Friday, November 23, 2018

दुष्काळी भागातील शेतत़ळ्यांना जादा निधी देण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील शेतकर्यांसाठी मागेल त्याला शेतत़ळे ही योजना राबवण्यात येत आहेसध्या देण्यात येत असलेले अनुदान अपुरे पडत असून शासनाने दुष्काळी भागातील परिस्थिती लक्षात घेऊन अधिक निधी द्यावाअशी मागणी होत आहे.
राज्यात आतापर्यंत एक लाखांहून अधिक शेततळी तयार झाली आहेतसांगली जिल्ह्यात हाच आकडा दोन हजारांवर आहेशेततळ्यांसाठी 50 हजारांपर्यंत अनुदान शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात जमा होतेवास्तविक हा निधी एका शेततळ्यासाठी पुरेसा नाहीदुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांना शेततळ्याची चांगली मदत व्हावीत्या माध्यमातून रोजगार मिळावा,यासाठी शेततळ्याचे अनुदान वाढवण्यात यावेअशी मागणी होत आहे.
राज्यात मुळात 82 टक्के क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.त्यातच आता जवळ्पास 52 टक्के क्षेत्र हे अवर्षणप्रवणग्रस्त बनले आहेत्यामुळे शेततळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहेदुष्काळी भागातील लोकांना रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहेया शेततळ्यांमुळे संरक्षित पाणीतसेच पुनर्भरण असे दुहेरी हेतू साध्य होतात,त्यामुळे जास्तीत जास्त शेततळी व्हावीतयासाठी शेततळ्यांना अनुदान अधिक द्यावेतसेच शेततळ्यांची संख्या (उदिष्टवाढवण्यात यावेअशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment