Wednesday, January 18, 2023

जात्यावरील ओव्या होताहेत कालबाह्य


ग्रामीण भागातील आधुनिक साहित्याचा वापर 

 सांगली,(जत न्यूज नेटवर्क)-

 पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात पहाटेची सुरुवात जात्याच्या घरघरीने व्हायची. घरातील कर्ती महिला जात्यावर दळण दळत दळत ओव्या गायची. जात्याचा आवाज हाच त्या गाण्यांसाठी पार्श्वसंगीत असायचा. त्या काळात महिलांना अभिव्यक्त होण्याचे जात्यावरील ओव्या हे एक प्रमुख माध्यम होते. काळाचे चक्र जसे फिरले तसे जात्याचे चक्र नामशेष होताना दिसत आहे. विज्ञानाने मोठी प्रगती साधल्यामुळे आज खेड्यापाड्यांतही पिठाची गिरणी आली आहे. यामुळे आधुनिक काळात जाते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यावरील ओव्या इतिहासजमा होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

एक काळ असा होता, की जाते हे सासुरवाशिणीला अभिव्यक्त होण्यासाठीचे हक्काचे ठिकाण होते. आजच्या काळात फेसबुक, इन्स्टाग्राम ही माध्यमे चांगल्या अर्थाने लोकांच्या अभिव्यक्तीची माध्यमे झाली आहेत. यांचा वापर करत विविध पद्धतीने महिला-पुरुष अभिव्यक्त होत आहेत, पण जुन्या काळात कुठलीही माध्यमे नव्हती. 

विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्याने जुनी साधणे अडगळीत पडल्याचे, कालबाह्य झाल्याचे जाणवत आहे. जाते हाही यातीलच एक भाग आहे. लग्नकार्यात, समारंभाप्रसंगी जात्यावरील हळद दळणे व त्या वेळी गाणे म्हणण्याची पद्धत प्रचलित होती. एखादा सण उत्सव असल्यास घरामध्ये त्या त्या प्रकारचे गोडधोड करण्यासाठी तांदूळ, मूग, तुरडाळ आदी धान्येही जात्यावर दळली जात होती. आता घरोघरी घरघंटी उपलब्ध झाल्या आहेत. पिठांच्या गिरण्यांमध्येही स्पर्धा वाढू लागली आहे, परंतु या सर्व गोष्टीत पारंपरिक जाते मात्र काळानुरूप इतिहासजमा झाले आहे.  आज जरी आधुनिक युगामध्ये नवनवीन बदल झालेले असले, तरी 

 आणि अनेक घरात परंपरेने जुनी जाती हस्तांतरित झाली असली तरी त्याचा वापर क्वचितच कधी तरी होतो. कुणाच्या तरी लग्न समारंभाच्या प्रसंगाने त्याचा उपयोग होतो. मात्र बदलत्या काळानुसार दगडी जाते व ओव्या कालबाह्य होऊ लागल्या आहेत. 

No comments:

Post a Comment