Sunday, November 18, 2018

चार्‍यासाठी मेंढपाळांची भटकंती; उपाययोजना शून्यच!

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात यावर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहेयाचा फटका पशुपालकांना बसला असून चार्यासाठी मेंढपाळांची दाहीदिशा भटकंती सुरू आहेयाबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पशुपालकांतून होत आहेजत तालुक्यात चारा छावण्याही सुरू नाहीतत्यामुळे जनावरे जगवायची कशीअसा प्रश्न मेंढपाळांमध्ये निर्माण झाला आहे.
यावर्षी पावसाचे चारही महिने पावसाअभावी निव्वळ कोरडे गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहेजनावरांची संख्या लाखोंच्या घरात असून त्यांना चारा उपलब्ध नसल्याने कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.
जिल्हा परिषदतर्फे वैरण विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेपरंतु चारा लावणार कधी आणि तो प्रत्यक्षात शेतकर्यांच्या दावणीवर मिळणार कधी यामुळे शेतकरी धास्तावला आहेसरकारकडून तर रोज एक घोषणा होत आहेप्रत्यक्षात यंत्रणेवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसून येत नाहीत्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेतटँकर देऊचारा देऊअशी फक्त घोषणाच केली जात आहे,परंतु त्याची अंमलबजावणी काहीच नसल्याने दुष्काळी उपाययोजनांचा बोजवारा उडाला आहे.
 तालुक्याच्या काही भागात सध्या तर माळरानावर मेंढपाळांची भटकंती मोठ्या प्रमाणात सुरू आहेत्यांना चार्याच्या शोधात गावोगावी फिरावे लागत आहेजेथे मोकळे रान आहे तेथे मुक्कामासाठी जावे लागत आहेकेवळ मेंढ्याचाच नाही तर जनावरांनासुद्धा भटकंती करण्याची वेळ आली आहेडफळापूरसाळमगेवाडीबिळूर परिसरात हे चित्र दिसत आहेमंत्री,लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पशुधनाची आकडेवारी जाहीर करून सुविधा पुरवूअसे पोकळ आश्वासन देत आहेपरंतु थेट स्थानिक पातळीवर काहीच हालचाली नसल्याने पशुपालकांचा जीव टांगणीला लागला आहे.
उपाययोजनांची अंमलबजावणी करा
आता रब्बी आणि खरीप दोन्ही हंगाम वाया गेले आहेतत्यामुळे शासनाकडे थेट मदत करण्याशिवाय पर्याय नाहीत्यादृष्टीने पावले टाकण्याची गरज आहेकेवळ चर्चा करून उपयोग नाही तर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची वेळ आहेअसे शेतकर्यांचे मत आहे.

No comments:

Post a Comment