Saturday, September 22, 2018

कृषिविभागासह ग्रामस्थांचे काम कौतुकास्पद : आ. जगताप


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील कुलाळवाडी येथे पाणीफौंडेशनने व कृषिविभाग यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या आणि पहिल्याच पावसात पाण्याने भरलेल्या नालाब्लिडींगमधील पाण्याचे पूजन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषिअधिकारी डॉ. कांताप्पा खोत, संभाजी सावंत, जि. प सदस्य सरदार पाटील, विठ्ठल निकम,विष्णू चव्हाण, बाबासाहेब गायकवाड, सरपंच बजरंग कुलाळ, शिवानंद हाक्के, सरपंच बजरंग कुलाळ,कृषिपर्यवेक्षक बाबासाहेब गायकवाड उपस्थित होते.
जत तालुक्यात कुलाळवाडी गावाचा पाणी फौंडेशनमध्ये तृतीय क्रमांक आला होता. पावसाळा चालू होऊन तीन महिने होऊनही पाऊस पडला नव्हता, त्यामुळे पाणी फौंडेशनचे फलित या वर्षी मिळणार नाही अशी भीती कुलाळवाडीच्या नागरिकांना होती, मात्र 4 दिवसांपूर्वी सलग 3 तास पाऊसाने झोडपले. नाला, बंधारे,तुडुंब भरून आहेत व पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला. एवढ्या पाण्याने 5 वर्षे कुलाळवाडी गावाला कमी पडणार नाही अशी स्थिती आहे, त्यामुळे नागरिक समाधानी  आहेत. आमदार जगताप म्हणाले,जत सारख्या दुष्काळी भागात जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी नाला ब्लिडिंगचे काम चांगले केले आहे.

No comments:

Post a Comment