जत,(प्रतिनिधी)-
जत आणि मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या खैराव
(ता.जत) येथे बेकायदा साठा करून ठेवलेली आठ ब्रास वाळू जत तहसीलच्या भरारी पथकाने
पकडून जप्त केली.
जतचे तहसीलदार सचिन पाटील यांना खैराव गावाच्या
हद्दीत बेकायदा वाळू साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार त्यांनी
भरारी पथकास कारवाईचे आदेश दिले. शेगांव मंडल विभागाचे अधिकारी भरत काळे, तलाठी
अनिल हिप्परकर,राहूल कोळी, सागर भोसले,बाळासाहेब चव्हाण,विनोद कोळी यांच्या पथकाने ही
कारवाई केली. ही वाळू जप्त करून येळवी येथील तलाठी कार्यालयासमोर आणून टाकण्यात
आली आहे. हा साठा कोणी केला आहे,याची माहिती नसल्याने
कोणावरही कारवाई केली नाही. नाव मिळाल्यास कारवाई करण्यात येईल, असे भरत काळे यांनी सांगितले. यावेळी खैरावचे सरपंच राजाराम घुटुगडे,पोलीस पाटील रामचंद्र पाटील, येळवी सरपंच विजयकुमार
पोरे,सचिन माने आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment