Tuesday, December 27, 2016

ड्रिंक ऍण्ड ड्राईव्हवर पोलिसांची राहणार नजर


जत,(प्रतिनिधी)-
सरत्या वर्षाल निरोप देण्यासाठी आणि थटी फस्टचा जल्लोष करण्यासाठी अनेक तरूण मद्यधुंद होउन. वाहन चालवित असतात. अशांच तळीरामांवर चाप बसविण्यासाठी आता जत पोलिसांनी ड्रिंक ऍण्ड ड्राईव्हवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यासठी नुकतीच ड्रिंक ऍण्ड ड्राईव्हची मशिनदेखिल जत पोलिसांत दाखल झाली आहे.
   याच पार्श्वभूमीवर आता मोठया प्रमाणावर मद्यधंद होउन वाहन चालविणा-यावर कारवाई होणार आहे. यासाठी या मशिनव्दारे मद्यधुंद चालकांच्या तोंडामधे या मशिनचा एक फुटाचा असणारा पाईप तोंडाधे देउन त्याव्दारे चालकांने किती प्रमाणात मद्य प्राशन केले आहे. याचा अंदाज येतो. आणि यातून संबधित चालकांचा अहवाल तयार केला जात असतो.
 डिंक ऍण्ड ड्राईव्ह मशिनने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकांचा दिलेला अहवाल हा न्यायालय देखिल ग्राहय धरते. यास न्यायालयांमधे किमान 5 हजार रूपयाचा दंड आणि तत्सम शिक्षा देखिल होउ शकते. त्यामुळे वाहन चालकांनो सावधान संपूर्णपणे शुध्दीत राहूनच शहरातून आणि खास करून थर्टी फर्स्टला वाहन चालवणे क्रमप्राप्त आहे. आता ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह ची मशिन आणून कारवाई सुरू केल्यानंतर आगामी काळामधे वाहतुकीला शिस्त लावण्यासंबधी पोलीस अजूनच सक्षम होणार आहेत.

अहो साहेब, आमचे पैसे तरी आम्हाला द्या!
जत,(प्रतिनिधी)-
गेल्या 50 दिवसापासून सुरू असलेल्या नोटबंदीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनतेला पडला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारी बँकामध्ये मूबलक पैसेच उपलब्ध नसल्यामुळे ग्राहाकांची आर्थिक कोंडी सुरू झाली असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था खूपच अडचणीत आलेली आहे. अहो साहेब, किमान आमचे पैसे तरी आम्हाला द्या, अशी आर्त टाहो फोडीत महिला, पुरुषांसह वयोवृद्ध नागरिक सुद्धा बँकेच्या व्यवस्थापकांना विनवणी करताहेत.
जत तालुक्यातील विविध अशी बँकामध्ये दिसून येत आहे. बँकेच्या ग्राहकांना पैशांअभावी पुरेशी सेवा पुरविता येत नसल्याने बँकेचे कर्मचारीही हतबल झालेले दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नोटबंदीच्या धाडसी निर्णयाने एका बाजुला स्वागत होत असले, तरी बँकाना नवीन नोटाचा मुबलक पुरवठा होत नसल्याने आता नोटबंदी एक डोकेदुखी झाली आहे. 500 1000 च्या नोटा बंद करण्याची घोषणा होताच गरीबांकडे असलेल्या संरक्षित पैसा बँकेत जमा झाला. मात्र आता गरजेच्या वेळी पैसे मिळेनासे झाल्याने दैनंदिन व्यवहार अडचणीत आले आहे.
जत तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँक, अर्बन बँक,स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ महाराष्ट्र,बँक ऑफ बडोदा व संपूर्ण तालुक्यात हे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर याची खाते कमी प्रमाणात असून तालुक्यात पतसंस्था सह. बँक तसेच पतसंस्थेत अधिक खाते आहेत. अशा वेळी अशा संस्थातून ग्राहकांना पैसे देणे गरजेचे आहे.मात्र राष्ट्रीयकृत बँक सह. बँकांकडे सापत्निक व्यवहार करीत असल्याचा आरोप सुद्धा होतो. आजमितीस तालुक्यात शेतकर्याअभावी दैनावस्था झाली. जत तालुक्यात अनेक बँकासमोर गर्दी तर बँक समोर रांगा लागल्यात तर ग्राहाकचे पैसे जमा आहेत. आपलेच पैसे काढण्यासाठी महिला, पुरुषासोबत वयोवृद्ध सुद्धा सकाळपासून बँकेत रांगा लावत आहेत. मात्र त्यांच्या हातात फक्त हजार,पाचशे  किंवा दोन हजार रुपये दिले जात आहेत. अनेकदा पैसे नाहीत म्हणून वापस पाठविल्या जात आहेत. अशावेळी अहो साहेब आमचे पैसे तरी आम्हाला द्या अशा विनवण्या बँकेच्या अधिकार्यांना करतानाचे चित्र जत तालुक्यात पाहावयास मिळत आहेत.
नोटाबंदीचा एकीकडे स्वागत होत असला, तरी त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला आहे. लहान मोठे व्यापार ठप्प झाले असून आर्थिक झळ व्यापार्यांना सोसावा शासन कॅशलेस व्यवहार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करीत असले, तरी ग्रामीण भागातील अशिक्षित तसेच अल्प शिक्षित हा व्यवहार कसा काय यासाठी तोठया प्रमाणावर जनजागृती करावी लागणार आहे.

म्हैसाळच्या पाण्यासाठी डफळापूरमध्ये रास्ता रोको
जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर परिसरात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी सोडावे, तसेच म्हैसाळ योजनेस शासनाने तातडीने निधी द्यावा, या मागणीसाठी डफळापूर येथे प्रा. रणजीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनास पाठींबा म्हणून गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
 डफळापूर स्टँड परिसरात जत-सांगली या महत्वाच्या रस्त्यावर मंगळवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतुुकीची मोठी कोंडी झाली. पाण्यासाठी घोषणा देत आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या मारला. त्यामुळे जतहून सांगलीकडे व सांगलीहून जतकडे येणारी वाहतुक ठप्प झाली. ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, सुभाषराव गायकवाड, शेतकरी संघटनेचे दिनकर संकपाळ, रमेश शिंदे, बाळासाहेब पाटील, राजाराम शिंदवडे यांच्यासह अनेक शेतकरी, व्यापारी आंदोलनात सहभागी झाले होते.

कॉलेजकुमारांच्या मोबाईलमध्ये सर्रास अश्लिल चित्रफिती
जत,(प्रतिनिधी)-
सांगली शहरातल्या  एका महाविद्यालयातकॉलेजकुमारांच्या मोबाईलवरीलडाटातपासण्यात आला. त्यामध्ये 9 विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर अश्लील मजकूर-क्लिप्स मिळून आल्या.मात्र अशा चित्रफिती सर्रास युवकांच्या मोबाईलमध्ये आढळून येतात.याबाबत सर्वच महाविद्यालयाने तपासणी करून कॉलेजकुमारांवर धाक ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.
 ॠांगलीतल्या एका  महाविद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉलेज प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे मोबाईल तपासण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांकडे वादग्रस्त मेसेज व अश्लिल क्लिप्स होत्या, त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपले मोबाईल लॉक करून त्यासाठी पासवर्ड टाकल्याचे आढळून आले. त्यांना संबंधित महाविद्यालयाचे प्रशासन व पोलिस  अधिकार्यांनी  फैलावर घेतल्यावर चुका कबूल केल्या.
 मात्र अशा प्रकारचे अश्लिल चित्रफिती सर्रास कॉलेजकुमारांच्या मोबाईलमध्ये आढळून येतात. युवा पिढी ती झाकून पाहत असते. त्याच्यावर चर्चा करत असते. कोणती चांगली क्लिप आहे, ती मला पाठवअशी संभाषणे सर्रास कॉलेज कट्ट्यावर पाहायला मिळतात. कॉलेजच्या प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने या प्रकाराला अटकाव करण्याची गरज असून त्यांना जनजागृती करण्याचीही गरज आहे. अशा प्रकारामुळे भविष्य कसे बरबाद होते, हे सांगण्याबरोबरच अभ्यासाकडे लक्ष देण्याबाबत जागृती करण्याची गरज आहे.
 आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कष्ट, जिद्द, सततचा अभ्यास, परिश्रम, चांगली कामे; यासंदर्भात कुटूंबातील व समाजातील दैनंदिन अनुभवाद्वारे सविस्तर विवेचन करण्यात यायला हवे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व वरिष्ठ  कर्मचारी यांनीही पुढाकार घ्यावा.
  पालकांना असे महागडेथ्री-जी, फोर-जीमोबाईल विद्यार्थ्यांना का देता, पालकांनीही काय दक्षता घ्यावी, याविषयी समुपदेशन करण्यात यायला हवे आहे. सध्या सर्वत्रचव्हॉटस्अॅपग्रुप, फेसबुकद्वारे चांगल्या व समाज प्रबोधनपर उपदेश-चित्रफितींबरोबर वादग्रस्त, देश विघातक, धार्मिक भावना भडकाविणार्या तसेच अश्लिल चित्रफिती फिरत असल्याचे चर्चेत आहे. त्यामध्ये कॉलेजकुमारांचा वाढता वावर असून तो संभाव्य गुन्हेगारीची तीव्रताही वाढविणारा ठरत आहे. पालकांनीदेखील आपापल्या पाल्यांच्या मोबाईलवरीलफोटो, व्हिडीओ, कॅमेरा, -मेल, फेसबुक, व्हॉटस्अॅप, बॅकअप व रिश्टोअर, मेसेजअशी सर्व फोल्डर्स अधूनमधून तपासून वादग्रस्त प्रकारांना वेळीच आळा घालण्याची गरज आहे.







