कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वत: चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा.
� नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही. कारण, पडणार्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही.
� वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झर्यावर राजहंस! निवड आपली आहे.
� कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
� डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
� जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून...!
� मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि... राजहंस मरताना सुद्धा गातो... दु:खाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि.... सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.
� किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या
जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही.
� आयुष्यात कितीही चांगली कर्म करा कौतुक हे स्मशानातच होतं.
●●●●●●●
वाढत्या थंडीमुळे गुड मार्निंगचे मेसेज दुपारी 2.00 वाजेपर्यंत स्विकारले जातील.-अखिल भारतीय ग्रुप अॅडमीनच्या मीटिंगमध्ये ठरलेला निर्णय.
●●●●●●●●
शब्द मोफत मिळतात ‘पण’ त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत ‘मिळेल की’ किंमत ‘मोजावी लागेल’.
●●●●●●●●
प्रश्न : 1,000 पाने लिहियला किती दिवस लागतात?
उत्तर -
वकील : 5 वर्ष.
डॉक्टर : 1 वर्ष.
पायलट : 5 महिने.
लेखक : 3 महिने.
इंजिनीयर : सबमिशन कधी आहे
ते सांगाल एका रात्रीत लिहुन काढतात.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली*
No comments:
Post a Comment