Monday, December 9, 2019

एकुंडी यल्लम्मा यात्रा उत्साहात

जत,(प्रतिनिधी)-
 एकुंडी येथील रेणुका देवीची यात्रा आज उदं ग आई उदंऽऽ...च्या जयघोषात पारंपरिक उत्साहात झाली.
सकाळी सहा पासून सुरू असलेली रांग रात्री दहापर्यंत कायम होती. सरपंच बसवराज पाटील यांच्यासह स्वयंसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडली. हजारो भाविकांनी श्रद्धेने देवीला आंबील आणि कांदाभाकरीचा नैवेद्य अर्पण केला. अनेक भाविकांनी रानमाळावर बसून नैवेद्याचा आस्वाद घेतला. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मानाचे जग पाटील वाड्यातून बाहेर पडल्यानंतर पुजारी यांनी किचाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर यात्रेची सांगता झाली.

 यावेळी पोलिस पाटील कलगोंडा पाटील, सरपंच बसवराज पाटील, उपसरपंच सरोजनी कोरे, धनंजय नाईक, शशिकांत नाईक, सुरेश महाराज, सदाशिव शेगावे, बाबासाहेब पाटील, दुर्योधन गुड्डोडगी, श्रीमंत लंगुटे, आप्पासो लंगुटे, अनिल गुड्डोडगी, सुरेश गुड्डोडगी, महानिंग म्हेत्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 comment:

  1. चांगल्या पद्धतीने पार पडल्या बद्दल आभारी आहे

    ReplyDelete