Friday, December 4, 2020

भांगेला औषध म्हणून संयुक्त राष्ट्राची मान्यता


हजारो वर्षांपासून भांगेचा वापर हा मादक पदार्थ आणि औषध म्हणून करण्यात येतो. फक्त भारतीय उपखंडच नव्हे तर जगभरात भांगेचा असा वापर करण्यात येतो. आता संयुक्त राष्ट्र संघाने भांगेचा वापर औषध म्हणून करण्यास मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या अंमली पदार्थ आयोगाने भांगेला अंमली पदार्थाच्या यादीतून वगळले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने औषध म्हणून मान्यता दिली असली तरी वैद्यकीय कारण वगळून इतर कारणांसाठी त्याचा वापर करण्यास बंदी आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थाच्या यादीतून भांगेला वगळण्याबाबत मतदान झाले. यावेळी २७ सदस्य देशांनी प्रस्तावाच्या बाजूने आणि २५ सदस्यांनी प्रस्तावाविरोधात मतदान केले. या ऐतिहासिक मतदानात अमेरिका आणि ब्रिटनने यादीतील बदलाच्या बाजूने मतदान केले. तर, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नायजेरिया, रशिया आदी देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. संयुक्त राष्ट्राच्या मान्यतेनंतर भांगेपासून तयार करण्यात आलेल्या औषधांची मागणी असणार्‍या देशांचा फायदा होणार आहे. त्याशिवाय भांगेच्या औषधी गुणधर्माबाबत अधिक संशोधन होण्याची शक्यता आहे.

भारतात हजारो वर्षांपासून भांगेचा वापर करण्यात येतो. धार्मिक कर्मकांडातही त्याचा वापर करण्यात येतो. चीन आणि इजिप्तमध्येही भांगेचा वापर हजारो वर्षांपासून औषध म्हणूनच करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता दिल्यामुळे आता अनेक देशांना भांगेचा वापर औषध म्हणून करता येणार आहे. जगभरातील ५0 हून अधिक देशांमध्ये भांगेचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कॅनडा, उरुग्वे आणि अमेरिकेतील १५ राज्यांमध्ये भांगेचा औषधी वापर करण्यास परवानगी आहे.

संयुक्त राष्ट्र संघाकडून भांगेला मान्यता मिळणे ही मोठी बाब असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. भांगेचा वापर अनेकजण औषध म्हणून करतात. भांगेपासून तयार करण्यात आलेल्या औषधांची विक्रीही वाढली आहे. औषध म्हणून भांगेला मान्यता देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. भांगेवर बंदी घालण्याचा निर्णय हा वसाहतवादी विचारांचा परिणाम असल्याचे एनजीओने म्हटले आहे. भांगेवर बंदी असल्यामुळे जगभरातील अनेकजणांना दोषी असल्याचे समजण्यात येत होते.

Wednesday, December 2, 2020

फ्लॉवरचे औषधी गुणधर्म


आपल्या रोजच्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असतो. शिवाय ऋतूमानानुसार विशिष्ट भाज्या उपलब्ध असतात. मात्र, त्यांचं आरोग्यदृष्ट्या महत्त्व लक्षात घ्यायला हवं. त्यादृष्टीने आज फ्लॉवरचे गुणधर्म जाणून घेऊ. फ्लॉवर चविष्ट आहे शिवाय अनेक उपयुक्त गुणधर्मांनी युक्त आहे. आदिवासी जमातींच्या आहारातही या भाजीला महत्त्व दिलेलं दिसतं. फ्लॉवरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिनं, कबरेदकं, लोह, अ, ब, क ही जीवनसत्त्वं, आयोडिन, पोटॅशियम आणि काही प्रमाणात तांबं असे पोषक घटक असतात. त्याचं सेवन गुणकारी ठरतं. हिरड्यांमधून रक्त येत असेल तर फ्लॉवरच्या पानांचा रस प्रभावी ठरतो. कच्चा फ्लॉवर खाल्ला तर हिरड्यांवरची सूज कमी होते. दररोज रिकाम्या पोटी फ्लॉवरचा रस प्यायला तर कोलायटीस आणि पोटाचे इतर विकार दूर होतात. गळ्याला सूज आली असेल तर फ्लॉवरच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. गळ्याच्या इतर विकारांवरही हा रस प्रभावी आहे. कच्चा फ्लॉवर स्वच्छ धुवून चावून खावा. यामुळे रक्त शुद्ध होतं आणि त्वचाविकार दूर होतात. भरपूर प्रमाणात लोह, प्रथिनं असल्याने शरीराला भरपूर उर्जा मिळते. रात्री झोपण्यापूर्वी फ्लॉवरचा रस प्यायल्यास बद्धकोष्ठतेच्या तक्रारी दूर होतात आणि पोट साफ होऊन जाते.

