Tuesday, October 30, 2018

गारपीटग्रस्तांना मदत मिळवून देणार: आमदार जगताप

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील रामपूर, घाटगेवाडी,कंठी, वाषाण व परिसरातील काही गावांमध्ये नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, पपई व भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले असून महसूल व कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले असून या सर्व शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी केले. रामपूर येथे आमदार विलासराव जगताप यांनी दोन दिवसापूर्वी भेट देऊन गारपिटीने नुकसान झालेल्या द्राक्ष बाग व भाजीपाला पिकाची पाहणी केली. यावेळी जत पंचायत समितीच्या सभापती सुशीला तांवशी, माजी सभापती प्रकाश जमदाडे, माजी सरपंच मारुती पवार, शिवाप्पा तांवशी आदी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, रामपूर परिसरात अचानक झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बाग, भाजीपाला, ढबू मिरची, पपई, ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करण्याची सूचना तहसीलदार व कृषी विभागाच्या कर्मचारी असून त्यांनी गेल्या दोन दिवस झाले पंचनामे सुरू केले आहेत. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शासनाला अहवाल गेल्यानंतर या शेतकर्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितल

1 comment:

  1. आमदार साहेबांना धन्यवाद .साहेबांनी मंत्रीमंडळाला अर्ज देऊन जास्तीतजास्त मदत मिवून द्यावी ही नम्र विनंती

    ReplyDelete