Friday, November 23, 2018

पाण्याच्या टँकर मागणीला प्रशासनाचा खोडा

नागरिकांमध्ये संताप;आंदोलनाच्या तयारीत
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सर्वाधिक गावांमधून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी असताना प्रशासन त्याची पूर्तता न करता उलट तालुक्यात उपलब्ध असलेले पाण्याचे टँकर आटपाडीला पाठवीत असल्याने नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार प्रशासन करीत आहेअसा आरोप केला जात आहेतातडीने पाण्याचे टँकर सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा पवित्रा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था यांनी घेतला आहे.
दुष्काळ आणि पाण्याची परिस्थिती पाहण्यासाठी अधिकार्यांची समिती स्थापन करण्यात आली आहेत्यांच्या पाहणी अहवालानुसार टँकर द्यायचे कीनाहीअसा पवित्रा प्रशासनाने घेतला आहेमात्र पाहणी अहवलाच्या नावाखाली आणखी किती दिवस घालवला जाणार आहेअसा सवाल उपस्थित होत आहेटँकरची मागणी सुरू होऊन तब्बल अडीच महिन्यांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत,पण प्रशासनाकडून फक्त चालढकल केली जात आहेया अक्षम्य दिरंगाईमुळे संताप व्यक्त होत आहे.
जत तालुक्यात यंदाच्या मोसमात दीडशे मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडला आहेखरे तर हा गेल्या पाच वर्षांतला नीचांक असयाचे सांगितले जात आहेतलाव,कुपनलिकाविहिरी कोरड्या पडण्याबरोबरच ओढे-नालेदेखील कोरडे ठणठणीत पडले आहेतउन्हाची तीव्रता अधिक असल्याने पाण्याची पातळीदेखील खूप खाली गेली आहे. 28 तलावांपैकी तब्बल 16 तलाव कोरडे पडले आहेतज्या काही तलावांत पाणी आहेते पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावेअशी मागणी होत आहेअजून हिवाळ्यासह उन्हाळ्याचे चार महिने बाकी आहेतपुढचे दिवस कसे काढायचेअसा आतापासूनच शेतकर्यांना प्रश्न पडला आहेसध्या तालुक्यात 50 पेक्षा अधिक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेतसध्या हिवाळा आहेहिवाळ्याचे चार आणि उन्हाळ्याचे चार असे आठ महिने लोकांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागणार आहेतसध्या लोक कामधंदा सोडून पाण्याच्या मागे धावत आहेत.पण प्रशासन हा विषय अजून गंभीरपणे घ्यायला तयार नाहीउलट जतला उपलब्ध असलेले टँकर आटपाडीला पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिल्याने संताप व्यक्त होत असून तातडीने टँकर सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा पवित्रा विविध संस्थाराजकीय पक्ष यांनी घेतला आहे.

No comments:

Post a Comment