Monday, May 24, 2021

नव्या म्हणी… तेवढ्याच उद्बोधक

 


हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात,

कोरोनाला हरवायला, बसा आपापल्या घरात

मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर,

सगळ्यानी मास्क घालूनच पडा घराबाहेर,

शंकराच्या पिंडीवर बेलाच पान ठेवते वाकून,

रोजचे व्यवहार करा सोशलडिस्टंसिंग राखून

शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा,

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा

ताजमहाल, कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,

लक्षण दिसली कोरोनाची तर डॉक्टरना भेटा थेट

काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,

कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले

चिमणीला म्हणतात चिऊ, कावळ्याला म्हणतात काऊ,

आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ,

चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,

डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप, 

काळजी घ्या, सुरक्षित राहा…

*************************************

वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो… गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो… तसेच चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही… म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणार्‍या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणार्‍या लोकांच्या सानिध्यात राहावे

**************************************

स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो. कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते, म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे…

****************************************

जेव्हा नखं वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो. नखं वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही… त्याचप्रमाणे, जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा, तुमच्यातल्या नात्याला कापू नका… ‘विश्वास’ एखाद्यावर इतका करा की, तुम्हाला ‘फसवताना’ तो स्वत:ला ‘दोषी’ समजेल…

No comments:

Post a Comment