Friday, April 10, 2020

मृत्यूंपैकी ८0 टक्के मधुमेह व उच्च रक्तदाबाचे पेशंट

सांगली,(प्रतिनिधी)-
आपल्यासाठी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी बनली असून कोरोनाच्या महामारीचा मोठा फटका मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना बसलेला दिसतो. प्रामुख्याने मुंबई-पुण्यात कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये जवळपास ८0 मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Thursday, April 9, 2020

भारतातील ४0 कोटी लोक दारिद्रय़ात जाणार

पॅरिसमधून एक बातमी आली आहे. जगातील कोरोना संसर्ग झालेल्या अनेक देशांमधील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. भारतालाही याचा मोठा फटका बसणार आहे. 'कोविड-१९'च्या प्रादुभार्वामुळे भारतावर गंभीर परिणाम होणार आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनाययझेशनने (आयएलओ)दिला आहे. कोव्हिड-१९ मुळे जगभरात या वर्षी दुसर्‍या तिमाहीत १९ कोटी लोकांच्या नोकर्‍या कमी होण्याची भीती असून, भारतात ४0 कोटी लोक दारिद्य्रात ढकलले जातील, असा इशारा आयएलओने दिला आहे.

मन करारे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण

सध्याच्या तणावाच्या काळात मनोधैर्य टिकविण्याची गरज आहे . त्यासाठी पुन्हा संतांकडेच जावे लागते . संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे ' मन करा रे प्रसन्न , सर्वसिद्धीचे कारण हे लक्षात ठेवले पाहिजे . आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे . समाजाचे आपण जबाबदार घटक आहोत , हे लक्षात घेऊन प्रत्येकाने सध्याच्या काळात मन प्रसन्न ठेवावे . आपल्या प्रत्येक कृतीमागे अर्थ आहे . ' मस्तकस्य हस्तदय स्पर्शनम् म्हणजे दोन्ही हात जोडून छातीजवळ घ्यायचे व त्यावर मस्तक ठेवून समोरच्याला नमस्कार करायचा , असे सांगितले आहे .

Thursday, April 2, 2020

जत तालुक्यातील आरोग्य विभागाची 103 पदे रिक्त

पदे भरण्यासाठी आमदार सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे 
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात ग्रामीण रुग्णालय व आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात 103 पदे रिक्त आहेत.तातडीने वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी या रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी जतचे आमदार विक्रम सावंत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Sunday, March 29, 2020

आमदार सांवत यांच्याकडून आरोग्य यंत्रणेसाठी 10 लाखाचा निधी

जत तालुक्यात सर्व यंत्रणा दक्ष
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात कोरोना विषाणु प्रभाव रोकण्यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी आमदार निधीतून 10 लाख रूपयाचा निधी दिला आहे.तसे पत्र प्रशासनाला आ.सांवत यांनी आज रविवारी दिले.  या विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी सर्वोच्च खबदारी घ्या,कसल्याही परिस्थिती निधी कमी पडू देणार नाही,असे आश्वासन ही आ.सांवत यांनी प्रशासनाला दिले. देशामध्ये कोरोना या रोगाने थैमान घातले आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तातडीने उपाय योजना करता याव्यात  यासाठी विशेष बाब म्हणून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय यंत्र सामुग्री व साहित्य तात्काळ उपलब्ध करून देता यावी, म्हणून राज्य सरकारने आमदारांना त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अतर्गंत 50 लाख रूपये पर्यंत खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कामगार सेना व जत लायन्स क्लबच्यावतीने पोलिसांना रुमाल वाटप

जत,(प्रतिनिधी)-
संपूर्ण जगभरात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान माजवल्याने मानवजातीवर मोठे संकट ओढवले आहे. भारतात सध्या 900 चा आकडा पार केला असून सर्वाधिक महाराष्ट्र राज्यात आहेत. याचीच खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. यासाठी 24 तास आपले पोलिस प्रशासन व डाॅक्टर आपल्या साठी झटत आहेत.आपणही यांना सहकार्य करत घरी राहून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

Saturday, March 7, 2020

जतच्या भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ

पाणी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
उमदी,(प्रतिनिधी)- 
   जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात  मनमानी  व  बेपर्वा  कारभारामुळे नागरिक हैराण झाले असून कर्मचाऱ्याचा  आढमुठी धोरणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. दिवसा-ढवळ्या आर्थिक लुबाडणूक होत असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन कारभारात सुधारणा करावी अन्यथा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा तालुका पाणी संघर्ष समितीने केली आहे.