एड्सला ४0 वर्षे लोटले तरी अद्याप लस नाही


सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

एड्स या रोगाला ४0 वर्षे लोटल्यांतरही अद्याप लस मिळालेली नाही. कोणत्याही महामारीवर रामबाण औषध तयार करणे एवढे सोपे नसते, हा दावा वैज्ञानिकांनी आधीच केला आहे. यासाठी काही वर्षे लागू शकतात किंवा कधीच औषध सापडत नाही. असाच काहीचा प्रकार एड्सबाबत झाला आहे.
एड्सबाबत ३ डिसेंबर १९८0 रोजी वैज्ञानिकांना पहिल्यांदा समजले होते. एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी किंवा हा रोग झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी आजपर्यंत एकही औषध तयार झालेले नाही. हा आजार कोरोनाप्रमाणे एवढा खतरनाक नसला तरी लैंगिक संबंधांमुळे होत असल्याने तेवढाच बदनाम आहे. एड्स झालेल्याची सुई किंवा तत्सम टोचलेली वस्तू जर अन्य कोणाला लागल्यास त्यालाही एड्स होण्यीच शक्यता असते. शिवाय शारीरिक संबंध ठेवल्यावरही एड्स पसरण्याची शक्यता असते. एवढा मोठा रोग असूनही यावर जगभरातील रथी महारथी संशोधकांना यावर लस शोधता आली नाही.
एवढे असले तरीही एड्सबाबत जनजागृती आणि काळजी घेतल्याने हा रोग कमालीचा नियंत्रणात आला आहे.
एड्सबाबत ५ डिसेंबर १९८४ रोजी पहिल्यांदा माहिती मिळाली होती. यावर दोन वर्षांच्या आत एड्सवर औषध बनविण्यात येईल, असा दावा अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाने छातीठोकपणे केला होता. मात्र, जंग जंग पछाडूनही शास्त्रज्ञांना काही औषध सापडले नव्हते. मानवी शरीरात रोगांशी लढणारी प्रतिकारशक्ती एड्स व्हायरसच्या विरोधात कामच करत नाही. हा रोग ज्याला होतो, त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार होते. मात्र ती केवळ या व्हायरसच्या शरीरातील प्रसाराचा वेग कमी करते, रोखत नाही. यामुळे एचआयव्ही झालेल्या रुग्णाला बरे करणे जवळपास अशक्य आहे.
एड्स हा कोरोना एवढा वेगवान रोग नाही. त्याची शरीरामध्ये पसरण्याचा वेग हा काही वर्षांचा असतो. या काळात हा व्हायरस मानसाच्या डीएनएमध्ये लपून राहतो. यामुळे या व्हायरसला शोधून नष्ट करणे खूप कठीण काम आहे.
अधिकाधिक लसी या अशा व्हायरसपासून सुरक्षा करतात जे शरीरामध्ये श्‍वासोच्छवासाद्वारे किंवा गैस्ट्रो-इंटसटाइनल सिस्टमद्वारे दाखल होतात. तर एचआयव्हीचे संक्रमण गुप्तांग किंवा रक्ताद्वारे होते. जनावरांवर व्हायरस आणि लसीची चाचणी केल्यानंतर माणसांसाठी औषध बनविले जाते. मात्र, दुर्भाग्य म्हणजे एचआयव्हीसाठी असे काहीच यश आलेले नाही. फक्त एकच जमेची बाजू म्हणजे कोरोना एड्ससारखा डीएनएमध्ये लपत नाही. यामुळे तो शोधला जाऊ शकतो.

