Friday, June 4, 2021

सहवासाचा परिणाम

 


*सहवासाचा परिणाम*

सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याच सुरेख उदाहरण आचार्य विनोबांनी दिले होते.

ते म्हणतात, की आकाशातून पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही… तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांचं अस्तित्वच संपून जाते, तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर पडला, तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला, तर प्रत्यक्ष मोतीच बनतो…

थेंब तोच, परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्यांचं अस्तित्व त्याची पत प्रतिष्ठा अवलंबून असते…!

¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿

कुणीतरी फुलाला विचारले,

झाडावरून तोडले तेव्हा

तुला वेदना झाल्या नाहीत का रे?

फुलाने उत्तर दिले,

तोडणारा इतका आनंदात होता की,

मी माझ्या वेदनाच विसरून गेलो.

¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿

मानवी जीवन यशस्वी व्हायचा

तडजोड हाही एक मार्ग आहे……

माणसाने ती करायला शिकलं पाहिजे;

जिथं जिथं तडा जाईल,

तिथं तिथं जोड देता आला की,

कुठलंच नुकसान होत नाही..!!

तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,

तर ती परिस्थितीवर केलेली

मात असते..!!

¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿

*वाचा विनोद*

संताला आपला कुत्रा विकायचा होता. आणि बंता त्याला विकत घेणार होता.

बंता : हा कुत्रा विश्वासू तर आहे ना?

संता : हो आहेना, मी याला आतापर्यंत तीनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की

प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो.

No comments:

Post a Comment