जत,(प्रतिनिधी)-
जीवनात यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी व्यक्तींची चरित्रे वाचावीत, असे आवाहन ज्येष्ठ लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी जिरग्याळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'लेखक आपल्या भेटीला' या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय लोहार होते.
Thursday, February 20, 2020
Monday, February 17, 2020
जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन 25 रोजी
गौतम पाटील संमेलनाध्यक्ष
सांगली,(प्रतिनिधी)-
येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग (प्राथमिक माध्यमिक) जिल्हा परिषद सांगली व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय 6 वे विद्यार्थी साहित्य संमेलन मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2020 रोजी नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यम, कुपवाड एमआयडीसी, सांगली येथे संपन्न होत असून या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून गौतम बाहुबली पाटील इयत्ता सातवी,समडोळी यांची निवड झाली आहे.
सांगली,(प्रतिनिधी)-
येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग (प्राथमिक माध्यमिक) जिल्हा परिषद सांगली व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय 6 वे विद्यार्थी साहित्य संमेलन मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2020 रोजी नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यम, कुपवाड एमआयडीसी, सांगली येथे संपन्न होत असून या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून गौतम बाहुबली पाटील इयत्ता सातवी,समडोळी यांची निवड झाली आहे.
Friday, January 24, 2020
परवीन बाबीच्या आयुष्याची शोकांतिका
परवीन बाबी हे नाव समोर उच्चारले की आपल्यासमोर येतो तिचा ग्लॅमरस अंदाज. बॉलिवूडची दिवा असं तिला म्हटलं जायचं. तिचं 'जवानी जानेमन हे गाणं' असो किंवा 'प्यार करनेवाले प्यार करते हैं शान से' हे गाणं असो किंवा अगदी खुद्दार सिनेमातलं 'मच गया शोर सारी नगरी रे' असो आजही तिची गाणी लोकांच्या लक्षात आहेत. मनावर रुंजी घालत आहेत. मात्र या परवीन बाबीचा मृत्यू झाला ते तीन दिवसांनी समजलं होतं. तिला जाऊन १५ वर्षे झाली आहेत. मात्र तिच्या अनेक चित्रपटांमुळे आणि एकाहून एक सरस गाण्यांमुळे ती आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहे आणि यापुढेही राहिल.
...आणि लग्नात नीतू आणि ऋषी पडले बेशुद्ध
बॉलिवूडमधील 'ऑल टाईम हीट' जोडी म्हणजे अभिनेता ऋषी कपूर आणि नितू कपूर. 'जहरीला इन्सान' या चित्रपटाच्या सेटवर ओळख झालेल्या या जोडीच्या लग्नाला आता जवळपास ४0 वर्ष झाली आहे. मात्र त्यांचं एकमेकांप्रतीचं प्रेम, आदर यत्किंचितही कमी झालेला नाही. 'जहरीला इन्सान' या चित्रपटाच्याच वेळी या दोघांमधलं प्रेम खुललं आणि १९८0 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. परंतु ऐन लग्नात नितू आणि ऋषी कपूर बेशुद्ध पडले होते. या मागचं कारण नितू कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
वसंत पंचमीचे महत्त्व
वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. भारतात साधारणत: मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणार्या संस्थांमध्ये, विद्येची देवता-सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो.
Thursday, January 23, 2020
आचार्य चाणक्य देतात सुखी जीवनाचा मंत्र
आचार्य चाणक्य एक महान नीतिकार होते. त्यांनी सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी विविध नीती सांगितल्या आहेत. आजच्या काळातही या नीतींचे पालन केल्यास व्यक्ती अडचणींपासून दूर राहू शकतो. चाणक्याच्या या दोह्यामधून समजू शकते की, व्यक्तीने कोणत्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहावे आणि कोणत्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहू नये.
Wednesday, January 22, 2020
भारतातील 231 शहरे सर्वात प्रदूषित
भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात म्हटले आहे. झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)