Sunday, November 29, 2020

कवठेमहांकाळला महामार्ग पोलीस मदत केंद्र


सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

महामार्गावर अपघात अधिक प्रमाणात होतात. शिवाय अपघातात अडकलेल्या लोकांना किंवा अडचणीत सापडलेल्या वाहन चालकांना वेळेत मदत मिळत नाही. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्राचा उपयोग होऊ शकतो. याठिकाणी सतर्क यंत्रणा आणि पुरेसा कर्मचारी महत्त्वाचा आहे. या महामार्ग पोलीस मदत केंद्रामुळे महामार्गावरील अपघाताची माहिती पोलीस ठाण्याला देता येते आणि अडचणीत सापडलेल्या वाहनचालकांना मदत करता येते. वाहतूक सुरळीत राहील यासाठी दक्षता घेता येते. महामार्गावरील लूटमारी व इतर गुन्ह्यांना प्रतिबंध करता येते. आणि महत्त्वाचं म्हणजे वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी उपाययोजना करता येते. सध्या राज्यात विविध राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्य मार्गावर 63 पोलीस मदत केंद्रे होती. आता त्यात आणखी 13 मदत केंद्रांची भर पडली आहे. यात सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ पोलीस केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर हे दोन राष्ट्रीय म महामार्ग जातात. तसेच मिरज-पंढरपूर या राज्यमार्गही जातो.या महामार्गावर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे.  त्यामुळे घटना घडल्यावर पोलिसांची मोठी धावपळ होते. त्यामुळे या ठिकाणी मदत केंद्राचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी पाठवण्यात आला होता. तो आता मंजूर झाला आहे, मात्र इस्लामपूरजवळील पेठनाका येथील प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे. सांगली जिल्ह्यात कोल्हापूर मार्गावर देखील मदत केंद्राची आवश्यकता आहे. कवठेमहांकाळ महामार्ग पोलीस मदत केंद्रासाठी 34 पदे मंजूर करण्यात आली आहेत. यात पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार 8, पोलीस शिपाई21 आणि चालक 3 यांचा समावेश आहे.

Monday, November 16, 2020

दुःख व्यक्त करायचं की...


खूप खूप वर्षांपूर्वीची खरी घटना आहे. हरी नावाचा प्रसिद्ध आणि यशस्वी गोल्फ प्लेअर होता, त्याने एक चॅम्पिअनशिप जिंकली, त्यात त्याला एक हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले. आज विजेता झाल्यामुळे हॅरी खुशीत होता, गुणगुणत तो स्टेडिअममधुन बाहेर पडला आणि आपल्या कारच्या दिशेने चालत असताना एक महीला आपल्या चिमुकल्या बाळाला कडेवर घेऊन त्याच्या समोर येते. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आगतिकतेचे भाव असतात, ती गरीब दिसणारी स्त्री, दीनवाणे, केविलवाणे भाव आणून त्याला विनवते की ह्या मुलाला एक दुर्धर रोग आहे, आणि जर त्याचे उपचार झाले नाहीत, तर तो जास्त दिवस जगणार नाही, त्या मुलाच्या उपचारासाठी एक हजार डॉलर्सची आवश्यकता आहे. हॅरीला त्या मुलाकडे पाहुन दया येते, आणि कर्तव्यभावनेने तो तिला एक हजार डॉलर्सच्या रकमेचा चेक देतो. बघता बघता ही गोष्ट सगळ्या शहरात पसरते. हॅरीची एक महत्त्वाची मेंच असते आणि त्याच्या ओळखीचे लोक त्याला शुभेच्छा देण्यासाठी येतात. त्यातली त्याची एक ओळखीची व्यक्ती हरीला सांगते. हरी, तुला फसवलं गेलयं, मागच्या आठवड्यात, तू एका महिलेला एक हजार डॉलर्स देऊन फसला आहेस, तुला नाही. माहीतीये, मागच्या आठवड्यात शहरात कोणीही बाळ दगावलं नाही. हॅरीचा हसरा चेहरा अजुनच आनंदी झाला, थैक्स गोंड, मागच्या आठवड्यात शहरात कोणीही बाळ दगावलं नाही. आणि हसत हसत हॅरी त्याच्या पुढच्या गोल्फ मॅचसाठी मैदानाकडे गेला.गोष्ट संपली..

मित्रांनो, तुम्ही आम्ही जर हरीच्या जागेवर असलो असतो तर आम्ही कसा प्रतिसाद दिला असता? मला फसवलं गेलं, ही भावना आपल्याला किती त्रास देऊन गेली असती? मला मूर्ख बनवून. खोटं सांगून. एक हजार डॉलर्स लुबाडले. म्हणुन आपण किती चिडलो असतो? हॅरीने दिलेला प्रतिसाद किती वेगळा होता. धन्यवाद देवा, मागच्या आठवड्यात, शहरात कोणतंही बाळ दगावलं नाही. हॅरीसारखं हसत हसत, पुढची मॅच खेळायला आपल्याला जमलं असतं का? इथे मला असं अजिबात म्हणायचं नाही की आपण आपल्याला फसवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे, पण अचानक उद्भवलेल्या परिस्थीतीला आपण हसत हसत सामोरे जाऊ शकतो. आयुष्यात रोज काहीनाकाही चांगल्या घटना घडत असतात, आणि वाईट ही घटना घडत असतात. आपण फोकस कशावर करतो, त्यावर आपल्या वाट्याला आनंद आणि दुःख येतं. एक हजार डॉलर्सचा फटका बसल्याचं दुःख व्यक्त करायचं की मागच्या आठवड्यात शहरात एकही बाळ दगावलं नाही. म्हणून आनंद व्यक्त करायचा, हे आपणचं ठरवायचं!

