Tuesday, November 10, 2020

सुंदर विचार


कुणाच्या  सांगण्यावरून  आपल्या मनात  एखाद्या  व्यक्तीबाबत  चांगले  वा वाईट  मत  बनवण्यापेक्षा,  आपण  स्वत: चार  पावले  चालून  समोरासमोर  त्या व्यक्तीशी  संवाद  साधून  मगच  खात्री करा.

�  नाती  जपण्यासाठी  संवाद  आवश्यक आहे.  बोलताना  शब्दांची  उंची  वाढवा आवाजाची उंची नाही. कारण, पडणार्‍या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही.

� वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस! निवड आपली आहे.

� कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

� डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

�  जे  तुम्हाला  मदत  करायला  पुढे  सरसावतात  ते  तुमचे  काही  देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून...!

� मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि... राजहंस मरताना सुद्धा गातो... दु:खाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि.... सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.

� किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे  अस्तित्व  उद्या  नसते,  मग  जगावे  ते  हसून-खेळून  कारण  या

जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही.

� आयुष्यात कितीही चांगली कर्म करा कौतुक हे स्मशानातच होतं.

●●●●●●●

वाढत्या थंडीमुळे गुड मार्निंगचे मेसेज दुपारी 2.00 वाजेपर्यंत स्विकारले जातील.-अखिल   भारतीय   ग्रुप   अ‍ॅडमीनच्या मीटिंगमध्ये ठरलेला निर्णय.

●●●●●●●●

शब्द  मोफत  मिळतात  ‘पण’  त्यांच्या वापरावर  अवलंबून  असतं  की  त्यांची किंमत ‘मिळेल की’ किंमत ‘मोजावी लागेल’.

●●●●●●●●

प्रश्‍न : 1,000 पाने  लिहियला किती दिवस लागतात?

उत्तर - 

वकील : 5 वर्ष.

डॉक्टर : 1 वर्ष.

पायलट : 5 महिने.

लेखक : 3 महिने.

इंजिनीयर : सबमिशन कधी आहे

ते सांगाल एका रात्रीत लिहुन काढतात.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली*

No comments:

Post a Comment