Friday, December 23, 2016

जतची यल्लमा यात्रा मोठ्या उत्साहात सुरू



हजारो भाविकांनी फेडला नवस;लाखभर भाविकांनी घेतले दर्शन
जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.काल यात्रेच्या मुख्य दिवसातील पहिला प्रमुख दिवस.हजारोंच्या संख्येने भाविकांनी गंध लेवून देवीची ओटी भरली व आपला नवस फेडला. काल दिवसभरात लाखभर भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले.
नवसाला पावणारी देवी म्हणून श्री यल्लमाची सर्वदूर प्रसिद्धी आहे. आपले कार्य विनासायास सफल व्हावे म्हणून भाविक देवीला नवस बोलतात. आपली कार्यसिद्धी झाल्यास या दिवशी भाविक देवीच्या दारात येऊन नवस फेडतो.येथील कुंडात स्नान करून भक्तीभावाने देवीची ओटी भरली जाते.काल हजारोंच्या संख्येने भाविकांनी आपला नवस फेडला.
यात्रा स्थळावर भाविकांची मोठी गर्दी होत असून भाविक लाखोच्या संख्येने दाखल होत आहेत.जत तालुक्यासह मुंबई,पुणे, बेंगळूर, बेळगाव, धारवाड,इंडी,बिदर,सोलापूर आदी परिसरातील भाविक मुक्कामाला येत असतात. तीन दिवस मुक्काम करत दुसर्‍यादिवशी देवीला नैवेद्य दाखवून झाल्यावर तिसर्‍यादिवशी  किच पडल्यानंतर भाविका यात्रा स्थळ सोडतात. जवळपास चार लाखाहून अधिक भाविक यात्रेला हजेरी लावत असते. यात्रा स्थळावर मेवा-मिठाईच्या दुकानांसह सौंदर्य प्रसाधने, संसारोपयोगी वस्तू,गरम लोकरीचे कपडे,खेळणी, हॉटेल्स,चायनीज पदार्थ,रसवंतीगृहे आदींची दुकाने,स्टॉल्स थाटली गेली आहेत. करमणुकीच्या साधनांमध्ये पाळणे,डिज्नेलँड,मौत का कुआ,जादूगार,तमाशे दाखल झाले आहेत.यंदाच्या यात्रेवर नोटाबंदीचा कुठलाच परिणाम दिसून येत नाही. उलट यंदा गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक मोठी यात्रा भरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यंदाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेच्यावतीने प्रथमच कृषी महाप्रदर्शन भरवण्यात आले आहे. आर. आर. पाटील यांच्या नावाने कृषी प्रदर्शन भरवण्याचे योजले असले तरी त्यांचा उल्लेख अजिबात दिसत नाही. उदघाटन पत्रिकेमध्येदेखील जिल्हा परिषदेला व आर. आर.पाटील यांच्या प्रतिमेला स्थान दिले गेले नसल्याने जिल्हा परिषदेने या प्रदर्शनाचा निधी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खास बाब म्हणून निधी देण्याचे कबूल केले आहे. प्रदर्शनावर भाजपाची छाप ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 
नेहमीप्रमाणे सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने जनावरांचे विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रा स्थळावर भाविकांसाठी पिण्यासाठी व स्नानासाठी कुंडात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.

