Saturday, December 3, 2016

आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे


जत,(प्रतिनिधी)-
बाजारात येणार्या नामांकित कंपन्यांची आधुनिक शेती अवजारे घेण्याकडे कल वाढल्यानेऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू देअसे म्हणत घणाच्या घावाने अवजारांना आकार देणार्या, श्रमामधूनच रोजीरोटी मिळविणार्या घिसाडी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. ‘आभाळागत माया तुझी आम्हावर राहू देही देवाकडे भाकली जाणारी करुणादेखील कामी येत नसल्याची स्थिती आहे.
घिसाडी हा भटके विमुक्तांमधील आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागे राहिलेला समाज आहे. आधीच्या पिढ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले नाही; त्यामुळे त्यांची प्रगती खुंटल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. खोरे, टिकाव, खुरपे, कुर्हाड, विळे, म्हशीच्या भोरकड्या, कोयते, दाताळे आदी शेती व जनावरांसाठी लागणारे साहित्य बनवून देणे हा या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. यातून जे मिळेल त्यावरच कुटुंबांची गुजराण करीत हा समाज जगतो आहे.

दहा-वीस वर्षांपूर्वी पक्की घरे बांधणेदेखील दुरापास्त होते. पालं ही त्यांची घरं, अशी स्थिती होती. कसण्यासाठी अपवादानेच जमिनी होत्या. काळाच्या ओघात शेतीचे तंत्र बदलत चालले. वेळ, मनुष्यबळ व पर्यायाने पैशांचीही बचत होणार असल्यामुळे ती अवजारे घेण्याचा शेतकर्यांचा कल वाढू लागला. पण, एखाद्याच्या प्रगतीच्या पावलांखाली दुसर्याच्या अधोगतीची सावली असते. या नियमानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा फटका या समाजाच्या कारागिरीला बसला आहे. जत शहरातील या समाजाची व्यथादेखील मोठी आहे. विठ्ठलनगर रोडला या समाजाने पाले टाकून आपला व्यवसाय सुरू केला असला तरी बाजारात मिळणार्या कंपन्यांच्या तयार अवजारांमुळे त्यांच्या साधनांना मागणी कमी असल्याचे दिसून येत असून त्यामुळे हा व्यवसाय करणार्या या समाजातील लोकांना आर्थिक तंगीला सामोरे जावे लागत आहे.

No comments:

Post a Comment