महाराष्ट्र
तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व जिल्ह्यात ’कोटपा’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यातील
सर्व हुक्का पार्लर बंद व्हावेत यासाठी पोलीसांनी या कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करावी,
असे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी
दिले.
सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा 2003
(कोटपा) कायद्यांतर्गत महाराष्ट्र तंबाखूमुक्त
करण्याबाबतची बैठक मंत्रालयात नुकतीच आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, जिल्हाधिकारी कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थाचा
वापर करू नये. तसेच कर्मचार्यांनीही या
पदार्थाचा वापर करू नये यासाठी सर्व जिल्हाधिकारी स्तरावर समिती स्थापन करून अंमलबजावणी
करण्यात यावी, अशा सूचना संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील 10 जिल्ह्यात कोटपा अंतर्गत प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. त्याचा पाठपुरावा करून इतर सर्व जिल्हयात प्रभावी कारवाई करण्यात यावी यासाठी
नोडल अधिकार्यांची जिल्हा स्तरावर नेमणूक करावी व याबाबतचा अहवाल
तात्काळ सादर करण्याचे आदेश राज्य पोलीस विभागाला दिले आहेत.
नंदूरबार तसेच यवतमाळ जिल्हा ज्याप्रमाणे तंबाखूमुक्त
शाळा म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर
इतर जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागानेही तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी कारवाई करण्याचा
निर्णय झाला आहे.

No comments:
Post a Comment