संजना व्होनमोरे हिची राष्ट्रीय रिंगबॉल संघात निवड


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बेळोंडगी येथील एम.जी.हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कु.संजना मल्लिकार्जून व्होनमोरे हिची राष्ट्रीय रिंगबॉल संघात निवड झाली आहे. तिने सहभाग घेतलेल्या महाराष्ट्र संघाने बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आहे. जतसारख्या दुष्काळी आणि ग्रामीण भागात राहून तिने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कु.संजना ही इयत्ता 9 वीत शिकत असून तिच्या उत्तम कामगिरीमुळे तिने अल्पावधीतच महाराष्ट्र राज्याच्या रिंगबॉल संघात स्थान पटकावले. कबड्डी,धावण्याच्या व गोळाफेक स्पर्धांमध्ये तिची कामगिरी उल्लेखनिय आहे. तिच्या कामगिरीमुळे आणि  के.एम.हायस्कूल येथील क्रीडाशिक्षक विजय बिराजदार, एम.जी.हायस्कूलचे क्रीडाशिक्षक चिक्कलगी,तोरणे यांच्या प्रयत्नामुळे तिला तालुका रिंगबॉल संघात स्थान मिळाले.तिने आपले कौशल्य पणाला लावून यात मोठी कामगिरी करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे तिची सांगली जिल्हा रिंगबॉल संघात निवड झाली. इथेही तिने आपल्या कामगिरीची चुणूक दाखवली. सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगलीच्या संघाने विजेतेपद पटकावले.
नंतर तिची निवड राज्याच्या रिंगबॉल संघात झाली. नुकत्याच आंतरराज्यीय रिंगबॉल स्पर्धा बेंगलोर येथे पार पडल्या.या स्पर्धेत तिचा सहभाग असलेल्या राज्याच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. तिच्या या कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर.सी.होर्तीकर, सचिव एस.के.होर्तीकर,मुख्याध्यापक यु. आर. माळी आदींनी तिचे अभिनंदन केले. शाळा आणि ग्रामस्थांनी तिची बेळोंडगी गावातून सवाद्य मिरवणूक काढली.
कु.संजना व्होनमोरे हिला पहिल्यापासून खेळाची  आवड आहे. तिच्या उत्साहामुळे ती सातवीत असताना मुलींचा कबड्डीचा संघ तयार झाला. तिच्या कामगिरीवरच पहिल्याच प्रयत्नानत या संघाने तालुका स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला होता. तिची खेळाविषयीची आवड पाहून मुख्याध्यापक श्री. माळी यांनी क्रीडाशिक्षक चिक्कलगी, अधिक्षक व राष्ट्रीय खेळाडू तोरणे सर आणि कर्की सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिला सराव देण्यात आला. रोज दोन किलोमीटर ती धावत असते. कबड्डी,गोळाफेक आणि धावण्याच्या स्पर्धेतही तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.तिला तिच्या आई-वडिलांचेही बहुमोल मार्गदर्शन मिळाले. तिचे वडील मल्लिकार्जून व्होनमोर शिक्षक आहेत.

Thursday, December 15, 2016

सावधान... सांगाल तर फसाल!