●●●●●●

*वाचा विनोद*

वडिल : अरे, एक काळ असा होता की, मी पाच रुपयांत किराणा सामान, दूध, पाव आणि बिस्कीट घेऊन यायचो.

मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा. आता सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत.

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Wednesday, November 11, 2020

आपलं मार्केटिंग


मार्केटींग, सेल्स अवघड नाही... तो आपला जन्मजात गुण आहे स्वतःला ओळखा-१. लहानपणी आई बाबांकडे आग्रह करुन करुन चाॅकलेट, खेळणी मिळवली आहेत ?  २. शाळेत शिक्षकांसमोर नाटक करुन अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळवली आहे ?  ३. काॅलेज मधे मस्तपैकी ड्रेस घालुन, स्टाईल मारुन छाप पाडलेली आहे ? ४. पालकांना कमी मार्क का पडलेत याचं समाधानकारक ऊत्तर दिलंय का कधी ? ५. एस.टी. बस मधून फिरताना अनोळखी लोकांशी कधी गप्पा मारल्यात ? ६. काॅलेज मधे ओरल एक्झाम देताना काहीही येत नसताना १५ मिनीटे एक्टरनल समोर ठामपणे कधी ऊभे राहीलात ?  ७. परिक्षेत काहीही येत नसताना तीन तास पेपर लिहीला आहे ? ८. एखाद्या कार्यक्रमात लोकांशी मोकळेपणाने गप्पा मरु शकताय ?  ९. कार्यक्रमात जाताना टाईट-फीट ड्रेसकोड मधे ऐटीत जाऊन लोकांचे लक्ष वेधुन घेण्याचे स्कील आहे?   १०. नविन काहितरी शिकण्याची वृत्ती आहे?  ११. ट्राय करायला काय जातंय, असा कधी विचार करता ?  १२. सर्वात महत्वाचे समोरच्याला तुमचे मत स्पष्टपणे सांगण्याची डेअरींग आहे ? आता लक्ष देऊन ऐका- यापैकी ३० टक्के प्रश्नांची ऊत्तरे "हो" असतील तर तुम्हाला मार्केटींग सुद्धा अवघड नाहीये... ही सगळी उदाहरणे मार्केटींगचीच आहेत. आणि वरिलपैकी एकही प्रश्नाचे उत्तर हो नसेल तरिही मार्केटींग अवघड नाही, फक्त शिकायला थोडा वेळ लागेल.  मार्केटींग, सेल्स म्हणजे वेगळ काही नसुन समोरच्याला आपलं प्रोडक्ट घेण्यासाठी कन्व्हींस करण्याची प्रोसेस आहे. यात एकदा रुळलं की ती एक‌‌ सवय होऊन जाते. सहज होणारी प्रक्रीया बनते. मार्केटींग, सेल्सचं‌ स्कील प्रत्येकात जन्मजात असतं. काही जणांना ते लवकर‌ गवसतं काहींना त्या फील्ड मधेच नसल्यामुळे गवसायला थोडा वेळ लागतो. पण हे स्कील प्रत्येकात थोडफार असतंच. मार्केटींग स्कील आपल्या रक्तात असतं, फक्त आपण ते ओळखलेलं नसतं. स्वतःलाओळखण्याची गरज आहे.  मार्केटींग अवघड‌ नक्कीच नाही, फक्त थोड्या प्रॅक्टीकल ज्ञानाची गरज आहे... पण त्यासाठी फील्ड वर प्रत्यक्षात उतरावं लागेल. मार्केटींग स्कील अनुभवाने समृद्ध होत असते. पुस्तकी ज्ञानाने किंवा कुणाचे लेक्चर ऐकुन मार्केटींग शिकता येत नाही. तुम्हाला प्रत्यक्ष व्यवसायात उतरावं लागेल, मगंच हे ज्ञान मिळू शकेल.

व्यवसाय अवघड नाही, शिकायला थोडा जड आहे...

त्यामुळे व्यवसाय साक्षर व्हा...  ऊद्योजक व्हा... समृद्ध व्हा...

●●●●●●●

कांहीं लोक इंग्रजीच्या उच्चाराचे 12 वाजवतात. कसे..... वाचा हा जोक.... असेही काहीं विद्यार्थी असतात कॉलेजात!

