Thursday, September 16, 2021

रक्षा समर्पण


स्वामी विवेकानंद भारत परिक्रमा करत असत. परिक्रमा करत असताना एका छोट्या खेड्यात आले. एका छोट्या झोपडीसमोर येऊन त्यांनी पाणी मागितले. घरातून एक म्हातारी बाहेर आली. तिने आधी त्यांची चौकशी केली, मग त्यांना घरात बोलावले. एक ग्लासभर दुधात चिमूटभर पूड मिसळून त्यांना दिले. नंतर पाणीही दिले. विवेकानंदांनी ते दूध, पाणी प्यायले. तेव्हा ती म्हातारी एकाएकी भावनातिरेकाने रडू लागली.

स्वामीजींनी तिला रडण्याचे कारण विचारले. ती म्हणाली, माझा मुलगा दोन वर्षांपूर्वी वारला, त्याची रक्षा गंगेत समर्पण करण्याची माझी फार इच्छा होती. पण मला ते शक्य झाले नाही. तू गंगा परिक्रमा करून आला आहेस, तुझ्या शरीरात गंगेच्या पाण्याचा थोडा तरी अंश असेल. मी मुलाची चिमूटभर रक्षा दुधात मिसळून तुला दिली. निदान तिथे तरी ती रक्षा गंगेला मिळाली. मी तुला आधी सांगितले नाही, ही फसवणूक झाली. मी त्याबद्दल तुझी क्षमा मागते. पण आज माझ्या

मुलाला मुक्ती मिळाली या आनंदामुळे हे अश्रू आले आहेत. यावर स्वामी विवेकानंदानी आजीला सांगितले की तुमचे योग्य आहे. तुमच्या पुत्राची रक्षा गंगेला मिळाली आहे असेच समजावे. कारण तुम्ही या वयात वाराणशीला जाऊ शकत नाही. हे त्यांचे बोल ऐकून आजींचे डोळे अजूनच पाणवले. स्वामी विवेकानंदांची

पाठ थोपटत त्यांनी त्यास आशीर्वाद दिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी आज्जीच्या निरोप घेऊन पुढील तिर्थटनास निघाले.

*******

स्थळ पसंत पडून मुलाकडची मंडळी होकार देणारच होती...

तेवढ्यात किचनमधून आवाज आला, आई चहासाठी किती शिट्ट्या...?

मुलाकडचे आम्ही येतो...सांगायला पण थांबले नाहीत...!


No comments:

Post a Comment