Tuesday, December 6, 2016

आता जानकरही टिपले जाणार का?


जत,(मच्छिंद्र ऐनापुरे)-
राजकारणी माणसाला नेहमी सावध राहावं लागतंकारण राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतातअस्तित्वाच्या या लढयात कधी शिकारी वरचढ होतो तर कधी त्याचीच शिकार होऊन जातेस्वातंत्र्यानंतरच्या काळात पूर्वीचे मंत्री राजकारण करीत नव्हते असे म्हणण्यापेक्षा आपल्याकडून कायदे मोडणार नाहीतसंसदीय प्रथा परंपरांचे नीट पालन होईलत्यावर भर देत होते.  मात्रपुढे 1980 प्रघात झाला आणि मंत्र्यांची प्रतिमा डागाळण्याचे सत्र सुरू झालेभ्रष्टाचार अन् आरोपांच्या फैरीत आजवर तीन मुख्यमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे तर अनेक मंत्र्यांना राजिनामा देऊन पदावर पाणी सोडावे लागले होते
सध्या राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर निवडणूक अधिकार्याला धमकविल्याचे आरोप होताहेतत्यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहेजानकरांच्या कृत्यावरून त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावाअशी मागणी जोर पकडू लागली आहेपरंतुअशा मागण्या काही आता नवीन राहिलेल्या नाहीतइतिहासावर लक्ष घातल्याससर्वप्रथम 12 जानेवारी 1982 ला प्रतिभा प्रतिष्ठान आणि सिमेंट घोटाळ्याच्या आरोपामुळे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए . आरअंतुले यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलामुलीच्या एमडी अभ्यासक्रमात गुणवाढ दिल्याप्रकरणी मार्च 1986 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनाही राजीनाम्याला सामोरे जावे लागले होते.  जून 1988 मध्ये जेजेरुग्णालयातील औषध घोटाळा प्रकरणी तत्कालीन आरोग्यमंत्री भाई सावंत यांनाही ’लेन्टीन’ आयोगाच्या अहवालानंतर राजीनामा द्यावा लागलागोवारी हत्याकांडानंतर 30 नोव्हेंबर 1994 ला आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनाही तोच कित्ता गिरवावा लागला होतागैरव्यवहाराच्या आरोप झाल्यामुळे 24 एप्रिल 1997 ला तत्कालीन कृषिमंत्री शशिकांत सुतार यांनाही पदावरून दूर जावे लागलेपाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर यांनाही 5 डिसेंबर 1996 मध्ये राजीनामा द्यावा लागला.
गृहमंत्री पदावर असताना नवाब मलिक यांना लोकायुक्तांच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्यामुळे 15 मार्च 2005 ला राजीनाम्याला पुढे जावे लागलेअण्णा हजारे यांनी एका घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर सुरेश जैन यांनाही मागे फिरावे लागलेवनविभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वनमंत्री सुरूपसिंग नाईक यांचेही 12 मे 2006 मध्ये तेच झालेबहुचर्चित आदर्श घोटाळा प्रक रणी 2010 मध्ये अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागलेभ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तर राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले छगन भुजबळ सध्या तुरुंगात आहेगैरव्यवहाराच्या आरोपाखाली एकनाथ खडसेनाही महसूल खाते सोडावे लागलेएकूणच, 1980 पासून भ्रष्टाचारगैरव्यवहाराचे आरोप आदीप्रकरणांमुळे पद गळतीची सुरुवात झालीआता राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर महादेव जानकर याच आरोपांच्या कात्रीत अडकले आहेतत्यामुळे आताजानकरही टिपले जाणार कायाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment