Saturday, December 3, 2016

वृक्ष तोडणार्‍यावर होणार फौजदारी कारवाई


 घराच्या आवारातील झाडेही घरमालकाला विनापरवाना तोडता येणार नाहीत
जत,(प्रतिनिधी)-
वृक्ष लागवड योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर आणि आता वृक्ष लागवड चळवळ बनलेली असताना शासनाने अवैध वृक्षतोडीला अतिशय गांभीर्याने घेतले आहे. यापुढे वृक्षतोड आढळल्यास तोडणार्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे घराच्या आवारातील झाडेही घरमालकाला विनापरवाना तोडता येणार नाही.
      शेतजमिनीच्या बांधावरील मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जाते. रस्त्याच्या बाजूला मोठ्या वृक्षांच्या बुंध्यामध्ये विस्तव टाकून हे वृक्ष जाळण्याचे प्रकार वाढले आहे. एका वृक्षाची परवानगी काढून दहा ते बारा झाडे तोडून अवैधरित्या लाकूड तस्करीत वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित वनाधिकारी तसेच प्रशासनातील अधिकारी मालामाल होत आहेत.
विशेषत: शहराच्या ठिकाणी ले-आऊट तयार करताना झाडांची कत्तल करून जमीन आकर्षक करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे परवानगीकरिता अर्ज करण्यात येत असतो.तसेच घर बांधताना नगरपरिषद व ग्रामीण भागात घराचे बांधकाम करताना ग्रामपंचायतीची परवानगी घेणे अनिवार्य आहे. आता ही परवानगी देण्यापूर्वी घेण्यापूर्वी प्लाट ले - आऊट धारकांना किंवा घराचे बांधकाम करणार्यांना, प्लॉट धारकांना वृक्ष लागवड करावी लागणार आहे. संबंधित जागेवर कितपत लागवड झाली या बाबीबी खात्री संबंधित अधिकार्यांना करावी लागणार आहे.
वृक्ष लागवड झाल्यानंतर रितसर परवानगी देण्यात येणार आहे. वृक्ष लागवड न केल्यास आणि बांधकाम केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य शासनाने सर्व जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे. मात्र एवढे हे सर्व होऊनही अवैध वृक्षतोड झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित नक्कीच होईल.
वृक्षतोडीने पर्यावरणाचा र्हास

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवितीहे संत तुकोबारायांच्या ओळीघरोघरी लावा वृक्ष, मिळेल तुम्हा मोक्षया सत्यवचनाची साक्ष देते. परंतु आज मानवाने व्यापारी व घरगुती कारणासाठी जंगलातील व शेतातील वृक्षतोड करून पर्यावरणाचा सत्यानाश केला आहे. या गंभीर जंगलतोडीनेच पाऊस सुद्धा रुसून बसल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. श्रेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी काव्यातून लिहिलेलेकसा झाला हा माणूस कडू लिंबाचा रे पाला, येल काकडीचा होता, बार कारल्याचा आलाहे काव्य आजच्या निर्दयी वृक्षतोडी माणसाला तंतोतंत शोभेल असेच आहे. अशी ही वृक्षे तोडताना आता लोकांना दहादा विचार करावा लागणार असला तरी यातल्या अवैध मार्गाबाबत प्रश्न अनुत्तरीत आहे.

No comments:

Post a Comment