगातून
पळून जाण्यात यशस्वी होतो. पोलिस त्याला शोधण्याच्या मागे लागले.
कसाबसा लपतछपत एकदाचा तो घरी पोहोचला. कैद्याच्या
बायकोनं दरवाजा उघडला. कैद्याची बायको : काय हो, टीव्हीवर दाखवत होते, तुम्ही
आठ तासांपूर्वी पळून गेलायत. इतका वेळ कुठे होतात?

No comments:
Post a Comment