Thursday, April 30, 2020

लॉकडाऊन’ कालावधीत ७० टक्के नागरीक चिंताग्रस्त

कोरोनाबाबत डीवायपाटील फार्मसी महाविद्यालयाने केले सर्वेक्षण
पिंपरी : आरोग्य सेवांमध्ये दर्जात्मक सुधारणा गरजेची, २० टक्के जनता कोरोना बाबतीत अनभिज्ञ, ७० टक्के नागरीक चिंताग्रस्त असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयाने ’लॉकडाऊन’मध्ये केलेल्या राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन सर्वेक्षणातून निदर्शनास आले.

उमदीत गूळ खरेदी-विक्रीवर बंदी: उमदी पोलीस

किराणा दुकानातून विक्री होत राहिल्यास  कारवाई 
माडग्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 उमदीत हातभट्टी दारू बनविण्यासाठी गुळाचा वापर केला जात असल्याने उमदी पोलिसांनी गूळ खरेदी-विक्री वर बंदी घालण्यात आली आहे.  उमदी येथील किराणा दुकानदार केवळ   नफा  न  पाहता कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर आपल्या व  ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. असे असताना कांहीं दुकानदारांनी    गुळ  स्टॉक करून  हातभट्टी दारू तयार करण्याऱ्या कांही जमातींना देत आहेत. सध्या सरकारी दारू दुकाने बंद असल्याने गावातील कांही लोक हातभट्टीकडे वळले आहेत  त्यातच  कर्नाटक राज्यातील चडचण, देवरनिंबर्गी, हिंचगिरी, निवर्गी आदी भागातील लोक दारू पिण्यास उमदीत येत आहेत.

Thursday, April 23, 2020

शासकीय कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यात होणाऱ्या बदल्या रद्द करा

शिक्षक नेते मच्छिंद्र ऐनापुरे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दरवर्षी राज्यातील जिल्हा परिषदेसह इतर राज्य शासनाच्या अखत्यारित येणार्‍या विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या माहे मे महिन्यात करण्यात येतात. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण शासन व यंत्रणा अत्यंत व्यस्त असल्यामुळे यावर्षी मे महिन्यात होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करून प्रशासकीय बदल्यांवर होणारा ५00 कोटींचा खर्च कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर वळता करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक नेते मच्छिंद्र ऐनापुरे यांनी ग्राम विकास व पंचायत राज विभागाकडे करण्यात आली आहे.

Wednesday, April 22, 2020

चर्मकार समाजाला आर्थिक मदत देण्याची मागणी

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
तयार कंपन्यांच्या चप्पल बाजार मोठ्या प्रमाणात फोफावला असताना  चर्मकार समाज आपला पारंपारिक व्यवसाय कसा बसा टिकवून ठेवत व्यवसाय करीत आहेत. मात्र आता लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे चर्मकार समाजाला आर्थिक मदत देण्याची मागणी हराळे समाजाचे माजी अध्यक्ष किरण शिंदे यांनी केली आहे.

Monday, April 20, 2020

पहिली ते आठवीच्या मूल्यमापनाबाबत शिक्षक,पालकांमध्ये संभ्रम

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत . मात्र , या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे आहे की नाही किंवा निकाल  तयार न करताच या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यायचा आहे  का, याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे . हा संभ्रम मिटवून मूल्यमापन , निकाल की थेट प्रवेश याबाबत मार्गदर्शन करण्याचा  योग्य आदेश मिळावा , अशी मागणी विविध शिक्षकांच्या संघटनांनी  शिक्षण संचालक व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे .

Tuesday, April 14, 2020

उमदी पोलीस ठाण्याकडे 26 पदे रिक्त


32 पोलिसांची 48 गावांवर नजर
उमदी,(प्रतिनिधी)-
सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरचा ताण वाढला असून त्यांना 24 तास ड्युटी सांभाळावी लागत आहे. संचार बंदी लागू करण्यात आल्याने पोलिसांना जमाव होऊ नये, म्हणून सतर्क राहावे लागत आहे. जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याकडे असलेल्या पोलिसांच्या कमतरतेमुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण आला आहे. याठिकाणी तब्बल 26 जागा रिक्त आहेत.

Monday, April 13, 2020

(क्राइम स्टोरी) ऐश्वर्याने तिच्या नवऱ्याला का मारले?

नरेशचा मृतदेह 2 दिवसानंतर एका विहिरीत सापडला.  दुर्गंधी पसरला होता, त्यानंतरच लोकांना कळले की विहिरीत एक मृत शरीर आहे.  त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.  नरेशची पत्नी ऐश्वर्या हिने आपला नवरा बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत केली केली होती.  नरेश हा शहरातील एक प्रसिद्ध उद्योजक होता.  वडिलांच्या मृत्यूनंतर तो संपूर्ण व्यवसाय हाताळत होता, त्या मुळे तो खूप व्यस्त होता.  सकाळीदहा वाजता  घराबाहेर पडला की, रात्री दहा नंतरच घरी  परतायचा.