एक विदयार्थी (इंग्लिश टीचरला) : मॅडम, हे नटूरे म्हणजे काय...??? 

टीचर (प्रचंड टेंशन मध्ये) : नटूरे ....??? टीचर ला कांहीं त्या शब्दाचा अर्थ सांगता येईना.

(वेळ सावरून घेण्यासाठी) मी तुला नंतर सांगते माझ्या  ऑफिस मध्ये ये. हा तिथेही गेलाच. "सांगा ना मॅडम, नटूरे म्हणजे काय ते ......???"

टीचर : (अगदी घामाघुम) आता कायच करावं बुवा याला  "मी तूला उदया सांगु का.... ???"

टीचर रात्रभर परेशान!  डिक्शनरी शोध, इंटरनेट वर शोध, जिकडे तिकडे शोधाशोध ....प्रचंड त्रस्त ! दुसऱ्या दिवसी सुद्धा तेच, "मॅडम, नटूरे म्हणजे काय..... ???"

टीचर त्याला टाळायला लागली, हा दिसला की दुरून- दुरून जायला लागली. पण हा पठ्ठ्या पण काही पिच्छा सोडेना.

एक दिवस टीचर त्याला म्हणाली, " नटूरे हा शब्द तू विचारत आहे हा मराठी आहे का इंग्लिश ???

तो : इंग्लिश 

टीचर : स्पेलिंग सांग ..

तो : N-A-T-U-R-E

टीचरची अशी तळपायाची आग मस्तकाला गेली.

"हरामखोरा, आठवडाभर नुसता जिवाला घोर लावून ठेवला तू माझ्या जिवाला, या टेंशन मुळं उपाशी- तापाशी राहीले, रात्र-रात्र जागले. कुठेच असा शब्द सापडला नाही, आणि तू ...... मूर्ख कुठला...!!! नेचर ला नटूरे-नटूरे म्हणून परेशान करून सोडलं नुसतं, थांब तुला चांगली शिक्षा करते, कॉलेज मधून काढूनच टाकते"

तो : नाही हो मॅडम, तुमच्या पाया पडतो, आता पुन्हा नाही असं काही विचारणार मी.  प्लीज मला कॉलेज मधून काढू नका नाहीतर ... माझं  फुटूरे.....बर्बाद होईल.

फुटूरे....!( F-U-T-U-R-E)...... बर्बाद होईल हो. 

संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday, November 10, 2020

सुंदर विचार


कुणाच्या  सांगण्यावरून  आपल्या मनात  एखाद्या  व्यक्तीबाबत  चांगले  वा वाईट  मत  बनवण्यापेक्षा,  आपण  स्वत: चार  पावले  चालून  समोरासमोर  त्या व्यक्तीशी  संवाद  साधून  मगच  खात्री करा.

�  नाती  जपण्यासाठी  संवाद  आवश्यक आहे.  बोलताना  शब्दांची  उंची  वाढवा आवाजाची उंची नाही. कारण, पडणार्‍या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही.

� वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस! निवड आपली आहे.

� कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

� डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

�  जे  तुम्हाला  मदत  करायला  पुढे  सरसावतात  ते  तुमचे  काही  देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून...!

� मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि... राजहंस मरताना सुद्धा गातो... दु:खाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि.... सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.

� किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे  अस्तित्व  उद्या  नसते,  मग  जगावे  ते  हसून-खेळून  कारण  या

जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही.

� आयुष्यात कितीही चांगली कर्म करा कौतुक हे स्मशानातच होतं.

●●●●●●●

वाढत्या थंडीमुळे गुड मार्निंगचे मेसेज दुपारी 2.00 वाजेपर्यंत स्विकारले जातील.-अखिल   भारतीय   ग्रुप   अ‍ॅडमीनच्या मीटिंगमध्ये ठरलेला निर्णय.

●●●●●●●●

शब्द  मोफत  मिळतात  ‘पण’  त्यांच्या वापरावर  अवलंबून  असतं  की  त्यांची किंमत ‘मिळेल की’ किंमत ‘मोजावी लागेल’.

●●●●●●●●

प्रश्‍न : 1,000 पाने  लिहियला किती दिवस लागतात?

उत्तर - 

वकील : 5 वर्ष.

डॉक्टर : 1 वर्ष.

पायलट : 5 महिने.

लेखक : 3 महिने.

इंजिनीयर : सबमिशन कधी आहे

ते सांगाल एका रात्रीत लिहुन काढतात.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली*