Friday, November 23, 2018

दुष्काळाचे अधिकार्‍यांना गांभीर्य नाही : सोमनिंग बोरामणी


जत,(प्रतिनिधी)-
 तालुक्यात चालू वर्षी पाऊस नसल्याने शंभर टक्के पेरण्या वाया गेल्या आहेत. निम्म्याहून अधिक तालुका पाण्यासाठी टाहो फोडतोय, जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकांच्या हाताला काम नाही, अशा स्थितीत उपाययोजना करण्याऐवजी कागदी घोडे रंगविण्यात प्रशासन व्यस्त आहे.
तालुक्यातील प्रांत, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून दुष्काळी समस्यांमध्ये लोकांमध्ये मिसळून प्रश्न सोङवतील, अशी अपेक्षा असताना अनेक प्रश्जैसे थेराहिल्याने तालुक्यातील शेतकरी संतप्त आहेत. याची दखल वरिष्टांनी घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा बेळोंडगी (ता. जत) येथील सोसायटीचे चेअरमन सोमनिंग बोरामणी यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले की, जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी आहे. गेले वर्षभर तालुक्यात पावसाचा पत्ता नाही, याचे कोणतेही गंभीर अधिकार्यांना नाही. म्हैसाळ योजनेच्या पाण्याने तालुक्यातील पश्चिम भागातील सात ते आठ गावांना दिलासा मिळाला असला तरी पूर्व भागातील सर्व गावे दुष्काळाने हैराण झाली आहेत. तीव्र दुष्काळात तालुक्यातील अधिकारी काम करण्यास असम र्थ ठरत आहेत. तालुक्यातील अनेक गावांनी टँकरचे प्रस्ताव दिले आहेत. मात्र एकाही गावात अद्यापि टँकर सुरू नाही. तालुक्यातील सर्व अधिकार्यांनी तातडीने सर्वे करून तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर,चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात; अन्यथा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकर्यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा बोरामणी यांनी दिला

No comments:

Post a Comment