लॉटरीनंतर आता‘ एटीएम ब्लॉक ’चा फंडा; मोबाईलवरून विचारणा केल्यास क्रमांक सांगू नका
जत,(प्रतिनिधी)-
‘तुम्हाला एक लाख पौंडाची लॉटरी लागली आहे’, या फसवणुकीच्या प्रकारानंतर आता गावागावांतही  'हॅलो,तुम्हारा एटीएम ब्लॉक होनेवाला है’ असे फोन येऊ लागले आहेत... तेव्हा सावधान! तुमच्या बँक खात्यावरील पैसे लाटण्याचा हा परप्रांतीय लुटारूंचा धंदा असू शकतो.
जत तालुक्यातील अगदी खेडेगावातल्या लोकांना असे फोन येऊ लागले आहेत.गेल्या आठ दिवसांत असे अनेक फोन आले आहेत. फोन करणारे हिंदी भाषिक व्यक्ती आहेत. तालुक्यातील दरिकोणूर येथील प्राथमिक शिक्षक बाबासाहेब पांढरे यांना तसेच उटगी येथील उर्दू शाळेत कार्यरत असणारे शिक्षक पटेल यांनाही अशा प्रकारचे फोन आले आहेत.त्यांना मोबाईलवर बोलणारी व्यक्ती ‘ भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेन ब्रँचमधून  बोलत असून तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. ते पुन्हा सुरू करायचे असेल तर तुमच्या क्रेडिट/ डेबिट कार्डवरील क्रमांक सांगा’ असा आग्रह करीत होते. पांढरे यांनी आपल्याला यातले काही कळत नाही.तुम्हाला नंतर सांगतो, असे सांगून फोन केला. नंतर त्यांनी एटीएममध्ये जाऊन पैसे काढले. पैसे निघाले. त्यामुळे त्यांना कुणीतरी आपल्याला फसवत आहे, असा संशय आला. त्यामुळे त्यांनी नंतर त्याचा फोन स्वीकारला नाही.
उटगी येथील पटेल यांनाही असाच अनुभव आला. मात्र पलिकडून फोनवरून बोलणारी व्यक्ती बिहारी असल्याचा संशय आला. त्याची त्यांनी फिरकी घेतली.पलिकडच्या व्यक्तीला ते लक्षात आल्यावर त्याने पटेल यांना जोराची शिवी हासडली. शिक्षकांनी त्याला शिवीगाळ केली. व फोन बंद कर नाहीत तर पोलिसांत तक्रार देतो असे सांगत त्याचे बोलणे रेकॉर्ड केल्याचेही सांगितले. मात्र त्या पलिकडील निगरगठ्ठ माणसाने खुशाल तक्रार जा, असे सांगतानाच जो तो मला असेच म्हणतो, मात्र तक्रार कोणी करत नाही, असाही निर्ल्लजपणे म्हणाला.
बँक खातेदाराला एटीएमचा क्रमांक मागून परप्रांतीय भामटे त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत शहरी भागात एटीएमच्या नावाने फसवणूक करणार्‍या भामट्यांनी शहरातील लोक जागृत झाल्याने आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला आहे. हे भामटे मोबाईलवरून संभाषण करून कार्डवरील कार्डवरील क्रमांक घेऊन सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बनावट एटीएम कार्ड तयार करून त्याद्वारे एटीएममधून खात्यावरील पैसे परस्पर काढत असल्याच्या घटना शहरी भागात घडल्या आहेत. आता ग्रामीण भागातही हे प्रकार घडू लागले आहेत.त्यामुळे अशा प्रकारच्या फसव्या कॉलपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणतीही राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँक अशा प्रकारच्या एटीएम कार्डाबाबत माहिती घेणारी वेगळी यंत्रणा नेमत नाही. त्या खातेदारांचे पासवर्ड तीच बँक देत असल्याने तो डाटा पूर्वीच बँकेत असतो, त्यामुळे बँकेच्या नावाखाली चोरटे फसवणूक करीत असल्याने अशांना कोणतेही क्रमांक सांगू नयेत, असे आवाहन बँकांनी केले आहे. शिवाय बँका आपल्या खातेदारांना अशा प्रकारचा मेसेज वारंवार करत असते. खातेदारांनी मेसेज वाचावेत, असेही सांगण्यात आले.

जत साखर कारखाना राजारामबापूने बंद ठेवला


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या विकासाचा मानबिंदू असणारा जतचा डफळे कारखाना सभासदांच्या मालकीचा होण्याचे संकेत मिळत असले तरी या कारखान्याला लागलेले ग्रहण सुटता सुटेनासे झाले आहे. राजारामबापू साखर कारखान्याने खरेदी केलेले हे युनिट चालू गळीत हंगाम अवघ्या बारा दिवसात बंद ठेवला आहे. उसाची टंचाई, झोनबंदीच्या नावाखाली कारखाना बंद असल्याचे सांगण्यात येत असले तरी यामागे वेगळी कारणे असल्याचे आता समोर येत आहे. सद्यस्थितीला कारखान्यावर असणारी स्टॉक साखर उचलण्यास प्रारंभ झाला असून, कारखान्याची मशिनरी खोलण्यात येत आहे.
सततचा दुष्काळ, बँक कर्जे, उसाची कमतरता यामुळे जतचा राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना आर्थिक डबघाईला आला होता. तसेच राज्य शिखर बँकेचे कारखान्यावर कर्जे असल्याने अखेर तो पाच वर्षापूर्वी लिलावात निघाला. या लिलाव प्रक्रियेत इस्लामपूरच्या राजारामबापू सहकारी कारखान्याने जतचे युनिट 47 कोटी 86 लाखाला खरेदी केले होते. त्यानंतर पुन्हा जतेच्या विकासाचा मानबिंदू असणाऱया या कारखान्याचे धुराडे पेटले होते. मागची चार वर्षे हा कारखाना राजारामबापूने ताकदीने चालवला होता.
एकीकडे राजारामबापू कारखान्याने जतचे धुराडे सुरू केले असले तरी या कारखान्याच्या बाबतीत येथील सभासद कुंडलिक दुधाळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारखाना विक्रीला आव्हान दिले होते. यापैकी दोन निकाल सभासदांच्या बाजूने लागलेले आहेत. तर अंतिम निकाल मार्च 2017 मध्ये होण्याची शक्यता असून जतचा कारखाना निश्चितपणाने सभासदांच्या मालकीचा होण्याचे संकेत आहेत. तसेच जिल्हय़ातील निनाईदेवी व यशवंत हे दोन्ही कारखाने पुन्हा सभासदांच्या ताब्यात आल्याने जतचा कारखानाही सभासदांना मिळणार याबाबत खात्री निर्माण झाली आहे.
दरम्यान, सभासदांच्या बाजूंनी कुंडलिक दुधाळ यांनी दाखल केलेल्या याचिकेत जत कारखान्याचे सभासदांची संख्या 22 हजार 285 असून, कारखान्याची 202 एकर बिगर शेती जमीन आहे. जरी कारखाना आर्थिक कोंडीमुळे आणि कारखान्यावरच्या कर्जामुळे बंद राहीला असला तरी जत कारखान्याची मालमत्ता ही कर्जापेक्षा जादा आहे. तसेच राज्य बँकेकडून हा कारखाना विक्री होताना, राजारामबापू या एकाच कारखान्याची निविदा आली होती. शिवाय त्यांनी हा कारखाना अल्प किंमतीत खरेदी केला. यात सभासदांचे मोठे नुकसान झाले असून, हा कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा व्हावा अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. यावरचा अंतिम निकाल मार्च 2017 मध्ये होण्याचे संकेत आहेत.

जत कारखान्याचा हा जांगडगुत्ता सुरू असतानाच यंदा राजारामबापू कारखान्याने ऊसटंचाई व झोनबंदीच्या नावाखाली बारा दिवसात गाळप बंद केले. कारखाना बंद होताच, त्यांनी मशिनरी खोलण्यास सुरूवात केली आहे. येथील स्टॉक साखरही तातडीने हालवण्यात येत आहे. बगॅसची विक्री करण्यात येत असून यामुळे कारखान्यात पुन्हा नवे काय घडणार याबाबत सभासदांमध्ये व कारखाना बचाव समितीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याचबरोबर येथील स्थानिक कामगारांना तोंडी आदेश देऊन कामावरून कमी करण्यात आले आहे. तर कायम असणारे कर्मचारी दुसऱया युनिटकडे हालवले जात आहे. जत कारखान्यावर होणाऱया घडामोडीबाबतही गोपनीयताही पाळण्यात येत आहे.
यंदा जतच्या कार्यक्षेत्रात असणाऱया उस उत्पादक शेतकऱयांनी जत कारखान्यास ऊस देण्यास नकार दिला. कारण गतवर्षी राजारामबापूने जो दर जाहीर केला होता. त्याप्रमाणे त्यांना बिले अदा झाली नाहीत.त्यामुळे ऊस शेतकरी नाराज आहेत.

ढगाळ वातावरणामुळे चिंतेचे सावट

ढगाळ वातावरणामुळे चिंतेचे सावट
जत,(प्रतिनिधी)-
मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे फळबागा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. रोगट हवामानामुळे द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसणार असल्याने द्राक्ष पट्ट्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक अपत्तींमुळे शेतकरीवर्गाचे कंबरडे मोडले आहे. शेतमालाच्या बाजारभावाचीही नेहमी ओरड असते. त्यात नोटबंदीमुळे तेजीत असणाऱ्या भाजीपाला, फळांचे दरही मोठ्याप्रमाणात घसरले आहेत. शेतकऱ्यांची ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’अशी अवस्था झाली आहे. त्यात आता खराब हवामानाचे संकट ओढवल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
खराब हवामानामुळे फळपिके, भाजीपाल्यावर रोग पडत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये वाढ होत आहे. तसेच, वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाची हमी मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेती बेभरवशी धंदा असल्याची प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून उमटत आहे.
सध्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्याचा काळ सुरू आहे, तर काही ठिकाणी द्राक्षबागांचे तोडे सुरू आहेत. पाणी उतरण्याच्या काळात पाऊस व हवामान ढगाळ झाल्यास द्राक्षमणी फुटण्याचा धोका असतो. अशीच स्थिती पुढील दोन दिवस राहिल्यास द्राक्ष बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊ शकते. मंगळवार  रात्रीपासून  तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे, तर बुधवारी सकाळपासून परिसरात काही भागात हलका पाऊसदेखील झाला. आजही दिवसभर ढगाळ वातावरण राहिले आहे. असेच आणखी दिवस राहिले तर खराब हवामानामुळे द्राक्षबागांवर डाऊनी, भुरी, रसशोषक कीड आदींचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. तसेच, भाजीपाला पिकांवरदेखील रसशोषक किडींचा हल्ला होण्याचा धोका आहे.

Tuesday, December 6, 2016

आता जानकरही टिपले जाणार का?


जत,(मच्छिंद्र ऐनापुरे)-
राजकारणी माणसाला नेहमी सावध राहावं लागतंकारण राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतातअस्तित्वाच्या या लढयात कधी शिकारी वरचढ होतो तर कधी त्याचीच शिकार होऊन जातेस्वातंत्र्यानंतरच्या काळात पूर्वीचे मंत्री राजकारण करीत नव्हते असे म्हणण्यापेक्षा आपल्याकडून कायदे मोडणार नाहीतसंसदीय प्रथा परंपरांचे नीट पालन होईलत्यावर भर देत होते.  मात्रपुढे 1980 प्रघात झाला आणि मंत्र्यांची प्रतिमा डागाळण्याचे सत्र सुरू झालेभ्रष्टाचार अन् आरोपांच्या फैरीत आजवर तीन मुख्यमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे तर अनेक मंत्र्यांना राजिनामा देऊन पदावर पाणी सोडावे लागले होते
सध्या राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर निवडणूक अधिकार्याला धमकविल्याचे आरोप होताहेतत्यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहेजानकरांच्या कृत्यावरून त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावाअशी मागणी जोर पकडू लागली आहेपरंतुअशा मागण्या काही आता नवीन राहिलेल्या नाहीतइतिहासावर लक्ष घातल्याससर्वप्रथम 12 जानेवारी 1982 ला प्रतिभा प्रतिष्ठान आणि सिमेंट घोटाळ्याच्या आरोपामुळे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए . आरअंतुले यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलामुलीच्या एमडी अभ्यासक्रमात गुणवाढ दिल्याप्रकरणी मार्च 1986 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनाही राजीनाम्याला सामोरे जावे लागले होते.  जून 1988 मध्ये जेजेरुग्णालयातील औषध घोटाळा प्रकरणी तत्कालीन आरोग्यमंत्री भाई सावंत यांनाही ’लेन्टीन’ आयोगाच्या अहवालानंतर राजीनामा द्यावा लागलागोवारी हत्याकांडानंतर 30 नोव्हेंबर 1994 ला आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनाही तोच कित्ता गिरवावा लागला होतागैरव्यवहाराच्या आरोप झाल्यामुळे 24 एप्रिल 1997 ला तत्कालीन कृषिमंत्री शशिकांत सुतार यांनाही पदावरून दूर जावे लागलेपाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर यांनाही 5 डिसेंबर 1996 मध्ये राजीनामा द्यावा लागला.
गृहमंत्री पदावर असताना नवाब मलिक यांना लोकायुक्तांच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्यामुळे 15 मार्च 2005 ला राजीनाम्याला पुढे जावे लागलेअण्णा हजारे यांनी एका घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर सुरेश जैन यांनाही मागे फिरावे लागलेवनविभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वनमंत्री सुरूपसिंग नाईक यांचेही 12 मे 2006 मध्ये तेच झालेबहुचर्चित आदर्श घोटाळा प्रक रणी 2010 मध्ये अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागलेभ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तर राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले छगन भुजबळ सध्या तुरुंगात आहेगैरव्यवहाराच्या आरोपाखाली एकनाथ खडसेनाही महसूल खाते सोडावे लागलेएकूणच, 1980 पासून भ्रष्टाचारगैरव्यवहाराचे आरोप आदीप्रकरणांमुळे पद गळतीची सुरुवात झालीआता राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर महादेव जानकर याच आरोपांच्या कात्रीत अडकले आहेतत्यामुळे आताजानकरही टिपले जाणार कायाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.