Friday, September 21, 2018

पुढील वर्षात ३३ कोटी वृक्षलागवड

जत,(प्रतिनिधी)-
राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता पुढील वर्षात ३३ कोटी वृक्षलागवडीसाठी राज्य सरकारने पाऊल टाकले आहे. त्यासाठी नियोजन ठरविण्यात आले असून सर्व विभाग व यंत्रणांना वृक्षलागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहेत.

'हरित महाराष्ट्र' संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आणि त्यातून दुष्काळ, पाणीटंचाई व अन्य नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील सध्याचे वनक्षेत्र २0 टक्क्याहून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा सरकारचा संकल्प आहे. त्यासाठी वृक्ष लागवडीचा महात्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्याला आता लोकचळवळीचे स्वरूप आले आहे.
यावर्षी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचा यशस्वी कार्यक्र म राबविण्यात आला. सर्व विभाग व यंत्रणा व सामाजिक संस्थांनी या उपक्र माला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे आता पुढील वर्षात ३३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्र म राबविण्यात येणार आहे.
हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागांना ठराविक वृक्षलागवडीचे उद्दीष्ट दिले आहे. यामध्ये वनविभाग ७.२९ कोटी, सामाजिक वनीकरण ७.२९ कोटी, वनविकास महामंडळ ४.१७ कोटी, ग्रामपंचायत ८ कोटी व इतर यंत्रणा ६.२५ कोटी वृक्षलागवडीचा समावेश आहे. हा कार्यक्र म १ जुलै २0१९ ते ३0 सप्टेंबर २0१९ या कालावधीत सलग तीन महिने राबविला जाणार आहे.

जिवंत वृक्षांची होणार मोजणी
राज्य सरकारने २ कोटी, ४ कोटी, १३ कोटी असे वृक्षलागवडीचे कार्यक्र म राबविले आहेत. पुढील वर्षी ३३ कोटी वृक्षांची लागवड होणार आहे. विविध प्रशासकीय विभागांनी लावलेल्या किंवा यापुढे लावण्यात येणार्‍या वृक्षांचे संरक्षण, संगोपन व वृक्ष जिवंत राहण्याचे प्रमाण याची माहिती राज्य सरकारला द्यावी लागणार आहे. विभागीय आयुक्त हे अशी माहिती सर्व जिल्हाधिकार्‍यांकडून संकलित करतील. तसेच दरवर्षी ३१ ऑक्टोबर व ३१ मे रोजी वृक्षांची मोजणी करून जिवंत असलेल्या वृक्षांची माहिती सरकारला कळवावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment