Sunday, November 18, 2018

खराब रस्ता आणि धुळीने वाहनचालक बेजार

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील सोलनकर चौक ते मार्केट यार्ड दरम्यानच्या गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना खड्डे आणि धुळीचा त्रास सहन करावा लागत आहेयामुळे अपघाताचा धोका वाढला असून आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहेहा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावाअशी मागणी होत आहे.
सध्या गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहेनागज ते जतपर्यंतचे  काम होत आले आहेरुंदीकरण आणि त्याच्या  मात्र ठेकेदाराने जत शहर वगळून पुढच्या कामाला सुरूवात केली आहेवास्तविक शहरातील रस्ता अगोदर करण्याची आवश्यकता असताना जतवासियांना मरणाचुआ दारात ठेवून ठेकेदाराने नगारटेकापासून कामाला सुरूवात केली आहेमधला दोनअडीच किलोमीटर रस्त्याचे काम थांबवण्यात आले आहेया मार्गावर मुख्य बसस्थानक आहेबँका आहेतमोठी दुकाने आहेतत्यामुळे या मार्गावर गर्दी मोठ्या प्रमाणात असतेत्यामुळे वाहतूक कोंडी होत असतेरस्ता रूंद नसल्याने माल वहतुकीची वाहनेहात गाडीवाले,प्रवाशी वाहतूक करणारे यांनी हा रस्ता पार अडवून टाकला आहेत्यामुळे सोलनकर चौक ते बसवेश्वर चौक हा रस्ता पार करायला तब्बल अर्धा तास लागतो.
याच रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेतगटारीचे पाणी रस्त्यावर येत आहेत्यातच धुळीने वाहनचालकांना बेजार करून टाकले आहेनाकात-तोंडातला धूळ वाचवायला जाताना लोकांना अपघातांना तोंड द्यावे लागत आहेयामुळे वाहनचालक वैतागून गेले आहेतसध्याच्या कामाचा ठेकेदार,नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस मूग गिळून गप्प आहेतकुणाल कशाचेच काही पडले नाही.पण या धुळीने आणि खड्ड्यांमुळे लोकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहेसर्दी,खोकला,थंड-ताप आदी आजार शहरातून हद्दपार व्हायलाच तयार नाहीतठेकेदाराने तातडीने शहरातल्या रस्त्याचे काम हाती घ्यावेअशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment