Thursday, May 7, 2020

दहा पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद होणार?

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या शाळांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी ऑनलाईन'वेबिनार' मध्ये दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांच्या आसपासच्या शाळा आयडेंटिफाय करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे. सांगली जिल्ह्यात कमी पटाच्या 121 शाळा आहेत.

Wednesday, May 6, 2020

पालक व मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग सुरु


एस.सी.ई.आर.टी.पुणेचा उपक्रम- प्राचार्य डॉ.होसकोटी
सोन्याळ,(लखन होनमोरे यांजकडून)-
सांगली जिल्ह्यामध्ये पालक व मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग एस.सी.ई.आर.टी.पुणे यांच्यामार्फत मोफत तज्ञांचे समुपदेशन , मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन  सांगली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य डाॅ. रमेश होसकोटी  यांनी केले आहे.

Monday, May 4, 2020

मुलांना ऑनलाईन शिक्षणाची गरज आहे का?

माफ करा पण शिक्षक आहे म्हणून बोलावेसे वाटते.....
खरेच ऑनलाईन अभ्यासाची लहान मुलांना गरज आहे का...? मला असे वाटत नाही.. बऱ्याच शाळा ऑनलाईन सुरू झाल्या. ऑनलाईन लेक्चर, ऑनलाईन छंदवर्ग, ऑनलाईन स्पेशल ट्युशन वगैरे वगैरे..... पण यात तुमच्या लक्षात येते आहे का की मुले बरेच तास । स्क्रीनसमोर आहेत... आणि याच स्क्रीनसाठी ते पॅनिक होत आहेत... तुमचे खरेच आहे की लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे... पण काही पालकांना ही याचे अप्रूप आहे. आमची मुले ऑनलाईन अभ्यास करतात, याचे समाजमाध्यमावर फोटोही टाकले... छान.... पण यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांचे काय? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहे...

स्वच्छता व सोशल डिस्टन्समुळे आजाराच्या प्रमाणात घट

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या 'कोरोना' मुळे सरकारी हॉस्पिटल्स सोडले तर इतर सर्व हॉस्पिटल काही ठराविक वेळेसाठी सुरू राहतात. खासगी हॉस्पिटलमध्ये नेहमी दिसणाच्या रुग्णाच्या झुंडी, औसंडून वाहणारे वॉरई, ओ.पी.डी.च्या रांगा, मेडिकल दुकनांमधील गर्दी... सारे बही थांबले आहे.

वृत्तपत्र उद्योगाचे दोन महिन्यात 4 हजार कोटींचे नुकसान

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील वृत्तपत्र व्यवसाय पूर्ण डबघाईला आला आहे. त्याचबरोबर पेपर वाटणाऱ्या पोरांचाही रोजगार बुडाला आहे. गावात आणि खेड्यात राबत असलेल्या बातमीदारांच्याही पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जाहिराती बंद झाल्याने कमिशनवर जगणारे पत्रकार आणि जाहिरातीवर आपला चौथा स्तंभ अबाधित ठेवणारे वृत्तपत्र उद्योग यांची अर्थव्यवस्था बिघडली आहे. आता यांच्या मदतीसाठी शासनाकडेच आर्थिक सहाय्याची मागणी केली जात आहे.

गड्या, आपला गावच बरा!

लॉकडाऊनमुळे गावांतील लोकसंख्येत सात टक्क्यांनी वाढ

भारत देश खर्‍या अर्थाने ४0 हजार खेड्यांमध्येच वसला आहे, त्यामुळे गावाकडेच चला, असे महात्मा गांधी म्हणायचे. अर्थात महात्मा गांधींच्या त्यामागचा उद्देश हा गाव-खेड्यांच्या विकासाच्या दृष्टीचा होता. पण सध्या देशातील कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे आणि शहरांमध्ये कोरोनाचे भय जास्त असल्याने याकाळात गावातील लोकसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही वाढ सात टक्के इतकी नोंदवली गेली आहे.

Sunday, May 3, 2020

सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्याने काही प्रमाणात सुट

तरी सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्यच
सांगली, (जत न्यूज वृत्तसेवा) -
लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या झोनमध्ये सांगली जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आल्याने काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंग पाळणे, आनावश्यक गर्दी न करणे, मास्क वापरणे या अटी शर्तीना अधिन राहून देण्यात शिथिलता आले आहे.